शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Sanjay Raut: "...तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल", संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 13:02 IST

Sanjay Raut: ''आमची हत्यारे तयार, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही.''

मुंबई: हनुमान चालीसा आणि मशिदीवरील भोग्यांमुळे राज्यातील राजकारण तापले आहे. या मुद्द्यावरुन भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते सजंय राऊत(Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करण्यात आली आहे. भाजप जाती, धर्माच्या नावावर राज्यातील वातावरण खराब करत असल्याची टीका राऊतांनी केली.

'...तर त्यांनाही पाण्यात बुडवावं लागेल'संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, "आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला. पण जर पाणी डोक्यावरून जाणार असेल, तर त्याच पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल,'' असं संजय राऊत म्हणाले. तसेच, ''काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत,'' असंही ते म्हणाले.

'दोन घाव बसले तर...'''शिवसेना कधीही समोरुन वार करते आणि छातीवर वार झेलते. आम्हाला लढण्याचं प्रशिक्षण देण्याची गरज नाही, लढण्यासाठी आम्हाला भाडोत्री लोक देखील लागत नाहीत. आम्ही दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून लढत नाही. आमची हत्यारं आमचीच आहेत आणि ती धारंधार आहेत, दोन घाव बसले तर समोरचा पाणी मागणार नाही,'' असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

'राज्याच्या बदनामीचा कट'ते पुढे म्हणतात की, ''जशास तसं उत्तर देणं शिवसेनेचा स्वभाव आहे. आम्हाला त्याचं बाळकडूचं मिळालं आहे. शिवसेनेच्या बदनामीचा आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असमाजिक संघटना, तत्व या ठिकाणी एकत्र येऊन सुरू केलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे. या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे, असं पक्ष प्रमुखांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाला शिवसेना सामोरे जाण्यासाठी तयार आहे," असही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपा