शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

दिवाळीच्या सुट्टीवरून शाळा संभ्रमात, शिक्षकांमध्ये नाराजी : परिपत्रक काढले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 03:44 IST

दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असूनही शाळांना किती दिवासाची सुटी आहे, याबाबत शालेय शिक्षण विभागाने स्पष्टता दिली नाही.

मुंबई : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असूनही शाळांना किती दिवासाची सुटी आहे, याबाबत शालेय शिक्षण विभागाने स्पष्टता दिली नाही. शाळांची सुटी कधी संपणार याबाबत विभागाने परिपत्रक काढले नसल्याने शाळा आणि शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे शिक्षक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.यंदा १६ आॅक्टोबरपासून शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या होणार आहेत. पण, शाळा पुन्हा कधी सुरु करायची, याबाबत अजूनही स्पष्टता दिलेली नाही. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शाळांना सुटी देण्यात आली होती. ही सुटी दिवाळीच्या सुटीत देण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, त्यामुळे दिवाळीची सुटी कमी झाल्याने शिक्षक नाराज आहेत. टीचर्स डेमोके्रटीक फ्रंटने (टीडीएफ) याविषयी तक्राक केली आहे. दरवर्षी दिवाळीची सुट्टी वीस दिवसांची असते. यंदा केवळ चौदा दिवसांचीच सुट्टी मिळेल, अशी भीती शिक्षक वतुर्ळात व्यक्त होत आहे.१६ आॅक्टोबरला दिवाळीची सुटी सुरु होणार आहे. पण, यंदा शाळा ६ नोव्हेंबरच्या आधीच सुरु होतील, अशी चर्चा सुरु आहे. काही शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, २ नोव्हेंबरलाच शाळा सुरु केल्या जातील.त्यामुळे यंदा विद्यार्थी व शिक्षकांना दिवाळीची सुट्टी फारच कमी मिळणार. सुट्ट्या कमी केल्या तर दिवाळीची सुट्टी केवळ सहामाही परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्यातच जातील. कुटुंबासाठी वेळ मिळणार नाही, अशी भीती शिक्षकांना सतावत आहे.

टॅग्स :diwaliदिवाळीSchoolशाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थी