शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

साताऱ्याची राजकीय स्थिती : सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 11:41 IST

उदयनराजे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांना जी अडचण राष्ट्रवादीत असताना होती तीच अडचण आता पुन्हा होण्याचा संभव आहे. तर रामराजे यांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचे म्हटले आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आजअखेर भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक दिवसांपासून उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. हो, नाही, हो नाही करत उदयनराजे यांनी दिल्लीत भाजपचा झेंडा हाती घेतली. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला धक्का बसलाच आहे. तर भाजपमध्ये गेलेले आणि भाजपच्या मार्गावर असलेल्या साताऱ्यातील नेत्यांना उदयनराजेंच्या निर्णयाने अडचण होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्रसिंहराजे आणि विधान परिषदचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी उघड उघड उदनयराजे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. तसेच उदनयराजे यांच्याविरुद्ध काम करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात जावून शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे यांच्या समजूत काढली होती. तसेच दोघांनाही उदयनराजे यांच्या विजयासाठी काम करण्यास तयार केले होते.

शरद पवार यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे अखेर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळी शांत झाली होती. त्याचा लाभ उदयनराजे यांनाच झाला. उदयनराजे यांनी विजय मिळवला. साताऱ्यात विजय झाला असला तरी देशात भाजपचा झालेला मोठा विजय विरोधकांना धडकी भरवणाराच होता. त्यामुळे अनेक नेत्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. मात्र लोकसभा निवडणुकीनंतरही साताऱ्यात उदयनराजे, शिवेंद्रसिंह राजे आणि रामराजे यांच्यात अंतर्गत कलह नव्याने सुरू झाला. यातून बाहेर पडण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर रामराजे निंबाळकरही भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. राष्ट्रवादी सोडण्यासाठी उभय नेत्यांकडे उदयनराजे हे एकमेव कारण होते.

दरम्यान उदयनराजे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांना जी अडचण राष्ट्रवादीत असताना होती तीच अडचण आता पुन्हा होण्याचा संभव आहे. तर रामराजे यांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचे म्हटले आहे. एकूणच साताऱ्यातील राजकीय स्थिती, 'सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली' अशीच काहीशी झाली आहे.