शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

Sanjay Raut: "...तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल", संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 13:02 IST

Sanjay Raut: ''आमची हत्यारे तयार, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही.''

मुंबई: हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोग्यांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते सजंय राऊत(Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करण्यात आली आहे. भाजप जाती, धर्माच्या नावावर राज्यातील वातावरण खराब करत असल्याची टीका राऊतांनी केली.

'...तर त्यांनाही पाण्यात बुडवावं लागेल'संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल,'' असं संजय राऊत म्हणाले. तसेच, ''काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत,'' असंही ते म्हणाले.

'दोन घाव बसले तर...'''शिवसेना कधीही समोरुन वार करते आणि छातीवर वार झेलते. आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही, लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत. आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यारं आमचीच आहेत आणि ती धारंधार आहेत, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही,'' असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

'राज्याच्या बदनामीचा कट'ते पुढे म्हणतात की, ''जशास तसं उत्तर देणं शिवसेनेचा स्वभाव आहे. आम्हाला त्याचं बाळकडूचं मिळालं आहे. शिवसेनेच्या बदनामीचा आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असमाजिक संघटना, तत्व या ठिकाणी एकत्र येऊन सुरू केलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे. या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे, असं पक्ष प्रमुखांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरे जाण्यासाठी तयार आहे," असही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा