शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

‘दिवाळीनंतर फटाके फोडणार, मंत्री आणि जावयांचे घोटाळे बाहेर आणणार’ किरीट सोमय्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 13:09 IST

Kirit Somaiya News: तुम्ही लवंगी लावली मात्र मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचे घोटाळे समोर आणणार असल्याचा इशारा किरिट सोमय्या यांनी दिला आहे.

मुंबई - राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून खळबळ उडवून देणारे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीमधील नेत्यांना मोठा इशारा दिला आहे. तुम्ही लवंगी लावली मात्र मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. तीन मंत्री आणि त्यांच्या तीन जावयांचे घोटाळे समोर आणणार असल्याचा इशारा किरिट सोमय्या यांनी दिला आहे.

किरिट सोमय्या यावेळी म्हणाले की, दिवाळी येत आहे. दिवाळीमध्ये फटाके फोडले जातात. पण किरिट सोमय्या दिवाळीनंतर फटाके वाजवणार आहे. एक दोन नाही तर पूर्ण आठ जणांचे फटाके फोडणार आहे. दिवाळी ते देवदिवाळी या काळात एक एक करून घोटाळे उघड केले जातील. यांनी गेले १२ दिवस नौटंकी केली. मात्र आता तीन मंत्र्यांचे तीन घोटाळे आणि जावयांचे तीन घोटाळे बाहेर काढले जातील, असा सूचक इशारा किरीट सोमय्या यांनी दिला. 

यांनी लवंगी फटाकडी लावली मात्र ती फुस्स झाली. राज्यात उघडकीस येत असलेल्या घोटाळ्यांवरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष विचलित करायचे होते. गेले १३ दिवस नवाब मलिक यांनी बेछूट आरोपांचे सत्र लावले आहे. आधी ट्विट करतात, मग फेसबुकवर जातात, मग पत्रकार परिषद घेतात. १३ दिवस चाललंय काय, समीर वानखेडे हिंदू नाही मुस्लिम, क्रांती रेडकर तुझं लग्न हिंदू पद्धतीनं झालं पण तुझा पती मुस्लिम आहे. त्याचा पहिला निकाह मुस्लिम पद्धतीने झालं होतं. त्याच समीरचे वडील ज्ञानदेव नाही तर दाऊद आहे. त्याचा बाप दाऊद नाही तर तुमच्या सरकारचे पालक असलेल्या शरद पवार यांना जाऊन विचारा की १९९३-१९९४ मध्ये दाऊदसोबत विमानाने कोण बसलं होतं ते?, अशी बोचरी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली.

ठाकरे आणि पवारांना लाज वाटली पाहिजे. त्यांचा एक मंत्री गेले १३ दिवस हिंदू धर्माचा अपमान करतो, दलितांचा अपमान करतोय, समीर वानखेडेंच्या कुटुंबाचा अपमान करतो आहे, यांना महाराष्ट्राची जनता सोडणार नाही. १३ दिवस तुम्ही नाटक केलं. आता या सरकारचं तेरावं आम्ही महाष्ट्रातील जनता मिळून घालू. समीर वानखेडेंनी काय केलंय, अधिकाऱ्यानं चूक केली असेल तर करा ना तक्रार. तक्रार केल्यावर केंद्राची टीम आली ना. ज्या पंचांनं कोट्यवधीच्या व्यवहाराची तक्रार केली, ती तरी आम्हाला द्या म्हटल्यावर यांची टरकली. मग यांनी काय केलं तर ते खोटं बोलणारे जे कुणी लबाड होते त्यांना अंडरग्राऊंड केलं, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला. 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण