शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; संजय राऊतांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 13:52 IST

"कुत्र्यापुढे हाडून फेकावं त्याप्रमाणे..."; वाचा कोणत्या मुद्द्यावर केलं भाष्य

सध्या लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाराष्ट्रात रोज नवनव्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. तशातच महायुतीमध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी एकेरी जागांवरच समाधान मानायला सांगत असल्याच्या बातम्या येत आहेत. या मुद्द्यावरून आज संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. त्यांना लोकसभेच्या जागांसाठी दिल्ली भांडी घासावी लागतात, असे ते म्हणाले.

कुत्र्यापुढे हाडून फेकावं त्याप्रमाणे...

ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली म्हणतात त्यांना वेळोवेळी दिल्लीत जावे लागते. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना लोकसभेच्या जागांसाठी दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासावी लागतात. डुप्लिकेट शिवसेनेची अशी अवस्था होणार हे निश्चित आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अभिमानाने आतापर्यंत लोकसभेच्या २३ जागा लढल्या आहेत. यावेळीही लढणार आहोत. डुप्लिकेट शिवसेनेच्या वाट्याला ५ जागाही येत नाहीत. पाच जागांचे तुकडे कुत्र्यापुढे हाडूक फेकावं त्याप्रमाणे फेकल्याची बातमी मी वाचतोय," अशी अतिशय बोचरी टीका संजय राऊतांनी शिंदे गटाबाबत बोलताना केली.

तुम्ही भांडत बसा त्यांची!

"अजित पवारांची दोन-चार जागांवरच बोळवण करतायत (असंही मी ऐकलं). डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये. यांचा अस्त जवळ आला आहे. व्यापाऱ्यांपुढे ते काय जोर लावणार, त्यांच्यात एवढी हिंमत आहे का? जोर लावून दाखवावा. आम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडलो. तुम्ही भांडत बसा त्यांची..", असा टोला त्यांनी लगावला.

आम्ही झुकणार नाही

"ईडीकडून आमदार रोहित पवार यांच्यावर जी कारवाई सुरू आहे, तशी अजित पवार यांच्यावर देखील झाली. परंतु त्यांनी गुडघे टेकले आणि ते भाजपमध्ये पळून गेले. प्रफुल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली. इकबाल मिरची यांच्याशी संबंध असल्याचे पुरावे ईडीने त्यांना दाखवले. त्यानंतर ते ही भाजपमध्ये गेले. मग त्यांचावरील कारवाई थांबली. पुढे हसन मुश्रीफ यांच्यावर अन् त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळावरील कारवाई थांबली. पण अनिल देशमुख, रोहित पवार आणि मी तसेच अन्य काही लोक आहेत, जे झुकले नाहीत. कोणापुढे नतमस्तक झाले नाहीत. आम्ही स्वाभिमानी आहोत. आमच्यासारखे स्वाभिमानी लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत, तोपर्यंत तुमची महाराष्ट्र तोडण्याची, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची इच्छा पूर्ण होणार नाही," असा इशाराच त्यांनी दिला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक