शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बाहेरून दबाव, पक्षातून मात्र अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 06:40 IST

अजित पवारांशी चर्चेनंतर म्हणाले, राजीनामा मागितला नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच खंडणी प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबाव वाढत असतानाच सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना तूर्तास अभय दिले आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी, सीआयडी करीत आहे. तसेच न्यायालयीन चौकशी सुरू आहे. या चौकशीमध्ये जो कोण दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. रात्री त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली. नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच आपल्या खात्यात मागील काही दिवसांत मी जी पावले उचलली आहेत, त्याची माहिती देण्यासाठी आपण अजित पवारांना भेटल्याचे मुंडे यांनी या पत्रकारांना सांगितले. मला अजित पवारांनी राजीनामा मागितला नाही,  असे ते म्हणाले.

या प्रकरणावरून दिवसभरात एकापाठोपाठ घडामोडी घडल्या. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी राज्यपालांना भेटले, तर दुसरीकडे मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. बीड प्रकरण लावून धरणाऱ्या व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्याची मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली, तर छगन भुजबळ यांनी मुंडेंची पाठराखण करीत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

शरद पवारांचे फडणवीस यांना पत्र

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या  घटनेविरोधात  आवाज उठविणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि  इतर सन्माननीय व्यक्तींच्या  जीवितास धोका निर्माण  होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन  त्यांना योग्य ते पोलिस संरक्षण राज्य सरकारमार्फत पुरविण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. 

मुंडे यांचा राजीनामा घ्या, राज्यपालांकडे मागणी

  • संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. हत्येत सहभागी असलेल्या सहआरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करणारे निवेदन सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सोमवारी दिले.
  • विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, भाजप आमदार सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आदी उपस्थित होते. 
  • देशमुख प्रकरण हे बीडमधील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचे उदाहरण आहे. पोलिसांचा निष्काळजीपणा व पक्षपातीपणामुळे बीड जिल्ह्यात अशांतता पसरली आहे. राज्यभरातील सार्वजनिक सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 
  • देशमुख प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली. परंतु मुख्य गुन्हेगार वाल्मीक कराड याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. देशमुख प्रकरण दडपण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला.
टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडsarpanchसरपंच