शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

संजय राऊत अडचणीत? सहा आमदारांची नावे फोडणे हा आचारसंहितेचा भंग; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 11:24 IST

Kirit Somaiya on Sanjay Raut Rajya sabha Election: अपक्षांनी दगा दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर केला होता. शिवसेनेचा सहाव्या जागेसाठीचा उमेदवार पडला होता. यावर राऊत यांनी अपक्ष आमदारांवर याचे खापर फोडले होते.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीवेळी आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याचबरोबर आपण याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असा इशाराही दिला आहे. 

अपक्षांनी दगा दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर केला होता. शिवसेनेचा सहाव्या जागेसाठीचा उमेदवार पडला होता. यावर राऊत यांनी अपक्ष आमदारांवर याचे खापर फोडले होते. यावेळी त्यांनी सहा आमदारांचे नाव घेतले होते. यावर किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला आहे. 

शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस किंवा अन्य पक्षाच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला होता. ते अधिकृत पक्षाचे आमदार असल्याने राज्यसभेला मतदान करताना पक्षाच्या प्रतोदाला मताची चिठ्ठी दाखवून ते द्यावे लागते. परंतू अपक्षांना कोणीही विचारू शकत नाही. त्यांनी कोणाला मतदान केले हे कोणीही सांगू शकत नाही. असे असताना अपक्ष आमदारांनी कोणाला मत दिले हे संजय राऊत कसे सांगू शकतात. त्यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. त्याचबरोबर ते मुख्यमंत्री देखील आहेत. यामुळे त्यांना उत्तर द्यावे लागणार. या आमदारांची मते फुटली कशी? या आमदारांची नावे घेण्यामागचा उद्देश काय? या आमदारांना धमकावण्यासाठी हे सारे सुरु आहे का, असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याSanjay Rautसंजय राऊतRajya Sabhaराज्यसभा