शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

Sanjay Raut : "'वन नेशन, वन इलेक्शन'च्या आधी देशात..."; संजय राऊतांचं सरकारला चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 12:11 IST

Sanjay Raut Slams Modi Government : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' यासंदर्भात शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. एक देश, एक निवडणूकसाठी मोदी सरकारने समिती स्थापन केली आहे. याचे नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश असेल. एक देश, एक निवडणूक यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या आधी देशात 'फेअर इलेक्शन' व्हायला पाहिजे असं म्हटलं आहे. 

गणेशोत्सवादरम्यान मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यावरुनही राऊत यांनी निशाणा साधला आहे. "मोदी सरकारने वन नेशन, वन इलेक्शनचा एक नवा फुगा हवेत सोडलेला आहे. वन नेशन, वन इलेक्शनच्या आधी देशात ‘फेअर इलेक्शन’ व्हायला पाहिजे. देशात भ्रष्ट निवडणूक आयोग काम करत आहे. जोपर्यंत दबावात काम करणारे भ्रष्ट निवडणूक आयोग आहे तोपर्यंत देशात फेअर इलेक्शन होणार नाही. त्यामुळे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा राजकीय फंडा असून ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे."

"इंडिया आघाडीच्या ताकदीला मोदी सरकार घाबरले असून त्यातून त्यांना हे सूचत आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचे हे षडयंत्र असावं. इंडिया आघाडीला घाबरल्याने सरकार नवनवीन फंडे घेऊन येत आहेत. आता त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. जेव्हा अधिवेशन सुरू असते तेव्हा पंतप्रधान येत नाही, सरकारकडून अधिवेशन चालू दिले जात नाही. आता गणेशोत्सवात अधिवेशन घ्यायला कोणता अमृतकाळ आला आहे? महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. यादरम्यान अधिवेशन घेतल्याने महाराष्ट्रातील खासदार तिथे पोहचू शकणार नाहीत आणि आपले म्हणणेही मांडू शकणार नाहीत" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

एक देश, एक निवडणूक यावर केंद्र सरकारचा हेतू स्पष्ट नाही. त्याची आता गरज नाही. बेरोजगारी आणि महागाईचे निदान आधी केले पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. अचानक अधिवेशन जाहीर केल्याने या पाच दिवसांत मोदी सरकार कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सुरु झाली आहे.  18 ते 22 सप्टेंबरपर्यंत या अधिवेशनाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. 17व्या लोकसभेचे हे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असणार आहे 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकPoliticsराजकारण