शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 14:29 IST

Ajit Pawar : रशिया युक्रेन युद्धाबाबत बोलताना अजित पवार यांनी साताऱ्याच्या सभेत पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं आहे.

Satara Loksabha Election :  राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. महायुतीचे नेते तुमचं हे उमेदवाराला नसून पंतप्रधान मोदी यांना आहे असं सांगत प्रचार करत आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून थेट पंतप्रधान मोदींच्या नावावर मतं मागितली जात आहेत. साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचे जोरदार कौतुक केलं. भाजप नेत्यांप्रमाणेच अजित पवार यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या फोननंतर रशिया युक्रेनचं युद्ध थांबल्याचे म्हटलं आहे.

भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळ युद्ध थांबवल्याचा दावा भाजप नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करण्यात येत आहे. यातच आता अजित पवार यांचीही भर पडली आहे. साताऱ्यातल्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी याचा उल्लेख केला. मुलांना युद्धातून बाहेर काढण्यासाठी मोदींना फोन केल्यानंतर त्यांनी तुम्ही काळजी करु नका असं म्हटल्याचे अजित पवार म्हणाले.

"दहा वर्षाच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदी यांच्यावर शितोंडा उडवण्याचे कोणाचेही उदाहरण दाखवता येणार नाही. आपल्या शेजारी पाकिस्तान कुरघोड्या करायचंय. पुलवामाला असा दणका दिला की पुन्हा पाकिस्तानाने आपल्याकडे पाहिलं नाही. गप गार बसला आहे.ज्यावेळेस आमची भारतातील मुलं मुली शिकायला युक्रेनला गेली होती. त्यावेळी रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरु झालं. तेव्हा रशियाचा मेन माणूस पुतीन. युद्ध सुरु झाल्यानंतर आमच्याकडे फोन यायला लागले की आमची मुलं तिथे शिक्षणासाठी गेले आहेत. आम्ही पंतप्रधान मोदींशी संपर्क साधल्यावर मोदींनी तुम्ही काळजी करु नका असं म्हटलं. तुम्ही चाट पडाल पण युक्रेनचं युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुतीन यांना फोन लावला आणि सांगितलं की भारतातील मुलं तिथं आहेत त्यामुळे तेवढ्या काळापुरतं युद्ध थांबवा. त्यामुळे युद्ध थांबलं आणि विशेष विमानं पाठवून सगळ्यांना सुरक्षित त्यांच्या जागी पोहोचवलं. हे येड्या गबाळ्याचे काम नाही. त्यासाठी धडाकेबाज नेता लागतो," असं अजित पवार म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनीही सांगितला होता किस्सा

देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही रशिया युक्रेन युद्धाबाबत एका प्रचारसभेत भाष्य केलं होतं. "जेव्हा रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू होते, त्यावेळी अनेक भारतीय मुले युक्रेनमध्ये शिकत होती. त्यानंतर मुलांच्या पालकांनी त्यांना युक्रेनमधून परत आणण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींना केले होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्षणाचाही विलंब न लावता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना फोन केला. त्यानंतर साडेचार तास युद्ध थांबले आणि भारताचे लोक परतले, असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीAjit Pawarअजित पवारRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन