शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

याच मोदी सरकारने पवारांना पद्मविभूषण दिला; राऊतांचा टोला, अजित पवार - एकनाथ शिंदेंवरही खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 12:02 IST

पवार कृषी मंत्री असताना त्यांनी गुजरातसाठी मदत केली हे तुम्हीच सांगत होता. ही तुमची विधाने आहेत. तुम्हाला विसरण्याचा आजार झालाय का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

मुंबई – या राज्यात आणि देशात कृषी क्रांतीचे मोठं योगदान शरद पवारांनी दिले आहे. शरद पवार १० वर्ष कृषी मंत्री होते. मोदी सरकारच्या काळात किती कृषी मंत्री बदलले? तुम्ही कृषी मंत्र्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उभे केले. याच शरद पवारांना मोदी सरकारनं सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे ते विसरले का? कृषी आणि सामाजिक क्षेत्रात पवारांचे योगदान मोठे आहे म्हणून हा पुरस्कार दिलाय. साहित्य, कृषी, सामाजिक न्याय, शिक्षण या सर्वच क्षेत्रात स्वत:च्या बळावर कार्य केले आहे. तुमच्या सरकारने किती संस्था उभारल्या आणि चालू केल्या असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, पीएम केअर फंड बनवणे हे सामाजिक कार्य नाही. परंतु शरद पवारांच्या ट्रस्टकडून आजही हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणांसाठी मदत मिळते. भूकंप, पूरात निराधार झालेल्या मुलांना नवजीवदान दिले जाते. तुम्ही काय केले? कालपर्यंत तुम्ही त्यांना गुरु मानत होता, पवार कृषी मंत्री असताना त्यांनी गुजरातसाठी मदत केली हे तुम्हीच सांगत होता. ही तुमची विधाने आहेत. तुम्हाला विसरण्याचा आजार झालाय का? जर असं असेल तर उपचार घ्या, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. हे तुम्हाला शोभत नाही असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत तुम्ही इथं येऊन महाराष्ट्रातील नेत्यांची बदनामी करता. जे राजकीय नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात त्यांच्यावर तुम्ही चिखलफेक करता. हे योग्य नाही. एकनाथ शिंदे-अजित पवारांसमोर टीका करतात. या लोकांना तुम्ही असं बनवलं, त्यांच्यापेक्षा गुलाम चांगले आहे. अजित पवारांनी व्यासपीठावरून जायला हवं होतं. आज ते शरद पवारांवर बोलले, उद्या बाळासाहेब ठाकरेंवर बोलतील. मोदींच्या मनात कुणाबद्दलही आदराची भावना नाही. अटलबिहारी वाजपेयी असो वा लालकृष्ण अडवाणी कुणाचाही आदर नाही अशी टीकाही राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केली.

दरम्यान, महाराष्ट्रात मराठा समाजाचे इतके मोठे आंदोलन होतंय, मोदींच्या सभेला शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला तरीही तुम्ही आंदोलनवर बोलत नाही. तुम्ही शरद पवारांवर बोलता आणखी दुसऱ्या विषयावर बोललात. तुम्ही भ्रष्टाचारावर बोलला, सर्वात मोठे भ्रष्टाचारी तुमच्या मंचावर होते, तुम्ही शिर्डीच्या साईबाबांसमोर खोटे बोलला. अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यातच भाजपामध्ये विरोध होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरून जावं लागेल. दिल्लीतून तसा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच बदल होतील असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार