शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut : "'वन नेशन, वन इलेक्शन'च्या आधी देशात..."; संजय राऊतांचं सरकारला चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 12:11 IST

Sanjay Raut Slams Modi Government : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

मोदी सरकारने 'एक देश, एक निवडणूक' यासंदर्भात शुक्रवारी मोठा निर्णय घेतला आहे. एक देश, एक निवडणूकसाठी मोदी सरकारने समिती स्थापन केली आहे. याचे नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश असेल. एक देश, एक निवडणूक यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 'वन नेशन, वन इलेक्शन'च्या आधी देशात 'फेअर इलेक्शन' व्हायला पाहिजे असं म्हटलं आहे. 

गणेशोत्सवादरम्यान मोदी सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. यावरुनही राऊत यांनी निशाणा साधला आहे. "मोदी सरकारने वन नेशन, वन इलेक्शनचा एक नवा फुगा हवेत सोडलेला आहे. वन नेशन, वन इलेक्शनच्या आधी देशात ‘फेअर इलेक्शन’ व्हायला पाहिजे. देशात भ्रष्ट निवडणूक आयोग काम करत आहे. जोपर्यंत दबावात काम करणारे भ्रष्ट निवडणूक आयोग आहे तोपर्यंत देशात फेअर इलेक्शन होणार नाही. त्यामुळे ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा राजकीय फंडा असून ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीवरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे."

"इंडिया आघाडीच्या ताकदीला मोदी सरकार घाबरले असून त्यातून त्यांना हे सूचत आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचे हे षडयंत्र असावं. इंडिया आघाडीला घाबरल्याने सरकार नवनवीन फंडे घेऊन येत आहेत. आता त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. जेव्हा अधिवेशन सुरू असते तेव्हा पंतप्रधान येत नाही, सरकारकडून अधिवेशन चालू दिले जात नाही. आता गणेशोत्सवात अधिवेशन घ्यायला कोणता अमृतकाळ आला आहे? महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. यादरम्यान अधिवेशन घेतल्याने महाराष्ट्रातील खासदार तिथे पोहचू शकणार नाहीत आणि आपले म्हणणेही मांडू शकणार नाहीत" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

एक देश, एक निवडणूक यावर केंद्र सरकारचा हेतू स्पष्ट नाही. त्याची आता गरज नाही. बेरोजगारी आणि महागाईचे निदान आधी केले पाहिजे, अशी टीका काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले आहे. अचानक अधिवेशन जाहीर केल्याने या पाच दिवसांत मोदी सरकार कोणता मास्टरस्ट्रोक खेळणार याची चर्चा सुरु झाली आहे.  18 ते 22 सप्टेंबरपर्यंत या अधिवेशनाचा कालावधी ठेवण्यात आला आहे. 17व्या लोकसभेचे हे 13वे आणि राज्यसभेचे 261वे अधिवेशन असणार आहे 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकPoliticsराजकारण