शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 19:06 IST

Devendra Fadnavis on Sanjay Shirsat Statement: सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाने राजकीय आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाटांची पाठराखण केली आहे. 

Devendra Fadnavis Sanjay Shirsat Latest News: "सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?" सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या या विधानाने विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आणि त्यामुळे महायुती सरकार टीकेचे धनी ठरले आहे. संजय शिरसाट यांच्या विधानावरून विरोधकांकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केलं गेलं. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. सगळ्यांना मंत्र्यांना तंबी दिली गेली, त्यानंतर आता संजय शिरसाट आणि मेघना बोर्डीकर यांनी विधाने केली आहेत, असे मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले. 

संजय शिरसाटांची मुख्यमंत्री फडणवीसांकडून पाठराखण

शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतं की, मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधी कधी गंमतीने पण बोलतात. आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो, तर हे काही योग्य नाहीये."

फडणवीस म्हणाले, "संजय शिरसाटांना माझा सल्ला आहे की, त्यांनी..."

"माध्यमांनाही माझी विनंती आहे की, काही विधाने ही गंभीर असतात आणि ती चुकीची असतात. पण, आता शिरसाट जे बोलले, त्यांचा हेतू मला काही चुकीचा वाटत नाही. तरी मी त्यांना सल्ला देईन की, त्यांनी थोडं संयम ठेवूनच बोललं पाहिजे. मेघना बोर्डीकरांच्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आहे. त्यांचं म्हणणं आहे की, मी जे बोलले ते अर्धवट दाखवलं जात आहे. सगळी माहिती त्या मला भेटून देणार आहेत", असे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 

मंत्र्यांमुळे महायुतीचे सरकार वादात

गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे, भरत गोगावले, संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप झाले. त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली गेली. 

मंत्र्यांकडून बेजबाबदार विधाने आणि वर्तन  केले जात असल्याच्या मुद्द्यावर काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. जपून बोलण्याचा आणि माध्यमांशी कामाबद्दलच बोलण्याची सूचना फडणवीसांकडून केली गेली. त्यानंतर संजय शिरसाट यांच्या विधानाने पुन्हा तोच मुद्दा चर्चेत आला आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Shirsatसंजय शिरसाटMahayutiमहायुतीPoliticsराजकारण