शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगे चक्क CM फडणवीसांच्या बाजूने बोलले; म्हणाले, “काही लोक अडचणीत आणतात, पण आमचा विश्वास”
2
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, शत्रूचे धाबे दणाणार; स्वदेशी तेजस MK1 A लढाऊ विमानाचं उड्डाण
3
करणी सेनेत अध्यक्ष, ३ वर्षात मंत्रिपद... वाचा रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबाची स्पेशल कहाणी
4
“सढळहस्ते मदत करायची सरकारची तयारी नाही, शेतकऱ्यांची दिवाळी काळी...”; शरद पवारांची टीका
5
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
6
रोज फक्त ३० रुपये वाचवून कोट्यधीश व्हा; काय आहे गुंतवणुकीचं सिक्रेट?
7
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
8
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
9
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
10
Rohit Sharma Viral Video : साधा सरळ आमचा दादा! चाहत्यांना भावली हिटमॅन रोहितची मराठी बोली
11
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
12
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीचा खास नैवेद्य: धणे आणि गूळच का? या पदार्थांमागचं गुपित काय?
13
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
14
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
15
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
16
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
17
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
18
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
19
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
20
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?

साताऱ्याची राजकीय स्थिती : सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 11:41 IST

उदयनराजे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांना जी अडचण राष्ट्रवादीत असताना होती तीच अडचण आता पुन्हा होण्याचा संभव आहे. तर रामराजे यांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचे म्हटले आहे.

- रवींद्र देशमुख

मुंबई - साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आजअखेर भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक दिवसांपासून उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. हो, नाही, हो नाही करत उदयनराजे यांनी दिल्लीत भाजपचा झेंडा हाती घेतली. त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला धक्का बसलाच आहे. तर भाजपमध्ये गेलेले आणि भाजपच्या मार्गावर असलेल्या साताऱ्यातील नेत्यांना उदयनराजेंच्या निर्णयाने अडचण होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला होता. उदयनराजे यांचे चुलत बंधू शिवेंद्रसिंहराजे आणि विधान परिषदचे अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांनी उघड उघड उदनयराजे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. तसेच उदनयराजे यांच्याविरुद्ध काम करण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी साताऱ्यात जावून शिवेंद्रसिंहराजे आणि रामराजे यांच्या समजूत काढली होती. तसेच दोघांनाही उदयनराजे यांच्या विजयासाठी काम करण्यास तयार केले होते.

शरद पवार यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे अखेर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळी शांत झाली होती. त्याचा लाभ उदयनराजे यांनाच झाला. उदयनराजे यांनी विजय मिळवला. साताऱ्यात विजय झाला असला तरी देशात भाजपचा झालेला मोठा विजय विरोधकांना धडकी भरवणाराच होता. त्यामुळे अनेक नेत्यांनी भाजपमध्ये जाणे पसंत केले. मात्र लोकसभा निवडणुकीनंतरही साताऱ्यात उदयनराजे, शिवेंद्रसिंह राजे आणि रामराजे यांच्यात अंतर्गत कलह नव्याने सुरू झाला. यातून बाहेर पडण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर रामराजे निंबाळकरही भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. राष्ट्रवादी सोडण्यासाठी उभय नेत्यांकडे उदयनराजे हे एकमेव कारण होते.

दरम्यान उदयनराजे यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे यांना जी अडचण राष्ट्रवादीत असताना होती तीच अडचण आता पुन्हा होण्याचा संभव आहे. तर रामराजे यांनी आपण पक्षांतर करणार नसल्याचे म्हटले आहे. एकूणच साताऱ्यातील राजकीय स्थिती, 'सासूपाई वाटणी केली अन् सासूच वाटणीला आली' अशीच काहीशी झाली आहे.