शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

गरीबीला कंटाळून स्कॉलर विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: August 19, 2016 23:01 IST

दहावी बोर्ड परीक्षेत ९२टक्के गुण प्राप्त केलेल्या स्कॉलर विद्यार्थीनीने गरीबीला कंटाळून शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. १९ : दहावी बोर्ड परीक्षेत ९२टक्के गुण प्राप्त केलेल्या स्कॉलर विद्यार्थीनीने गरीबीला कंटाळून शुक्रवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नवा मोंढा जाधववाडी येथील मयूरपार्क येथे ही घटना घडली.कल्याणी भरतसिंग जाधव(१६,रा. मयुरपार्क, जाधववाडी)असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कल्याणी ही जाधववाडी येथील सिंधू मेमोरीयल माध्यमिक विद्यालयातून यावर्षी दहावीमध्ये उत्तीर्ण झाली.

कोचिंग क्लासेसशिवाय तीने दहावी बोर्ड परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते. दहावीनंतर तिने छत्रपती महाविद्यालयात अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. त्यांच्या घरची परिस्थिती अंत्यंत हालाखीची आहे. तिचे वडिल हॉटेलमध्ये सात हजार रुपये प्रति महिन्याने सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तर तिचा मोठा भाऊ निलेश बी.एस्सी.प्रथम वर्र्षात शिकत आहे. तो घरखर्चाला मदत व्हावी, यासाठी खाजगी कंपनीत रात्रपाळीची नोकरी करतो. कल्याणी ही सतत घरच्या हालाखीच्या परिस्थितीबाबत आईवडिल आणि भावाकडे चिंता व्यक्त करीत होती.

पोटाला चिमटा घेऊन तिच्या आईवडिलांनी नुकतेच घर बांधलेले आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने विज्ञान शाखेचा खर्च परवडणारा नाही. असे म्हणून तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. आज सकाळी नेहमीप्रमाणे तिचा भाऊ रात्रपाळीची ड्युटी करुन घरी आला आणि तो एका खोलीत झोपला. तर त्याचे वडिल ड्युटीला गेले होते. आई घरकामात व्यग्र होती.

यावेळी कल्याणीने खालच्या खोलीतील छताच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेतला. हा प्रकार दुपारी १२ वाजेच्या सुमारास लक्षात आल्यानंतर आरडाओरड झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी कल्याणीला तपासून मृत घोषित केले. याविषयी हर्सूल ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पो.निरीक्षक वसीम हाश्मी म्हणाले की, कल्याणी या गुणी विद्यार्थीनीने गरीबीला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने तिच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले.पोलीस उपायुक्तांनी केला होता सत्कारप्रतिकुल परिस्थितीत कल्याणीने ९२टक्के गुण संपादन केल्याबद्दल शाळेच्यावतीने २ आॅगस्ट रोजी मराठा मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंत तिचा सत्कार पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या हस्ते करण्यात आला होता. शाळेतील वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत ती सतत अव्वल राहात होती असे तिच्या शिक्षकांनी सांगितले.