शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार वेळा उचलला राजदंड, विधानसभेत प्रचंड गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 02:09 IST

मराठा आणि विशेषत: मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या काही विरोधी पक्ष आमदारांनी मंगळवारी विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड चार वेळा उचलला. काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम खान आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यात आघाडीवर होते.

मुंबई : मराठा आणि विशेषत: मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या काही विरोधी पक्ष आमदारांनी मंगळवारी विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड चार वेळा उचलला. काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम खान आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यात आघाडीवर होते.आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात गदारोळ, घोषणाबाजी सुरू असताना अस्लम खान यांनी अध्यक्षांच्या समोरील राजदंड उचलला आणि नंतर त्यांच्यासह समाजवादी पार्टीचे अबू आझमी, काँग्रेसचे आसीफ शेख, अमिन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील हे राजदंड उंचावून बराच वेळ सभागृहाला दाखवत होते.अस्लम शेख तेवढ्यावरच थांबले नाहीत ते सदस्यांच्या आसनाजवळ राजदंड घेऊन गेले आणि तो उलटा करून त्यांनी तो काठीसारखा हातात घेतला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना राजदंड परत देण्याची विनंती केली पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गदारोळात कामकाज तहकूब करण्यात आले. ते पुन्हा सुरू झाले तेव्हादेखील अस्लम शेख यांनी आणि तिसºया वेळी वारीस पठाण यांनी राजदंडउचलला.तिन्हीवेळा अध्यक्षांच्या खुर्चीत तालिका अध्यक्ष सुभाष साबणे होते. त्यांनी राजदंड उचलणाºया सदस्यांना आधी दोन वेळा कुठलीही समज दिली नाही. तिसºयांदा त्यांनी समज दिली.राजदंड मतदारसंघातनेऊ द्या - आव्हाडसभागृहात राजदंड पळवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज बंद व्हायला हवे होते मात्र अध्यक्षांनी सभागृह तहकुब केले नाही. प्रथा परंपरा तोडून मोडून टाकल्या जात असतील आणि राजदंड ही शोभेची वस्तू होत असेल तर मग मला तो मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीकेली.विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज परंपरेनुसार चालते. सभागृहात राजदंड उचलला गेला की सभागृह बंद होते. विरोधी पक्ष अखेरचे हत्यार केव्हा उचलतो जेव्हा त्यांच्या मागण्या मान्य होत नाही किंवा राज्यात गंभीर प्रश्न म्हणजेमुस्लिम, मराठा, धनगर आरक्षण असेल किंवा दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकार टोलवाटोलवी करते म्हटल्यावरविरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांकडे जावून मागणी केली व त्यानंतर राजदंड उचलला, असेही आव्हाड म्हणाले.विधान परिषदेतही गोंधळमराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान परिषदेत कामकाज रोखून धरले. सुरुवातीला दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडण्यास सुरुवात केली. आधी मदत जाहीर करावी आणि मराठा आरक्षण पटलावर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांचा प्रश्नशिवसेनेच्या नीलम गोºहे यांनी मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या विधवांचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. काँग्रेसचे भाई जगताप यांनी दुष्काळाकडे स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे लक्ष वेधले. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यावर निवेदन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी शाळांच्या अनुदानाचा विषय उपस्थित केला. त्यावर अधिवेशन संपण्यापूर्वीच कोणत्या शाळा पूर्ण अनुदानासाठी योग्य आहेत, हे जाहीर केले जाईल, असे तावडे म्हणाले. तावडेंच्या निवेदनानंतर तालिका सभापती जगन्नाथ शिंदे यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्र