शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

"सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान जातात, मग आमच्यासारख्यांना न्याय कसा मिळणार" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:13 IST

सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाबाबत मी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्ष शिक्षा दिली तरी मी सत्य बोलायचं थांबणार नाही असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

मुंबई - किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावरील आरोपानंतर संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. शिवडी कोर्टाने या प्रकरणी राऊतांना दोषी मानत १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत या निकालाला वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितले आहे. देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात, मग आमच्यासारखे लोक भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलतात त्यांना न्याय कुठून मिळणार..हे अपेक्षितच आहे असं सांगत संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही कोर्टाचा आदर करतो, पण मी बोललो काय... युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा भाईंदरमध्ये काही काम झाले होते त्यात काही बेकायदेशीर घडलंय, हे मी बोललो नाही तर मीरा भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते. त्यावर तिथले आमदार प्रताप सरनाईक यांनीही तपास व्हावा, त्यात भ्रष्टाचार झालाय म्हटलं होते. त्यावर विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर कायदेशीर कारवाई व्हायला हवी यावर विधानसभेत चर्चा होऊन कायदेशीर आदेश पारित केला. हे जर मी बोललो असेल तर माझ्याकडून अब्रुनुकसानी कशी झाली, हे सगळे ऑन रेकॉर्ड आहे. मी काही प्रश्न उपस्थित केले, मुलुंडचा पोपटलालही असे आरोप करतो. ते किती आरोप करतात. मी कोर्टासमोर पुरावे सादर केले. संपूर्ण देशात न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालं आहे. आमच्याकडे पुरावे असून आम्ही सेशन कोर्टात जाऊ असं त्यांनी सांगितले.

तसेच हा खटला समजून घेतला पाहिजे. हा विषय युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. त्याला शौचालय बनवण्याची कामे मिळाली. त्यात घोटाळा भ्रष्टाचार झालाय असा आरोप मी केला नाही. पहिला आरोप विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी केला. त्यांनी तसं पत्र दिले. त्याच्यावर कामात गडबड असल्याचा मीरा भाईंदर महापालिकेचा अहवाल आहे. त्या भागाचे आमदार प्रताप सरनाईक आज जे भाजपासोबत आहेत त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून चौकशीची मागणी केली. विधानसभेत यावर प्रश्न विचारले गेले. यावर चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे. त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी विधानसभेचा आदेश पारित झाला. फक्त हा मुद्दा मी लोकांसमोर आणला मग मी अब्रुनुकसानी कुठून केली, पहिली अब्रुनुकसानी प्रविण पाटील यांनी केली, दुसरी मीरा भाईंदर महापालिकेचा अहवाल आहे त्यांनी केली, प्रताप सरनाईक यांनीही अब्रुनुकसानी केली. विधानसभेत चर्चा झाली त्यांनीही अब्रुनुकसानी केली. पण सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाबाबत मी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्ष शिक्षा दिली तरी मी सत्य बोलायचं थांबणार नाही असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

दरम्यान, आम्ही वरच्या कोर्टात अपील करणार आहोत. हा पुरावा जो खालच्या कोर्टाने मान्य केलेला नाही. सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार होतोय, जनतेच्या पैशांचा अपहार होतोय त्याबाबत आम्ही काही बोलायचे नाही. याचं कारण न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालेले आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गणपतीचे लाडवाचे मोदक खायला त्यांच्या घरी पंतप्रधानांना बोलवतात त्या देशात आम्हाला काय न्याय मिळणार? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी करत न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याNarendra Modiनरेंद्र मोदीCourtन्यायालय