शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दूध खरेदी दरावरून पेच, पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 04:59 IST

दूध खरेदी दरावरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रतिलीटर २७ रुपयांच्या दराचा शेतक-यांचा आग्रह असून दूध संघांनी मात्र हा दर देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

मुंबई - दूध खरेदी दरावरून शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने राज्य सरकारसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. प्रतिलीटर २७ रुपयांच्या दराचा शेतक-यांचा आग्रह असून दूध संघांनी मात्र हा दर देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शेतकरी संप आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दूध खरेदी दरात वाढ केली होती. ग्राहकांवर अतिरिक्त बोजा न टाकता गायीचे दूध २७ तर म्हशीचे दूध ३६ रुपये प्रति लीटर अशी एकूण तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वाढीव दर देता येणार नसल्याचे सांगत राज्यातील दूध संघांनी दूधाचे संकलन बंद करून आंदोलन करण्याचाच इशारा दिला होता. त्या वेळी सरकारने बैठका घेत विषय तात्पुरता मिटवला होता. मात्र, दूध खरेदी दरात सातत्याने घसरण होत असल्याने शेतकºयांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. सध्या औरंगाबाद येथील शेतकºयांनी मोफत दूध देण्याचा मार्ग अवलंबिला आहे. तर किसान महासंघाने दूधपुरवठा बंद करत पुन्हा एकदा लाँग मार्च काढण्याचा इशारा दिला आहे. दुधाच्या खरेदी दरावर राज्य सरकारला पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हमीभाव नसताना दुधाच्या खरेदी दरात वाढ शक्य. एकतर सरकारने दुधाचे दर वाढवावेत किंवा खरेदी दरातील वाढीसाठी दूध संघांना अनुदान द्यावे, अशी दूध संघांची भूमिका आहे. राज्यातील बहुतांश दूध संघांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राज्य सरकारची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे. मध्यंतरी ‘आरे’ हाच एक ब्रँड बनविण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या पातळीवर सुरू होता. मात्र, त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. राज्यात रोज तीन कोटी लीटर दुधाची आवश्यकता असताना उत्पन्न मात्र ७५ लाख लीटर इतकेच आहे. मात्र, एकीकडे दुभत्या जनावरांवरील खर्च वाढत असताना खरेदी दरातील घसरणीमुळे दूध उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

टॅग्स :milkदूधMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीGovernmentसरकार