शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

‘दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार’ किरीट सोमय्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 13:09 IST

Kirit Somaiya News: तुम्ही लवंगी लावली मात्र मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचे घोटाळे समोर आणणार असल्याचा इशारा किरिट सोमय्या यांनी दिला आहे.

मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील नेत्यांना मोठा इशारा दिला आहे. तुम्ही लवंगी लावली मात्र मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचे घोटाळे समोर आणणार असल्याचा इशारा किरिट सोमय्या यांनी दिला आहे.

किरिट सोमय्या यावेळी म्हणाले की, दिवाळी येत आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात. पण किरिट सोमय्या दिवाळीनंतर फटाके वाजवणार आहे. एक दोन नाही तर पूर्ण आठ जणांचे फटाके फोडणार आहे. दिवाळी ते देवदिवाळी या काळात एक एक करून घोटाळे उघड केले जातील. यांनी गेले १२ दिवस नौटंकी केली. मात्र आता तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयांचे तीन घोटाळे बाहेर काढले जातील, असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. 

यांनी लवंगी फटाकडी लावली मात्र ती फुस्स झाली. राज्यात उघडकीस येत असलेल्या घोटाळ्यांवरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष विचलित करायचे होते. गेले १३ दिवस नवाब मलिक यांनी बेछूट आरोपांचे सत्र लावले आहे. आधी ट्विट करतात, मग फेसबुकवर जातात, मग पत्रकार परिषद घेतात. १३ दिवस चाललंय काय, समीर वानखेडे हिंदू नाही मुस्लिम, क्रांती रेडकर तुझं लग्न हिंदू पद्धतीनं झालं पण तुझा पती मुस्लिम आहे. त्याचा पहिला निकाह मुस्लिम पद्धतीने झालं होतं. त्याच समीरचे वडील ज्ञानदेव नाही तर दाऊद आहे. त्याचा बाप दाऊद नाही तर तुमच्या सरकारचे पालक असलेल्या शरद पवार यांना जाऊन विचारा की १९९३-१९९४ मध्ये दाऊदसोबत विमानाने कोण बसलं होतं ते?, अशी बोचरी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली.

ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. त्यांचा एक मंत्री गेले १३ दिवस हिंदू धर्माचा अपमान करतो, दलितांचा अपमान करतोय, समीर वानखेडेंच्या कुटुंबाचा अपमान करतो आहे, यांना महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. १३ दिवस तुम्ही नाटक केलं. आता या सरकारचं तेरावं आम्ही महाष्ट्रातील जनता मिळून घालू. समीर वानखेडेंनी काय केलंय, अधिकाऱ्यानं चूक केली असेल तर करा ना तक्रार. तक्रार केल्यावर केंद्राची टीम आली ना. ज्या पंचांनं कोट्यवधीच्या व्यवहाराची तक्रार केली, ती तरी आम्हाला द्या म्हटल्यावर यांची टरकली. मग यांनी काय केलं तर ते खोटं बोलणारे जे कुणी लबाड होते त्यांना अंडरग्राऊंड केलं, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण