शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बाहेरून दबाव, पक्षातून मात्र अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 06:40 IST

अजित पवारांशी चर्चेनंतर म्हणाले, राजीनामा मागितला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच खंडणी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढत असतानाच सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना तूर्तास अभय दिले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी करीत आहे. तसेच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये जो कोण दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली. नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच आपल्या खात्यात मागील काही दिवसांत मी जी पावले उचलली आहेत, त्याची माहिती देण्यासाठी आपण अजित पवारांना भेटल्याचे मुंडे यांनी या पत्रकारांना सांगितले. मला अजित पवारांनी राजीनामा मागितला नाही,  असे ते म्हणाले.

या प्रकरणावरून दिवसभरात एकापाठोपाठ घडामोडी घडल्या. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी राज्यपालांना भेटले, तर दुसरीकडे मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बीड प्रकरण लावून धरणाऱ्या व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली, तर छगन भुजबळ यांनी मुंडेंची पाठराखण करीत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

शरद पवारांचे फडणवीस यांना पत्र

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या  घटनेविरोधात  आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि  इतर सन्माननीय व्यक्तींच्या  जीवितास धोका निर्माण  होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन  त्यांना योग्य ते पोलिस संरक्षण राज्य सरकारमार्फत पुरविण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. 

मुंडे यांचा राजीनामा घ्या, राज्यपालांकडे मागणी

  • संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. हत्येत सहभागी असलेल्या सहआरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारे निवेदन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सोमवारी दिले.
  • विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आदी उपस्थित होते. 
  • देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण आहे. पोलिसांचा निष्काळजीपणा व पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 
  • देशमुख प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली. परंतु मुख्य गुन्हेगार वाल्मीक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. देशमुख प्रकरण दडपण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला.
टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडsarpanchसरपंच