शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

आधी पैसे उडवले, मग कार पेटवली अन् आता साडी नेसली; सरपंच मंगेश सांबळेंचं अनोखं आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 17:32 IST

२०२०-२१ काळात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ८० लाखाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र पाईपलाईन टाकूनही ४ वर्ष झाली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही असा आरोप त्यांनी केला.

छत्रपती संभाजीनगर - सरकारी अधिकाऱ्याने लाच मागितली म्हणून २ लाख रुपये कार्यालयाबाहेर उडवून प्रसिद्धी झोतात आलेले फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश सांबळे पुन्हा चर्चेत आले आहेत. जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर पुष्पा स्टाईल डोक्यावर कळशी घेत साडी घालून साबळे यांनी आंदोलन केले आहे. गावातील महिलांच्या पाणी प्रश्नांसाठी मंगेश साबळे यांनी हे अनोखे आंदोलन केले. सध्या या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गावातील पाणी प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगेश साबळे यांनी साडी घालून जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आंदोलन केले. गावकऱ्यांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागते. मागील ४ वर्षापासून गावात जल जीवन मिशनचं काम अपूर्ण आहे. या कामाकडे सरकारने लक्ष द्यावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या कार्यालयाबाहेर मंगेश सांबळे यांनी आंदोलन केले. २०२०-२१ काळात जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ८० लाखाचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र पाईपलाईन टाकूनही ४ वर्ष झाली तरी पाणीपुरवठा सुरू झाला नाही असा आरोप त्यांनी केला.

तसेच योजनेला निधी मिळतो, पण काम प्रत्यक्षात होत नाही. अधिकारी काम करत नाहीत. ४ वर्ष झाली, महिलांना प्यायला पाणी मिळत नाही यात काही भ्रष्टाचार झालाय का असा सवाल करत सरकारने नव्या घोषणा करण्याऐवजी आधीच्या योजनांची अंमलबजावणी करावी अशी मागणी सरपंच मंगेश साबळे यांनी केली. विशेष म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२८ पर्यंत जल जीवन मिशनला मुदतवाढ देण्याची घोषणा केली. त्यात १५ कोटी कुटुंबाला नळाद्वारे पाणी मिळत असल्याचं सांगण्यात आले. 

अनोख्या आंदोलनामुळे कायम चर्चेत

मंगेश साबळे हे त्यांच्या अनोख्या आंदोलनासाठी कायम चर्चेत असतात. सरकारी कार्यालयासमोर पैसे उधळणे, मराठा आरक्षणासाठी स्वत:ची नवी कोरी कार जाळणे यासारखे प्रकार केल्याने साबळे चर्चेत असतात. मंगेश साबळे यांच्या आंदोलनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघात मंगेश साबळे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मंगेश साबळेंचा पराभव झाला असला तरी त्यांना १ लाख ५५ हजार मते पडली होती. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई