शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

गरीबीला कंटाळून स्कॉलर विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: August 19, 2016 23:01 IST

दहावी बोर्ड परीक्षेत ९२टक्के गुण प्राप्त केलेल्या स्कॉलर विद्यार्थीनीने गरीबीला कंटाळून शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. १९ : दहावी बोर्ड परीक्षेत ९२टक्के गुण प्राप्त केलेल्या स्कॉलर विद्यार्थीनीने गरीबीला कंटाळून शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नवा मोंढा जाधववाडी येथील मयूरपार्क येथे ही घटना घडली.कल्याणी भरतसिंग जाधव(१६,रा. मयुरपार्क, जाधववाडी)असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कल्याणी ही जाधववाडी येथील सिंधू मेमोरीयल माध्यमिक विद्यालयातून यावर्षी दहावीमध्ये उत्तीर्ण झाली.

कोचिंग क्लासेसशिवाय तीने दहावी बोर्ड परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते. दहावीनंतर तिने छत्रपती महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. त्यांच्या घरची परिस्थिती अंत्यंत हालाखीची आहे. तिचे वडिल हॉटेलमध्ये सात हजार रुपये प्रति महिन्याने सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तर तिचा मोठा भाऊ निलेश बी.एस्सी.प्रथम वर्र्षात शिकत आहे. तो घरखर्चाला मदत व्हावी, यासाठी खाजगी कंपनीत रात्रपाळीची नोकरी करतो. कल्याणी ही सतत घरच्या हालाखीच्या परिस्थितीबाबत आईवडिल आणि भावाकडे चिंता व्यक्त करीत होती.

पोटाला चिमटा घेऊन तिच्या आईवडिलांनी नुकतेच घर बांधलेले आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने विज्ञान शाखेचा खर्च परवडणारा नाही. असे म्हणून तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. आज सकाळी नेहमीप्रमाणे तिचा भाऊ रात्रपाळीची ड्युटी करुन घरी आला आणि तो एका खोलीत झोपला. तर त्याचे वडिल ड्युटीला गेले होते. आई घरकामात व्यग्र होती.

यावेळी कल्याणीने खालच्या खोलीतील छताच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार दुपारी १२ वाजेच्या सुमारास लक्षात आल्यानंतर आरडाओरड झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी कल्याणीला तपासून मृत घोषित केले. याविषयी हर्सूल ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पो.निरीक्षक वसीम हाश्मी म्हणाले की, कल्याणी या गुणी विद्यार्थीनीने गरीबीला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने तिच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले.पोलीस उपायुक्तांनी केला होता सत्कारप्रतिकुल परिस्थितीत कल्याणीने ९२टक्के गुण संपादन केल्याबद्दल शाळेच्यावतीने २ आॅगस्ट रोजी मराठा मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंत तिचा सत्कार पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या हस्ते करण्यात आला होता. शाळेतील वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत ती सतत अव्वल राहात होती असे तिच्या शिक्षकांनी सांगितले.