शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

“सिर्फ नाम ही काफी हैं! हे असं भाग्य एखाद्या चक्रवर्ती राजालाच मिळू शकतं”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 14:50 IST

आपल्याकडे काहीच नाही, ना पक्ष, ना पक्षाचे चिन्ह. तरीसुद्धा आपल्याला तिथे सन्मानाने बोलावले, असे संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut News: महाबैठकीत देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी भाग घेतला. बैठक चांगली राहिली. आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण सगळे एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव निश्चित आहे, असा विश्वास विरोधकांच्या पाटणा येथील बैठकीत व्यक्त करण्यात आला. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सामील झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊतही गेले होते. याबाबत संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या बैठकीत माहिती दिली. सिर्फ नाम ही काफी हैं! हे असे भाग्य एखाद्या चक्रवर्ती राजालाच मिळू शकते, असे वर्णन संजय राऊत यांनी केले. 

ठाकरे गटाची एक बैठक झाली. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पाटण्यातील बैठकीत वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. तिथे आलेल्या प्रत्येकाचा पक्ष होता, प्रत्येकाकडे स्वतःचे पक्षचिन्ह होते. आपल्याकडे काहीच नाही, ना पक्ष, ना पक्षाचे चिन्ह. तरीसुद्धा आपल्याला तिथे सन्मानाने बोलावले. मुख्यमंत्री नितीश कुमार स्वतः विमानतळावर स्वागताला आले होते. याला भाग्य लागते. हे भाग्य एखाद्या चक्रवर्ती राजालाच मिळू शकते. त्यासाठी खुर्ची असायला हवी असे काही नाही. सिर्फ नाम ही काफी हैं, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

जुलमी सरकार उलथवून टाकण्याचा निश्चय तिथे करण्यात आला

पाटण्यात आम्ही काल जी दृष्य पाहिली, संपूर्ण देशातील लोक तिथे जमले होते. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. २०२४ साली महाराष्ट्रातून आणि देशातून हे जुलमी सरकार उलथवून टाकण्याचा निश्चय तिथे करण्यात आला, असे संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भाजप आणि पंतप्रधान मोदींविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. नितीश कुमार यांनी देशातील अनेक मोठमोठ्या पक्षांच्या प्रमुखांना बिहारच्या पाटणा येथे आयोजित केलेल्या बैठकीला बोलावले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रमुख या बैठकीला आले होते. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या बैठकीचं निमंत्रण देण्यात आले होते. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरे