शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Sanjay Raut: पुढची सभा मालेगावमध्ये, धीरज देशमुखांनाही 'जय बेळगावी'वरून संजय राऊतांचा मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 11:16 IST

जनता मिंधे गटाच्या नावानं शिमगा करत आहे. सरकारविरोधात जी कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे, असेही राऊत म्हणाले.   

शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन त्यांच्या यात्रेमध्ये भाजपचे भाडोत्री लोक फिरत होते. त्यांना धनुष्यबाण पेलवणार आहे का ? हा प्रश्न काल उद्धव ठाकरे यांनी विचारला होता. काल कोकणात अति विराट अशी सभा होती. या सभेनंतर अनेकांचे बोल बिघडले आहेत. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव जरी चोरलं असलं तरी लाखो शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहेत.  ही खोक्याने विकत घेतलेली जनता नव्हती. कालच्या सभेनंतर महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झाला आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी शिंदे गट आणि भाजपावर तोंडसुख घेतले. 

कोकण आणि शिवसेनेत अतूट नातं आहे हे स्पष्ट दिसले. आता मालेगावला उत्तर महाराष्ट्रात सभा होईल. शिवसेना ही निवडणूक आयोगाच्या बापाची नाही आहे.  जी उचलावी आणि कोणाला द्यावी ही जनतेची आहे. ते काय म्हणतात त्याला उत्तर द्यायची मला गरज वाटत नाही. त्यांचे स्क्रिप्ट भारतीय जनता पक्षाने लिहून दिलेले होते. त्यानुसार मिंधे गटाचे लोक बोलतात, अशी टीका राऊत यांनी केली. 

जनता मिंधे गटाच्या नावानं शिमगा करत आहे. सरकारविरोधात जी कोणी बोलतो त्यावर सीबीआय, इडी याचे हल्ले होत आहेत. ही काही लोकशाही नाही ही तानाशाही आहे. जनतेसमोर आणि पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडणे हे आमचे काम आहे. लोकशाही धोक्यात नाही जवळपास संपली आहे, असेही राऊत म्हणाले.   

धीरज देशमुख यांच्या जय बेळगावी जय कर्नाटक या घोषणेवर राऊत यांनी मत मांडले आहे. मला याविषयी माहिती नाही. जनतेच्या भावना, महाराष्ट्राच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. बेळगावमध्ये जय महाराष्ट्र म्हणायला काही अडचण असेल तर त्यांनी त्या भागात जाऊ नये. जनतेच्या भावनांचा आदर करायला हवा, असा सल्लाही राऊतांनी दिला. 

मोदी सरकारविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे. ही संघर्षाची लढाई आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढायला हवे. आप असुद्यात की काँग्रेस असुद्यात. तेजस्वी यादव, अखिलेश यादव या सगळ्यांनी आता एकत्र यायला हवे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDhiraj Deshmukhधीरज देशमुखUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे