शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

पहाटेपासून शोधमोहीम

By admin | Updated: August 4, 2016 05:38 IST

बुधवारी पहाटे ६ वा.पासून सागरी तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ तसेच पोलीस दलासह महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी संपूर्ण नदीच्या पात्रात शोधमोहीम सुरू केली आहे.

संदीप जाधव,
 
महाड- अंधार आणि मुसळधार पावसामुळे मंगळवारी मध्यरात्रीच्या आधी झालेल्या दुर्घटनेनंतर शोधमोहीम सुरू करणे अशक्य होते. त्यामुळे बुधवारी पहाटे ६ वा.पासून सागरी तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ तसेच पोलीस दलासह महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी संपूर्ण नदीच्या पात्रात शोधमोहीम सुरू केली आहे. 
दोन हेलिकॉप्टर्ससह पाणबुड्या व स्पीडबोट्स यांच्याआधारे बेपत्ता वाहने व प्रवाशांचे शोधकार्य दिवसभर सुरू होता. मात्र दिवसभराच्या शोधानंतरही एसटीच्या बसेस, खासगी वाहने वा प्रवासी यांच्यापैकी कोणाचाच शोध लागला नाही. संध्याकाळनंतर अंधारामुळे हेलिकॉप्टद्वारे घेतला जाणारा शोध थांबवण्यात आला. आता गुरुवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू होईल.या दुर्घटनेचे वृत्त समजताच मध्यरात्रीच रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली, जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, डीवायएसपी प्रांजली सोनावणे आदिंनी घटनास्थळी धाव घेवून यंत्रणा युद्धपातळीवरून राबवली. सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे शोधमोहीमेचे काम मोठ्या जिकिरीचे बनल्याचे दिसून आले. 
जुन्या पुलाला समांतर असा नवीन पूल गेल्या १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यानंतर जुन्या पुलाचा वापर कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी केला जात होता, तर नवीन पुलाचा वापर कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता देशपांडे यांनीही घटनास्थळाची बुधवारी दुपारी पाहणी केली.
>बघ्यांच्या गर्दीमुळे शोधकार्यात अडथळे
एनडीआरएफच्या ९० जवानांची फौज सहा बोटींसह शोधकार्यात मग्न असून बघ्यांच्या गर्दीमुळे त्यातअडथळा निर्माण होत होता. सावित्री नदीच्या जोरदार प्रवाहाच्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी रिव्हर रॉफ्टिंगची टीमही दाखल झाली आहे. कोसळलेल्या पुलाच्या लगतच असलेल्या समांतर पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. घटनास्थळापासून महामार्गावर दुतफर् ा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत होत्या. नेमकी किती 
वाहने पात्रात 
वाहून गेली वा किती जण बेपत्ता आहेत याबाबत अद्यापही अधिकृत माहिती प्रशासनाला मिळालेली नसल्याने केवळ अंदाज बांधले 
जात आहेत. 
>वाहून गेलेल्या एसटी बसमधील बेपत्ता प्रवासी
जयगड - मुंबई 
(एम.एच.२०/डीएल-१५३८)
१. अविनाश सखाराम मालप (रा.लावगंध-खंडाळा,जयगड)
२. प्रशांत प्रकाश माने 
(२९, रा.भंडारपुळे, रत्नागिरी)
३. सुनिल महादेव बैकर 
(३५, जयगड)
४. स्रेहल सुनिल बैकर 
(३०, जयगड)
५.धोंडू बाबाजी कोकरे 
(५५, रा.वरवडे जि. रत्नागिरी)
६. भुमी भुषण पाटेकर (२६, रा. लावगंध-खंडाळा, जयगड)
७.संतोष बळेकर (१२, रा. लावगंध-खंडाळा जयगड)
८.जितेश जैतापकर (३३, रा. जैतापूर, ता.राजापूर-रत्नागिरी)
९. सुरेश नेमाजी सावंत (६०, रा.बावनदी,रत्नागिरी)
१०.एस.एस.कांबळे (बस चालक)
११.व्ही.के.देसाई (बस वाहक)
 
राजापूर -बोरीवली 
(एमएच-४०/एन९७३९)
१.भिकाजी रामचंद्र वाघझरे, 
(७९, मु. गुरव चाळ , गणेश नगर,बेहरमबाग जोगेश्वरी, मुंबई)
२. विजय विश्राम पंडित (मुंबई)
३. विनीता विश्राम पंडित (मुंबई)
४. अवेश अल्ताफ चौगुले( १८) 
५. असिफ अहमद चौगुले (२०)
६. जी. एस. मुंडे (बस चालक)
७. पी. बी. शिर्के (बस वाहक) 
>मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक सुरूच !
गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेणजवळच्या भोगावती नदीवर नवा पूल बांधून दोन वर्षे झाली आहे. मात्र अनेक दिवस हा पूल वाहतुकीसाठी खुला केला नव्हता. परिणामी भोगवतीवर बांधण्यात आलेल्या जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू आहे. 
हा पूलही ब्रिटिशकालीन असून कमकुवत झाला आहे. नवीन पूल अलीकडच्या काळात वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला असला तरी जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली नाही. 
सद्य:स्थितीत या जुन्या धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे पुलावरून ये-जा करणाऱ्या एसटीचालक व अवजड वाहनचालकांचे म्हणणे आहे. 
>जिल्ह्यातील तीन पूल कोसळले, २८ गावांचा संपर्क तुटला
यंदाच्या पावसाळ््यात आतापर्यंत गोवा राष्ट्रीय महामार्ग वगळता जिल्ह्यातील अन्य मार्गावरील पूल कोसळून वाहतूक बंद झाल्याची उदाहरणे आहेत. पोलादपूरमधील वझरवाडी पूल तुटल्याने १४ गावांचा संपर्क तुटला आहे. 
तळा तालुक्यातील मांदाड-म्हसळा मार्गावरील वरळ पूल तुटल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे. पनवेल तालुक्यातील उमरोली येथील पूल तुटल्याने सुमारे ९ गावांचा संपर्क तुटला आहे. रोहा अष्टमी येथील जुन्या पुलावर कुंडलिका नदीच्या पुराचे पाणी येते. सोमवारीच तशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. 
पुलाची धोकेविषयक तपासणी झालेली नाही. नागोठणे शहरातून बाहेर पडण्याकरिता अंबा नदीवर असलेल्या शिवकालीन पुलाला देखील अंंबा नदीचे पाणी लागलेले आहे. हा पूल देखील धोकादायक आहे किंवा नाही याबाबतची तपासणी झालेली नाही.
नियंत्रण कक्ष संपर्क : 
रायगड जिल्हा नियंत्रण कक्ष-टोल फ्री क्र मांक-१०७७, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष-०१२४१-२२२११८, मुंबई सेंट्रल बसस्थानक-०२२-२३०७४२७२ / २३०७६६२२, महाड बस स्थानक-०२१४५-२२२१३९/ २२२१०२, पोलादपूर बसस्थानक- ०२१९१-२४००३६, चिपळूण बसस्थानक - ०२२३५५ /२५२००३/२५२१६७, रत्नागिरी बसस्थानक-०२३५२-२२२१०२/२२२२५३, राजापूर बसस्थानक-०२३५३-२२२०२९/२२२२१८