शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

"सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान जातात, मग आमच्यासारख्यांना न्याय कसा मिळणार" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:13 IST

सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाबाबत मी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्ष शिक्षा दिली तरी मी सत्य बोलायचं थांबणार नाही असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

मुंबई - किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावरील आरोपानंतर संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. शिवडी कोर्टाने या प्रकरणी राऊतांना दोषी मानत १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत या निकालाला वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितले आहे. देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात, मग आमच्यासारखे लोक भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलतात त्यांना न्याय कुठून मिळणार..हे अपेक्षितच आहे असं सांगत संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही कोर्टाचा आदर करतो, पण मी बोललो काय... युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा भाईंदरमध्ये काही काम झाले होते त्यात काही बेकायदेशीर घडलंय, हे मी बोललो नाही तर मीरा भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते. त्यावर तिथले आमदार प्रताप सरनाईक यांनीही तपास व्हावा, त्यात भ्रष्टाचार झालाय म्हटलं होते. त्यावर विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर कायदेशीर कारवाई व्हायला हवी यावर विधानसभेत चर्चा होऊन कायदेशीर आदेश पारित केला. हे जर मी बोललो असेल तर माझ्याकडून अब्रुनुकसानी कशी झाली, हे सगळे ऑन रेकॉर्ड आहे. मी काही प्रश्न उपस्थित केले, मुलुंडचा पोपटलालही असे आरोप करतो. ते किती आरोप करतात. मी कोर्टासमोर पुरावे सादर केले. संपूर्ण देशात न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालं आहे. आमच्याकडे पुरावे असून आम्ही सेशन कोर्टात जाऊ असं त्यांनी सांगितले.

तसेच हा खटला समजून घेतला पाहिजे. हा विषय युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. त्याला शौचालय बनवण्याची कामे मिळाली. त्यात घोटाळा भ्रष्टाचार झालाय असा आरोप मी केला नाही. पहिला आरोप विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी केला. त्यांनी तसं पत्र दिले. त्याच्यावर कामात गडबड असल्याचा मीरा भाईंदर महापालिकेचा अहवाल आहे. त्या भागाचे आमदार प्रताप सरनाईक आज जे भाजपासोबत आहेत त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून चौकशीची मागणी केली. विधानसभेत यावर प्रश्न विचारले गेले. यावर चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे. त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी विधानसभेचा आदेश पारित झाला. फक्त हा मुद्दा मी लोकांसमोर आणला मग मी अब्रुनुकसानी कुठून केली, पहिली अब्रुनुकसानी प्रविण पाटील यांनी केली, दुसरी मीरा भाईंदर महापालिकेचा अहवाल आहे त्यांनी केली, प्रताप सरनाईक यांनीही अब्रुनुकसानी केली. विधानसभेत चर्चा झाली त्यांनीही अब्रुनुकसानी केली. पण सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाबाबत मी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्ष शिक्षा दिली तरी मी सत्य बोलायचं थांबणार नाही असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

दरम्यान, आम्ही वरच्या कोर्टात अपील करणार आहोत. हा पुरावा जो खालच्या कोर्टाने मान्य केलेला नाही. सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार होतोय, जनतेच्या पैशांचा अपहार होतोय त्याबाबत आम्ही काही बोलायचे नाही. याचं कारण न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालेले आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गणपतीचे लाडवाचे मोदक खायला त्यांच्या घरी पंतप्रधानांना बोलवतात त्या देशात आम्हाला काय न्याय मिळणार? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी करत न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याNarendra Modiनरेंद्र मोदीCourtन्यायालय