शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
2
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
3
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
4
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
5
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
6
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
7
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
8
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
9
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
12
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
13
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
14
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
15
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
16
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
17
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
18
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
19
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
20
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य

Goa Election 2022: “गोव्यातही महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार का?”; संजय राऊत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 14:34 IST

Goa Election 2022: गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे संजय राऊत म्हणाले होते.

मुंबई: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल पक्षही यावेळी गोव्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे चुरस आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. यातच महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करणार का, अशी विचारणा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना करण्यात आली. 

गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसनेही गोव्यात विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाही मैदानात उतरली आहे. गोव्यामध्ये शिवसेनेचे सरकार आले तर महाराष्ट्राप्रमाणे चांगली कामगिरी करणारे सरकार देईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता. यानंतर मीडियाची बोलताना पत्रकारांनी महाविकास आघाडी सरकारबाबत प्रश्न विचारले असता संजय राऊत यांनी यावर भाष्य केले. 

गोव्यातही महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार का?

गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यावर आताच भाष्य करणे घाईचे ठरेल. यावर बोलण्यासाठी थोडा वेळ लागेल. सर्वांसोबत चर्चा सुरु आहेत. इतक्यात काही सांगू शकत नाही. सर्व पक्षांबरोबर चर्चा सुरु आहे. समोरच्या पक्षाकडून प्रस्ताव आला, तर त्यावर पक्ष विस्ताराने चर्चा करेल. ज्या राज्यात आम्हाला एकत्र यायचे आहे, तिथल्या लोकांसोबतच चर्चा केली जाते. आतापर्यंत ही चर्चा झालेली नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 

शिवसेना आणि गोव्याचे भावनिक नाते आहे

महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे, आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु. शिवसेना आणि गोव्याचे भावनिक नाते आहे. शिवसेना गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये ४० जागांपैकी २२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते तर महाराष्ट्र गोव्याच्या बाजूलाच आहे, असे संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतPramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाElectionनिवडणूक