शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : "'वन नेशन, वन इलेक्शन'च्या आधी देशात..."; संजय राऊतांचं सरकारला चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 12:11 IST

Sanjay Raut Slams Modi Government : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' यासंदर्भात शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. एक देश, एक निवडणूकसाठी मोदी सरकारने समिती स्थापन केली आहे. याचे नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश असेल. एक देश, एक निवडणूक यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या आधी देशात 'फेअर इलेक्शन' व्हायला पाहिजे असं म्हटलं आहे. 

गणेशोत्सवादरम्यान मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यावरुनही राऊत यांनी निशाणा साधला आहे. "मोदी सरकारने वन नेशन, वन इलेक्शनचा एक नवा फुगा हवेत सोडलेला आहे. वन नेशन, वन इलेक्शनच्या आधी देशात ‘फेअर इलेक्शन’ व्हायला पाहिजे. देशात भ्रष्ट निवडणूक आयोग काम करत आहे. जोपर्यंत दबावात काम करणारे भ्रष्ट निवडणूक आयोग आहे तोपर्यंत देशात फेअर इलेक्शन होणार नाही. त्यामुळे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा राजकीय फंडा असून ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे."

"इंडिया आघाडीच्या ताकदीला मोदी सरकार घाबरले असून त्यातून त्यांना हे सूचत आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचे हे षडयंत्र असावं. इंडिया आघाडीला घाबरल्याने सरकार नवनवीन फंडे घेऊन येत आहेत. आता त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. जेव्हा अधिवेशन सुरू असते तेव्हा पंतप्रधान येत नाही, सरकारकडून अधिवेशन चालू दिले जात नाही. आता गणेशोत्सवात अधिवेशन घ्यायला कोणता अमृतकाळ आला आहे? महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. यादरम्यान अधिवेशन घेतल्याने महाराष्ट्रातील खासदार तिथे पोहचू शकणार नाहीत आणि आपले म्हणणेही मांडू शकणार नाहीत" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

एक देश, एक निवडणूक यावर केंद्र सरकारचा हेतू स्पष्ट नाही. त्याची आता गरज नाही. बेरोजगारी आणि महागाईचे निदान आधी केले पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. अचानक अधिवेशन जाहीर केल्याने या पाच दिवसांत मोदी सरकार कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सुरु झाली आहे.  18 ते 22 सप्टेंबरपर्यंत या अधिवेशनाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. 17व्या लोकसभेचे हे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असणार आहे 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकPoliticsराजकारण