शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Sanjay Raut: "...तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल", संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 13:02 IST

Sanjay Raut: ''आमची हत्यारे तयार, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही.''

मुंबई: हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोग्यांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते सजंय राऊत(Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करण्यात आली आहे. भाजप जाती, धर्माच्या नावावर राज्यातील वातावरण खराब करत असल्याची टीका राऊतांनी केली.

'...तर त्यांनाही पाण्यात बुडवावं लागेल'संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल,'' असं संजय राऊत म्हणाले. तसेच, ''काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत,'' असंही ते म्हणाले.

'दोन घाव बसले तर...'''शिवसेना कधीही समोरुन वार करते आणि छातीवर वार झेलते. आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही, लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत. आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यारं आमचीच आहेत आणि ती धारंधार आहेत, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही,'' असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

'राज्याच्या बदनामीचा कट'ते पुढे म्हणतात की, ''जशास तसं उत्तर देणं शिवसेनेचा स्वभाव आहे. आम्हाला त्याचं बाळकडूचं मिळालं आहे. शिवसेनेच्या बदनामीचा आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असमाजिक संघटना, तत्व या ठिकाणी एकत्र येऊन सुरू केलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे. या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे, असं पक्ष प्रमुखांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरे जाण्यासाठी तयार आहे," असही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा