शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

"सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान जातात, मग आमच्यासारख्यांना न्याय कसा मिळणार" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 15:13 IST

सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाबाबत मी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्ष शिक्षा दिली तरी मी सत्य बोलायचं थांबणार नाही असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

मुंबई - किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावरील आरोपानंतर संजय राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. शिवडी कोर्टाने या प्रकरणी राऊतांना दोषी मानत १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत या निकालाला वरच्या कोर्टात दाद मागणार असल्याचं सांगितले आहे. देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात, मग आमच्यासारखे लोक भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलतात त्यांना न्याय कुठून मिळणार..हे अपेक्षितच आहे असं सांगत संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही कोर्टाचा आदर करतो, पण मी बोललो काय... युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा भाईंदरमध्ये काही काम झाले होते त्यात काही बेकायदेशीर घडलंय, हे मी बोललो नाही तर मीरा भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते. त्यावर तिथले आमदार प्रताप सरनाईक यांनीही तपास व्हावा, त्यात भ्रष्टाचार झालाय म्हटलं होते. त्यावर विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर कायदेशीर कारवाई व्हायला हवी यावर विधानसभेत चर्चा होऊन कायदेशीर आदेश पारित केला. हे जर मी बोललो असेल तर माझ्याकडून अब्रुनुकसानी कशी झाली, हे सगळे ऑन रेकॉर्ड आहे. मी काही प्रश्न उपस्थित केले, मुलुंडचा पोपटलालही असे आरोप करतो. ते किती आरोप करतात. मी कोर्टासमोर पुरावे सादर केले. संपूर्ण देशात न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालं आहे. आमच्याकडे पुरावे असून आम्ही सेशन कोर्टात जाऊ असं त्यांनी सांगितले.

तसेच हा खटला समजून घेतला पाहिजे. हा विषय युवक प्रतिष्ठान नावाची संस्था आहे. त्याला शौचालय बनवण्याची कामे मिळाली. त्यात घोटाळा भ्रष्टाचार झालाय असा आरोप मी केला नाही. पहिला आरोप विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी केला. त्यांनी तसं पत्र दिले. त्याच्यावर कामात गडबड असल्याचा मीरा भाईंदर महापालिकेचा अहवाल आहे. त्या भागाचे आमदार प्रताप सरनाईक आज जे भाजपासोबत आहेत त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहून चौकशीची मागणी केली. विधानसभेत यावर प्रश्न विचारले गेले. यावर चौकशी होऊन गुन्हेगारांना शासन झाले पाहिजे. त्यानंतर कायदेशीर कारवाईसाठी विधानसभेचा आदेश पारित झाला. फक्त हा मुद्दा मी लोकांसमोर आणला मग मी अब्रुनुकसानी कुठून केली, पहिली अब्रुनुकसानी प्रविण पाटील यांनी केली, दुसरी मीरा भाईंदर महापालिकेचा अहवाल आहे त्यांनी केली, प्रताप सरनाईक यांनीही अब्रुनुकसानी केली. विधानसभेत चर्चा झाली त्यांनीही अब्रुनुकसानी केली. पण सार्वजनिक हितासाठी जनतेच्या पैशाबाबत मी प्रश्न उपस्थित केला. आज मला शिक्षा ठोठावली आहे. त्यांनी मला १५ वर्ष शिक्षा दिली तरी मी सत्य बोलायचं थांबणार नाही असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

दरम्यान, आम्ही वरच्या कोर्टात अपील करणार आहोत. हा पुरावा जो खालच्या कोर्टाने मान्य केलेला नाही. सार्वजनिक क्षेत्रात भ्रष्टाचार होतोय, जनतेच्या पैशांचा अपहार होतोय त्याबाबत आम्ही काही बोलायचे नाही. याचं कारण न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालेले आहे. ज्या देशाचे सरन्यायाधीश गणपतीचे लाडवाचे मोदक खायला त्यांच्या घरी पंतप्रधानांना बोलवतात त्या देशात आम्हाला काय न्याय मिळणार? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी करत न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKirit Somaiyaकिरीट सोमय्याNarendra Modiनरेंद्र मोदीCourtन्यायालय