शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

याच मोदी सरकारने पवारांना पद्मविभूषण दिला; राऊतांचा टोला, अजित पवार - एकनाथ शिंदेंवरही खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 12:02 IST

पवार कृषी मंत्री असताना त्यांनी गुजरातसाठी मदत केली हे तुम्हीच सांगत होता. ही तुमची विधाने आहेत. तुम्हाला विसरण्याचा आजार झालाय का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

मुंबई – या राज्यात आणि देशात कृषी क्रांतीचे मोठं योगदान शरद पवारांनी दिले आहे. शरद पवार १० वर्ष कृषी मंत्री होते. मोदी सरकारच्या काळात किती कृषी मंत्री बदलले? तुम्ही कृषी मंत्र्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उभे केले. याच शरद पवारांना मोदी सरकारनं सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे ते विसरले का? कृषी आणि सामाजिक क्षेत्रात पवारांचे योगदान मोठे आहे म्हणून हा पुरस्कार दिलाय. साहित्य, कृषी, सामाजिक न्याय, शिक्षण या सर्वच क्षेत्रात स्वत:च्या बळावर कार्य केले आहे. तुमच्या सरकारने किती संस्था उभारल्या आणि चालू केल्या असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, पीएम केअर फंड बनवणे हे सामाजिक कार्य नाही. परंतु शरद पवारांच्या ट्रस्टकडून आजही हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणांसाठी मदत मिळते. भूकंप, पूरात निराधार झालेल्या मुलांना नवजीवदान दिले जाते. तुम्ही काय केले? कालपर्यंत तुम्ही त्यांना गुरु मानत होता, पवार कृषी मंत्री असताना त्यांनी गुजरातसाठी मदत केली हे तुम्हीच सांगत होता. ही तुमची विधाने आहेत. तुम्हाला विसरण्याचा आजार झालाय का? जर असं असेल तर उपचार घ्या, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. हे तुम्हाला शोभत नाही असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत तुम्ही इथं येऊन महाराष्ट्रातील नेत्यांची बदनामी करता. जे राजकीय नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात त्यांच्यावर तुम्ही चिखलफेक करता. हे योग्य नाही. एकनाथ शिंदे-अजित पवारांसमोर टीका करतात. या लोकांना तुम्ही असं बनवलं, त्यांच्यापेक्षा गुलाम चांगले आहे. अजित पवारांनी व्यासपीठावरून जायला हवं होतं. आज ते शरद पवारांवर बोलले, उद्या बाळासाहेब ठाकरेंवर बोलतील. मोदींच्या मनात कुणाबद्दलही आदराची भावना नाही. अटलबिहारी वाजपेयी असो वा लालकृष्ण अडवाणी कुणाचाही आदर नाही अशी टीकाही राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केली.

दरम्यान, महाराष्ट्रात मराठा समाजाचे इतके मोठे आंदोलन होतंय, मोदींच्या सभेला शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला तरीही तुम्ही आंदोलनवर बोलत नाही. तुम्ही शरद पवारांवर बोलता आणखी दुसऱ्या विषयावर बोललात. तुम्ही भ्रष्टाचारावर बोलला, सर्वात मोठे भ्रष्टाचारी तुमच्या मंचावर होते, तुम्ही शिर्डीच्या साईबाबांसमोर खोटे बोलला. अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यातच भाजपामध्ये विरोध होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरून जावं लागेल. दिल्लीतून तसा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच बदल होतील असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार