शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांनी एकनाथ शिंदे-अजित पवारांची उडवली खिल्ली; देवेंद्र फडणवीसांवरही बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 11:29 IST

५०-५० खोके आले कुठून? साताऱ्यात दरेगावात झाडे लागली आहेत का? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे.

मुंबई – राज्य सरकारची नाडी दिल्लीत आहे. ते कधीही खेचतात, ओढतात त्यानंतर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पळत पळत दिल्लीत जातात. इथं सरकारी रुग्णालयात लोकं मरतायेत, गेल्या ८ दिवसांत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. नागपूर, नांदेड, छ.संभाजीनगर इथं रुग्ण मृत्यूमुखी पडलेत. जितके लोक नक्षलवादी हल्ल्यात गेले नाहीत तितके शासकीय रुग्णालयात मेलेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, शासकीय रुग्णालयातील मृत्यूची जबाबदारी सरकारची नाही का? कधी विचारावं तेव्हा मुख्यमंत्री कुठे आहेत तर दिल्लीत गेलेत, अमित शाहांना भेटायला गेलेत. मुख्यमंत्री महाराष्ट्र सदनात बसलेत. इथे कोण आहे? सरकार कोण चालवणार? या मृत्यूला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस मदारी आहे आणि २ माकडं नाचयातेत. त्यांच्या हातात काय आहे? सरकारची नाडी दिल्लीला आहे त्यामुळे सारखे दिल्लीत जातात असं त्यांनी सांगितले.

तर महाराष्ट्रातील सरकार हे ना एकनाथ शिंदे, ना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी आणलंय, हे सरकार दिल्लीतून ईडीने आणले आहे. सीबीआयने, इन्कम टॅक्सने आणले आहे. अजित पवार का पळून गेले हे शरद पवारांनी सांगितले. घाबरून पळाले ते. मुख्यमंत्री रात्री १२ वाजता शाहांना भेटायला जातात. नड्डा यांच्या स्वागताचे बॅनर्स मुख्यमंत्री मुंबईत लावतात. ही वेळ तुमच्यावर आली आहे. भाजपा नेत्याच्या स्वागताचे बोर्ड आपण लावताय. तुम्ही स्वत:ला शिवसेना म्हणवता मग हे कुठून आले? हा चायना मेड माल आहे, चायनाची शिवसेना आहे अशी टीका संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केली.

दरम्यान, एकनाथ शिंदेंना ईडी, सीबीआयने फोडलं आहे. देवेंद्र फडणवीस डमरु वाजवतायेत आणि २ माकडे नाचताय. ५०-५० खोके आले कुठून? साताऱ्यात दरेगावात झाडे लागली आहेत का? महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अत्यंत बिकट आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कोरोना काळात महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा उत्तमप्रकारे सांभाळली, जगाने त्याची दखल घेतली. तुम्ही आम्हाला काय सांगताय असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

भाजपानं ज्यांच्यावर आरोप केले ते आज उच्च पदावर

राहुल कुल ५०० कोटींचे मनी लॉन्ड्रिंग, दादा भुसे यांच्यावर आरोप आहेत. हसन मुश्रीफांना जेलमध्ये पाठवणार होते, पण ते मंत्रिमंडळात गेले. अनेकांवर आरोप आहेत. मुश्रीफांना जेलमध्ये भाजपावालेच टाकायला गेले होते, हायकोर्टाचे ताशेरे ओढले आहेत. भाजपा नेत्याने ज्याच्यावर आरोप केले ते सगळे भाजपा सरकारमध्ये उच्च पदावर आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊत