शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बाहेरून दबाव, पक्षातून मात्र अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 06:40 IST

अजित पवारांशी चर्चेनंतर म्हणाले, राजीनामा मागितला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच खंडणी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढत असतानाच सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना तूर्तास अभय दिले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी करीत आहे. तसेच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये जो कोण दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली. नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच आपल्या खात्यात मागील काही दिवसांत मी जी पावले उचलली आहेत, त्याची माहिती देण्यासाठी आपण अजित पवारांना भेटल्याचे मुंडे यांनी या पत्रकारांना सांगितले. मला अजित पवारांनी राजीनामा मागितला नाही,  असे ते म्हणाले.

या प्रकरणावरून दिवसभरात एकापाठोपाठ घडामोडी घडल्या. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी राज्यपालांना भेटले, तर दुसरीकडे मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बीड प्रकरण लावून धरणाऱ्या व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली, तर छगन भुजबळ यांनी मुंडेंची पाठराखण करीत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

शरद पवारांचे फडणवीस यांना पत्र

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या  घटनेविरोधात  आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि  इतर सन्माननीय व्यक्तींच्या  जीवितास धोका निर्माण  होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन  त्यांना योग्य ते पोलिस संरक्षण राज्य सरकारमार्फत पुरविण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. 

मुंडे यांचा राजीनामा घ्या, राज्यपालांकडे मागणी

  • संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. हत्येत सहभागी असलेल्या सहआरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारे निवेदन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सोमवारी दिले.
  • विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आदी उपस्थित होते. 
  • देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण आहे. पोलिसांचा निष्काळजीपणा व पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 
  • देशमुख प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली. परंतु मुख्य गुन्हेगार वाल्मीक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. देशमुख प्रकरण दडपण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला.
टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडsarpanchसरपंच