शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

चार वेळा उचलला राजदंड, विधानसभेत प्रचंड गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 02:09 IST

मराठा आणि विशेषत: मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या काही विरोधी पक्ष आमदारांनी मंगळवारी विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड चार वेळा उचलला. काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम खान आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यात आघाडीवर होते.

मुंबई : मराठा आणि विशेषत: मुस्लिम आरक्षणावरून आक्रमक झालेल्या काही विरोधी पक्ष आमदारांनी मंगळवारी विधानसभेत अध्यक्षांसमोरील राजदंड चार वेळा उचलला. काँग्रेसचे मुंबईतील आमदार अस्लम खान आणि एमआयएमचे आमदार वारीस पठाण त्यात आघाडीवर होते.आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात गदारोळ, घोषणाबाजी सुरू असताना अस्लम खान यांनी अध्यक्षांच्या समोरील राजदंड उचलला आणि नंतर त्यांच्यासह समाजवादी पार्टीचे अबू आझमी, काँग्रेसचे आसीफ शेख, अमिन पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील हे राजदंड उंचावून बराच वेळ सभागृहाला दाखवत होते.अस्लम शेख तेवढ्यावरच थांबले नाहीत ते सदस्यांच्या आसनाजवळ राजदंड घेऊन गेले आणि तो उलटा करून त्यांनी तो काठीसारखा हातात घेतला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना राजदंड परत देण्याची विनंती केली पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गदारोळात कामकाज तहकूब करण्यात आले. ते पुन्हा सुरू झाले तेव्हादेखील अस्लम शेख यांनी आणि तिसºया वेळी वारीस पठाण यांनी राजदंडउचलला.तिन्हीवेळा अध्यक्षांच्या खुर्चीत तालिका अध्यक्ष सुभाष साबणे होते. त्यांनी राजदंड उचलणाºया सदस्यांना आधी दोन वेळा कुठलीही समज दिली नाही. तिसºयांदा त्यांनी समज दिली.राजदंड मतदारसंघातनेऊ द्या - आव्हाडसभागृहात राजदंड पळवला जातो याचा अर्थ सभागृहाचे कामकाज बंद व्हायला हवे होते मात्र अध्यक्षांनी सभागृह तहकुब केले नाही. प्रथा परंपरा तोडून मोडून टाकल्या जात असतील आणि राजदंड ही शोभेची वस्तू होत असेल तर मग मला तो मतदारसंघात नेऊ द्या, अशी मागणी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीकेली.विधानसभा आणि विधानपरिषदेचे कामकाज परंपरेनुसार चालते. सभागृहात राजदंड उचलला गेला की सभागृह बंद होते. विरोधी पक्ष अखेरचे हत्यार केव्हा उचलतो जेव्हा त्यांच्या मागण्या मान्य होत नाही किंवा राज्यात गंभीर प्रश्न म्हणजेमुस्लिम, मराठा, धनगर आरक्षण असेल किंवा दुष्काळाच्या मुद्द्यावर सरकार टोलवाटोलवी करते म्हटल्यावरविरोधी पक्षाच्या आमदारांनी अध्यक्षांकडे जावून मागणी केली व त्यानंतर राजदंड उचलला, असेही आव्हाड म्हणाले.विधान परिषदेतही गोंधळमराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विधान परिषदेत कामकाज रोखून धरले. सुरुवातीला दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडण्यास सुरुवात केली. आधी मदत जाहीर करावी आणि मराठा आरक्षण पटलावर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांचा प्रश्नशिवसेनेच्या नीलम गोºहे यांनी मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या विधवांचा प्रश्न औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला. काँग्रेसचे भाई जगताप यांनी दुष्काळाकडे स्थगन प्रस्तावाच्या सूचनेद्वारे लक्ष वेधले. सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यावर निवेदन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी शाळांच्या अनुदानाचा विषय उपस्थित केला. त्यावर अधिवेशन संपण्यापूर्वीच कोणत्या शाळा पूर्ण अनुदानासाठी योग्य आहेत, हे जाहीर केले जाईल, असे तावडे म्हणाले. तावडेंच्या निवेदनानंतर तालिका सभापती जगन्नाथ शिंदे यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्र