शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

"बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:30 IST

खोके आणि गद्दार एवढाच मुद्दा राऊतांकडे शिल्लक आहेत. भूखंड वाटपात कुठलाही घोटाळा झाला नाही असा दावा मंत्री संदीपान भुमरेंनी केला.

औरंगाबाद - संजय राऊत केवळ आरोप करतात. ५० खोके आरोप करून चालत नाही तर ते सिद्ध करावं लागते. काही चौकशी करायची ती करा. फक्त बदनाम करण्याचं काम राऊत करतात. राऊतांना काय आरोप करायचे ते करू द्या. जनता आमच्यासोबत आहे. संजय राऊतांच्या पायाखालची जमीन सरकलीय. बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय असा टोला मंत्री संदीपान भुमरे यांनी राऊतांना लगावला. 

संदीपान भुमरे म्हणाले की, खोके आणि गद्दार एवढाच मुद्दा राऊतांकडे शिल्लक आहेत. भूखंड वाटपात कुठलाही घोटाळा झाला नाही. सभागृहात यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जनतेसमोर एकनाथ शिंदेंना बदनाम करायचं. कुठेतरी चर्चा वेगळ्या दिशेला न्यायची म्हणून हा विषय विरोधकांनी हाती घेतलाय. युती शासनाला बदनाम करण्याचं काम विरोधकांकडे आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ग्रामपंचायत निकालात सगळ्या युतीच्या ग्रामपंचायती आल्यात. ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर आहे. जनतेचा त्यांच्यावर किती विश्वास आहे हे लक्षात आलं असेल. नुसतं आरोप करून चालत नाही तर काम करून दाखवायचं असतं. एखादा खोका घेतलाय ते सिद्ध करा. विमानातून खोके आणता येतात का? हा उठाव वेगळ्या कारणाने झालाय. २०२४ मध्ये जनता कुणासोबत हे ठाकरेंना कळेल. पैठण विधानसभा क्षेत्रात १-२ ग्रामपंचायती वगळता सगळीकडे आमची सत्ता आली असंही संदीपान भुमरे म्हणाले. 

काय म्हणाले होते संजय राऊत?मुख्यमंत्र्यावरील आरोप गंभीर आहेत. भूखंड वाटप घोटाळ्याचे कागदपत्रे केंद्रातील अनेक प्रमुखांना पाठवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना पुरावे दिलेत. बहुतेक देवेंद्र फडणवीस दिल्लीत घाईने आले असतील तर नक्कीच त्यावर चर्चा झाली असेल. ११० कोटींचे भूखंड २ कोटींना आपल्या मर्जीतील बिल्डरांना दिलेत. जे १६ भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे भूखंड वाटप घाईघाईने केले. हायकोर्टाने त्यावर ताशेरे मारलेत असं सांगत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केला. 

त्याचसोबत जे ४० आमदार ज्याप्रकारे ५०-५० खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता त्यावर SIT स्थापन करणं गरजेचे आहे. पण जे विषय संपलेले आहे त्यावर SIT स्थापन करून सत्तेचा, पोलिसांचा गैरवापर सुरू आहे असा आरोपही राऊतांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSandipan Bhumreसंदीपान भुमरेShiv Senaशिवसेना