शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातही बहुतांश ग्रामपंचायतीत काँग्रेस विचाराचे उमेदवार विजयी- खा. अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 21:05 IST

मुंबई - दुस-या टप्प्यातील 3700 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले पहिल्या टप्प्याप्रमाणे दुस-या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत.

मुंबई - दुस-या टप्प्यातील 3700 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले पहिल्या टप्प्याप्रमाणे दुस-या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. पण सरकारचे अपयश लपविण्यासाठी खोटी आकडेवारी देऊन भाजपची फेकाफेकी सुरू आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

आज निकाल जाहीर झालेल्या बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या 1063 आणि दुस-या टप्पा मिळून काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून, खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाच पक्ष सर्वात मोठा असल्याचा खोटा दावा भाजपाने या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे. भाजपाकडून माध्यमांना पुरवण्यात आलेल्या आकडेवारीत भाजपाने अमरावती जिल्ह्यात 150 ग्रामपंचायतीत विजय मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात भाजपाने फक्त 36 ग्रामपंचायतीत विजय मिळविला आहे, तर काँग्रेस पक्षाने 140 ग्रामपंचायतीत विजय मिळविला आहे.

आतापर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 52 पैकी 27, अमरावती जिल्ह्यात 249 पैकी 140, सांगली जिल्ह्यातील 452 पैकी 139, पुणे जिल्ह्यातील 221 पैकी 77 ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात ही भाजचा दारुण पराभव झाला आहे. पण वस्तुस्थिती लपवण्यासाठी भाजपाकडून खोटी आकडेवारी दिली जात आहे. दुस-या टप्प्याच्या निकालाची सविस्तर आणि खरी आकडेवारी आम्ही लवकरच जाहीर करू असे सांगतानाच लोकांनी भाजपला दणका दिल्याने भाजपची फेकाफेकी सुरू आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.   

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस