शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

उपरच्या वा-यामुळे समुद्र खवळला, किना-यावर वादळसदृश स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 18:15 IST

उपरच्या वा-यामुळे समुद्र खवळला असून महाकाय लाटा किना-यावर धडकत आहेत. समुद्रात वादळसदृश वातावरण निर्माण झाल्यामुळे मच्छीमारी व्यवसाय बंद आहे.

देवगड : उपरच्या वा-यामुळे समुद्र खवळला असून महाकाय लाटा किना-यावर धडकत आहेत. समुद्रात वादळसदृश वातावरण निर्माण झाल्यामुळे मच्छीमारी व्यवसाय बंद आहे. १ जूनपासून समुद्रातील मासेमारी पूर्णत: बंद होणार आहे. मात्र शेवटच्या चार दिवसांतच मच्छीमार नौकांना वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे चार दिवसांतच मच्छीमारी हंगाम संपण्याच्या मार्गावर असून त्यादृष्टीने मच्छीमार आवराआवरीच्या तयारीला लागले आहेत.

मच्छीमारी हंगामाच्या अंतिम टप्प्यात यांत्रिक नौकांना  कोळंबी व लेप ही मासळी मिळत होती. मात्र मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे दर वधारले आहेत. त्यामुळे खवय्यांनी खाडीतील मासळी, मुळे, कालवे व सुकी मासळी विकत घेण्यावर भर दिला आहे. मासळी मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे नौका किना-यावर घेण्याचा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

मच्छीमार आता हंगाम संपत आल्याने जाळी धुणे, ती सुकविणे, फायबर पाती किना-यावर घेणे, ट्रॉलर्स किना-यावर घेणे व त्यानंतर त्यांची शाकारणी करणे आदी कामे करण्याच्या तयारीला लागले आहेत. हवामानाच्या अंदाजानुसार, मालवण ते वसई या किनाऱ्यांवर ०३ ते ०३.२ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये, असा इशारा भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेला आहे. याबाबतच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, सिंधुदुर्ग यांनी तालुका पातळीवर दिल्या आहेत.अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्यामुळे मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. वातावरण असेच पोषक राहिल्यास २९ मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर आठ दिवसांत मान्सून गोवा व सिंधुदुर्गात धडक देईल. अशी माहिती हवामान तज्ज्ञ दिनेश मिश्रा यांनी दिली. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याचा परिणाम मालवण किनारपट्टीवर झाला आहे. समुद्रात लाटांची उंची वाढली असून किनारपट्टीवर वाऱ्यांनीही जोर धरला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग