शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सावित्रीच्या पुलाचे ४० बळी?

By admin | Updated: August 4, 2016 05:42 IST

मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टीने कोसळला.

जयंत धुळप/संदीप जाधव,

महाड- मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास अतिवृष्टीने कोसळला. नदीच्या प्रवाहात दोन एसटी बसेससह १५हून अधिक वाहने वाहून गेल्याची, तर ४० हून अधिक प्रवाशांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनेमुळे संपूर्ण कोकणात हाहाकार माजला असून एफडीआरएफ, सागरी तटरक्षक दल, नौदलासह पोलीस दलाकडून बेपत्ता प्रवाशांचे युद्धपातळीवरून शोधकार्य सुरू आहे. नौदलाची दोन हेलिकॉप्टर देखील वाहून गेलेली वाहने आणि त्यातील प्रवाशांचा दिवसभर शोध घेत होती. मात्र रात्री उशिरापर्यंत बसेस, खासगी वाहने वा प्रवासी यांच्यापैकी कोणाचाच शोध लागला नव्हता.दुर्घटनेत एसटी महामंडळाच्या जयगड-मुंबई आणि राजापूर-बोरीवली या दोन बसेस नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या असून, दोन बसेसमध्ये चालक-वाहकांसह एकूण ३० ते ३५ प्रवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली. त्यात जयगड बसचे चालक एस. एस. कांबळी, वाहक विलास देसाई (चिपळूण) व राजापूर बसचे वाहक जी. एस. मुंढे, वाहक पी. बी. शिर्के (सर्व रा. चिपळूण) यांचा समावेश आहे. याशिवाय खासगी कार तसेच अन्य वाहनांचा अद्याप तपास लागलेला नाही.>पूल दुर्घटनेची सखोल चौकशी करू - मुख्यमंत्री फडणवीसमुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री पूल कोसळल्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, या दुर्घटनेची सर्व स्तरावर सखोल चौकशी केली जाईल. एवढेच नव्हे तर राज्यभरात मुख्य मार्गावर असलेल्या सर्वच जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून, त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सायंकाळी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दुपारनंतर घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासमवेत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महाडचे आ. भरत गोगावले, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रशांत ठाकूर आदी नेते होते. >पंतप्रधानांकडून चौकशीया अपघाताचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री फ डणवीस यांच्याकडे त्याबाबत चौकशी केली. तसेच केंद्र सरकार हवी असलेली सर्व मदत करेल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. संसदेत हा विषय उपस्थित झाला असता, राजनाथ सिंग यांनीही केंद्र सरकारतर्फे शोध व मदतकार्यासाठी हवे ते सहकार्य करेल, असे सांगितले. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही रेल्वेतर्फे मदतीचे आश्वासन दिले.>शिवकृपा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांमुळे अन्य वाहने बचावलीनितीन माळी यांच्या मालकीचे शिवकृपा मोटर्स हे टाटा शोरूम तसेच ट्रान्सपोर्ट कार्यालय व कर्मचाऱ्यांचे निवासस्थानही या घटनास्थळाजवळच आहे. तेथील सूरजकुमार हा रात्री आपल्या नातेवाइकांशी मोबाइलवर बोलत असताना पुलासमोरच्या खिडकीत आला, त्याला पोलादपूरकडून येणारी वाहने व त्यांच्या हेडलाइट्स दिसत होत्या, मात्र काही क्षणांतच ही वाहने गायब होताना दिसत होती.त्याचवेळी त्याला मोठमोठे आवाज ऐकू येत होते. त्याने याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना जागे केले व महामार्गावरून पुलाकडे धाव घेतली. त्याचवेळी सावित्री पूल पूर्ण कोसळून खाली समोरून येणारी वाहने नदीत पडत असल्याचे लक्षात आले. सूरजकुमार आणि बसंतकुमार हे दोघे या पुलाच्या समांतर असलेल्या दुसऱ्या पुलावरून धावत गेले आणि महाडकडे येणारी वाहने थांबवली. त्यानंतर बसंतकुमार यांनी शिवकृपा मोटर्सचे व्यवस्थापक लाल गुप्ता यांना याबाबत फोनवरून माहिती दिली. गुप्ता यांनी त्वरित एमआयडीसी पोलीस निरीक्षक नंदकुमार सस्ते यांना दुर्घटनेची माहिती कळवली. त्यानंतर सस्ते यांच्यासह डीवायएसपी प्रांजली सोनावणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कोसळलेल्या पुलाच्या दिशेने येणारी वाहने थांबवली. >तिकीट मशिनचे नंबर ! : पूल कोसळल्यामुळे बेपत्ता झालेल्या जयगड- मुंबईया गाडीचे वाहक विलास देसाई यांच्याकडे सीपीएन ०५१००, तर राजापूर - बोरीवलीचे वाहक प्रभाकर शिर्के यांच्याकडे सीपीएन ०५०८१ नंबरच्या तिकीट मशिन्स होत्या. या मशिन्स जीपीआरएस यंत्रणेला जोडलेल्या आहेत. जीपीआरएस ट्रॅकिंगची व्यवस्था मुंबई सेंट्रल येथे उपलब्ध आहे. त्यामुळे ट्रेमधल्या किती तिकीट फाटल्या, यावरून कोणत्या स्थानकावर किती प्रवासी चढले याची माहिती मिळाली. त्यानुसार दोन बसेसमध्ये प्रत्येकी नऊ प्रवासी व चालक-वाहकांसह एकूण २२ जण होते, या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.