शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

संजय राऊतांनी सांगितला 'मविआ' जागावाटपाचा फॉर्म्युला, नव्या वादाला तोंड फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 12:35 IST

निवडणुकांमध्ये मतभेद दाखवायचे नाहीत असं आमचं ठरलंय!

Sanjay Raut, Mahavikas Aghadi vs BJP: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये मोठी फूट पडली. या फुटीनंतर आता महाविकास आघाडी कमकुवत होईल असे म्हणले जात होते. तसेच मविआ ही आघाडी संपुष्टात येईल असाही अंदाज व्यक्त केला जात होता. पण मविआ आधीइतकीच भक्कम आहे असे विविध नेतेमंडळींकडून वारंवार सांगितले जात आहे. तसेच, राज्याच्या विधानसभा निवडणुका मविआ एकत्र लढवणार असल्याचीही चर्चा आहे. अशातच संजय राऊत यांनी 'मविआ'च्या जागावाटपाचा फॉर्म्युला सांगितला असल्याने आता नव्या वादाला तोंड फुटणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मविआमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. 'जिंकेल त्याची जागा' आमच्या आघाडीचे सूत्र आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. गुरुवारी मातोश्रीवरील बैठकीत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह इतर काँग्रेस नेते, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असताना काही विषयांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. मात्र असे सूत्र ठरल्याने अनेक ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांमध्ये धुसफूस पाहायला मिळू शकते असे मानले जात आहे.

"महाराष्ट्रात महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र लढणार. तीन पक्ष असल्याने अनेकांना तडजोडी कराव्या लागतील. त्याला आमची तयारी आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या प्रमुखांनी ठरवलंय की, जागा वाटपावरुन कुठेही मतभेद उघड करायचे नाहीत. आपल्याला एकत्र यायचंय आणि निवडणुका जिंकायच्यात. जागेचा हट्ट धरायचा नाही, जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरलेलं आहे", असे ते म्हणाले.

सिनेटची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. यात धक्का बसण्यासारखं काही नाही. हा भीतीपोटी घेतलेला निर्णय आहे. या राज्यातील सरकार कोणतीही निवडणूक घ्यायला तयार नाही. सिनेटच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे पॅनल शंभर टक्के जिंकणार होते. ती भीती सरकारला होती, त्यामुळेच निवडणुका रद्द करण्यात आल्या. पण हे सरकार अशा किती निवडणुका रद्द करणार?" असा सवाल त्यांनी केला. तसेच, महानगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या जात नाहीयेत कारण भाजपाला भीती आहे ठाकरे गट जिंकेल", असंही राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीElectionनिवडणूक