शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

"बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 13:30 IST

खोके आणि गद्दार एवढाच मुद्दा राऊतांकडे शिल्लक आहेत. भूखंड वाटपात कुठलाही घोटाळा झाला नाही असा दावा मंत्री संदीपान भुमरेंनी केला.

औरंगाबाद - संजय राऊत केवळ आरोप करतात. ५० खोके आरोप करून चालत नाही तर ते सिद्ध करावं लागते. काही चौकशी करायची ती करा. फक्त बदनाम करण्याचं काम राऊत करतात. राऊतांना काय आरोप करायचे ते करू द्या. जनता आमच्यासोबत आहे. संजय राऊतांच्या पायाखालची जमीन सरकलीय. बाळासाहेबांच्या शिवसेनेला बदनाम करण्याचा विडा संजय राऊतांनी उचललाय असा टोला मंत्री संदीपान भुमरे यांनी राऊतांना लगावला. 

संदीपान भुमरे म्हणाले की, खोके आणि गद्दार एवढाच मुद्दा राऊतांकडे शिल्लक आहेत. भूखंड वाटपात कुठलाही घोटाळा झाला नाही. सभागृहात यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जनतेसमोर एकनाथ शिंदेंना बदनाम करायचं. कुठेतरी चर्चा वेगळ्या दिशेला न्यायची म्हणून हा विषय विरोधकांनी हाती घेतलाय. युती शासनाला बदनाम करण्याचं काम विरोधकांकडे आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच ग्रामपंचायत निकालात सगळ्या युतीच्या ग्रामपंचायती आल्यात. ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर आहे. जनतेचा त्यांच्यावर किती विश्वास आहे हे लक्षात आलं असेल. नुसतं आरोप करून चालत नाही तर काम करून दाखवायचं असतं. एखादा खोका घेतलाय ते सिद्ध करा. विमानातून खोके आणता येतात का? हा उठाव वेगळ्या कारणाने झालाय. २०२४ मध्ये जनता कुणासोबत हे ठाकरेंना कळेल. पैठण विधानसभा क्षेत्रात १-२ ग्रामपंचायती वगळता सगळीकडे आमची सत्ता आली असंही संदीपान भुमरे म्हणाले. 

काय म्हणाले होते संजय राऊत?मुख्यमंत्र्यावरील आरोप गंभीर आहेत. भूखंड वाटप घोटाळ्याचे कागदपत्रे केंद्रातील अनेक प्रमुखांना पाठवली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांना पुरावे दिलेत. बहुतेक देवेंद्र फडणवीस दिल्लीत घाईने आले असतील तर नक्कीच त्यावर चर्चा झाली असेल. ११० कोटींचे भूखंड २ कोटींना आपल्या मर्जीतील बिल्डरांना दिलेत. जे १६ भूखंड गरिबांच्या घरांसाठी राखीव होते. तरीही तेव्हाच्या नगरविकास मंत्र्यांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी हे भूखंड वाटप घाईघाईने केले. हायकोर्टाने त्यावर ताशेरे मारलेत असं सांगत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केला. 

त्याचसोबत जे ४० आमदार ज्याप्रकारे ५०-५० खोके देऊन फोडण्यात आले तो काय व्यवहार होता त्यावर SIT स्थापन करणं गरजेचे आहे. पण जे विषय संपलेले आहे त्यावर SIT स्थापन करून सत्तेचा, पोलिसांचा गैरवापर सुरू आहे असा आरोपही राऊतांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSandipan Bhumreसंदीपान भुमरेShiv Senaशिवसेना