शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

राजकीय उंदीर-उड्या पाहून खऱ्याखुऱ्या उंदरांचं अधिवेशन भरतं तेव्हा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 02:53 IST

अखिल भारतीय मूषक महासंघाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिवेशन भरलेलं.

- सचिन जवळकोटेअखिल भारतीय मूषक महासंघाचं आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिवेशन भरलेलं. आजकाल गल्लीतल्या कॉलेजच्या वर्गातही जशी राष्ट्रीय परिषद भरविली जाते, तसाच काहीसा हा प्रकार. अकरा दिवसांची मंडपातली ड्यूटी संपवून ‘बाप्पा’ गावी गेल्यामुळं हे सारे उंदीर बांधवही सध्या निवांतच होते. गेल्या काही दिवसांपासून राजकारणात आयाराम-गयारामांची वर्दळ वाढल्यानंतर ‘उंदरांची नाहक बदनामी’ सुरू झाल्याचा साक्षात्कार एकाला झालेला. त्यापायी त्यानं पुढाकार घेऊन हे तातडीचं अधिवेशन बोलाविलेलं. दिव्याची वात कुरतडून उद्घाटन सोहळा संपन्न जाहला.संयोजक उंदरानं प्रास्ताविक सुरू केलं, ‘मूषक बांधवहोऽऽऽ मराठी माणसाच्या घरात वर्षभर आपल्याला झाडूखाली चिरडण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र भाद्रपद महिन्यात हीच मंडळी कौतुकानं आपली पूजा करतात. अकरा दिवस आपल्याला नैवेद्यही देतात. तरीही आपल्या जातभार्इंची बदनामी करण्याची मोहीम सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू झालीय. धरणं अन् कालव्यातली माती भुसभुशीत करणारे वेगळेच, मात्र त्याचं खापरही आपल्याच डोक्यावर फोडलं जातंय. जहाजातून उड्या मारणाऱ्या उंदरांशी राजकारणातल्या गयारामांचा संबंध जोडून आपल्या भावना नाहक दुखावल्या जाताहेत. तेव्हा आजच्या अधिवेशनात एकमुखानं याचा निषेध करू याऽऽ’.. मग काय, चिऽचीऽऽऽ आवाज करत निषेध नोंदविला गेला.अधिवेशनाचे अध्यक्ष ‘प्रथम उडीमारे’ बोलायला उभारले, ‘जहाजात खालच्या बाजूला आपण बिळं तयार करून ठेवली होती म्हणूनच जहाज बुडू लागलेलं. तेव्हा अधिक बिळं तयार होऊ नयेत म्हणून उंदरांनी जहाज वाचविण्यासाठीच स्वत:चं भवितव्य धोक्यात घातलेलं. खरंतर बुडत्या जहाजातून उडी मारणाºया उंदरांची ही कृती स्वार्थीपणाची नसून उलट त्यागाचंच प्रतीक आहे. ज्याचा तळ आजपावेतो भल्या-भल्यांना समजलेला नाही, अशा अथांग ‘लोटस्’ समुद्रात उडी घेणाºया उंदरांचा उलट गौरवच व्हायला हवा,’ तीनशे रुपये देऊन सभेत बसविलेल्या भाडोत्री कार्यकर्त्यांकडूनही पडल्या नसतील एवढ्या जोरात टाळ्या वाजल्या.सकाळच्या सत्रानंतर दुपारच्या भोजनाचा सोहळा रंगला. काही सिनियर उंदरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली. कारण, जहाजातून उडी मारण्याच्या क्रांतिकारी चळवळीतले ते आद्य पुरुष होते. पुढं काय होणार हे त्यांना इतर बांधवांपेक्षा खूप अगोदर लक्षात येत असतं म्हणे.. म्हणूनच ‘लोकसभा’वेळी यांनी आपली अदाकारी दाखविलेली. पलीकडं बसलेले दोन ‘गलेलठ्ठ’ उंदीर कुजबूजत होते, ‘शेतकऱ्यांची साखर खाऊन पोट भलतंच टम्म झालंय बुवा आपलं. आता इकडून-तिकडं उड्या मारायला बायकोनंच सांगितलंय,’ असं एक जण म्हणताच दुसरा पुटपुटला, ‘ईडीची कागदं चघळल्यानं मलाही कळ लागलेली. तेव्हा कमळाच्या पाकळ्या हुंगण्याचा सल्ला माझ्या मित्रांनी दिलाय.’एवढ्यात पंगतीतल्या काही उंदरांचं ताट रिकामंच राहिल्याची चर्चा सुरू झाली. मुंबईच्या ‘वर्षा’ बंगल्यावर हेलपाटे मारून-मारून थकलेल्या या उंदरांनी एकमेकांकडं मोठ्या केविलवाणेपणाने पाहिलं. ‘गेल्या एक महिन्यापासून आपल्याला विनाकारण खेळवलं जातंय,’ असंं त्यांना वाटू लागलेला भ्रम आता पक्क्या खात्रीत परावर्तीत झालेला. ‘साºयांच्याच ताटात तुकडे फेकले गेलेत. मग आपणच उपाशी का?’ असं एकानं विचारताच दुसरा हळूच कानात कुजबुजला, ‘पितृपक्ष सुरू आहे ना. आपल्या वाट्याचं म्हणे अगोदर कावळ्यांना देणार. तिथं शिल्लक राहिलं तर आपल्याला मिळणार !’ हे ऐकताच या अतृप्त उंदरांची चुळबुळ सुरू झाली. ‘एवढा घातक असेल पितृपक्ष, तर परवडला आपला जुनाच मातृपक्ष,’ म्हणत पुन्हा आपल्या घरी परतण्याची काही जणांनी तयारी सुरू केली. जय उंदीरऽऽ जय उडीमारे !

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019