शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 11:16 IST

जनता मिंधे गटाच्या नावानं शिमगा करत आहे. सरकारविरोधात जी कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे, असेही राऊत म्हणाले.   

शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन त्यांच्या यात्रेमध्ये भाजपचे भाडोत्री लोक फिरत होते. त्यांना धनुष्यबाण पेलवणार आहे का ? हा प्रश्न काल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. काल कोकणात अति विराट अशी सभा होती. या सभेनंतर अनेकांचे बोल बिघडले आहेत. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव जरी चोरलं असलं तरी लाखो शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहेत.  ही खोक्याने विकत घेतलेली जनता नव्हती. कालच्या सभेनंतर महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झाला आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपावर तोंडसुख घेतले. 

कोकण आणि शिवसेनेत अतूट नातं आहे हे स्पष्ट दिसले. आता मालेगावला उत्तर महाराष्ट्रात सभा होईल. शिवसेना ही निवडणूक आयोगाच्या बापाची नाही आहे.  जी उचलावी आणि कोणाला द्यावी ही जनतेची आहे. ते काय म्हणतात त्याला उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही. त्यांचे स्क्रिप्ट भारतीय जनता पक्षाने लिहून दिलेले होते. त्यानुसार मिंधे गटाचे लोक बोलतात, अशी टीका राऊत यांनी केली. 

जनता मिंधे गटाच्या नावानं शिमगा करत आहे. सरकारविरोधात जी कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. ही काही लोकशाही नाही ही तानाशाही आहे. जनतेसमोर आणि पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडणे हे आमचे काम आहे. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे, असेही राऊत म्हणाले.   

धीरज देशमुख यांच्या जय बेळगावी जय कर्नाटक या घोषणेवर राऊत यांनी मत मांडले आहे. मला याविषयी माहिती नाही. जनतेच्या भावना, महाराष्ट्राच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणायला काही अडचण असेल तर त्यांनी त्या भागात जाऊ नये. जनतेच्या भावनांचा आदर करायला हवा, असा सल्लाही राऊतांनी दिला. 

मोदी सरकारविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. ही संघर्षाची लढाई आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवे. आप असुद्यात की काँग्रेस असुद्यात. तेजस्वी यादव, अखिलेश यादव या सगळ्यांनी आता एकत्र यायला हवे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDhiraj Deshmukhधीरज देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे