शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

याच मोदी सरकारने पवारांना पद्मविभूषण दिला; राऊतांचा टोला, अजित पवार - एकनाथ शिंदेंवरही खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 12:02 IST

पवार कृषी मंत्री असताना त्यांनी गुजरातसाठी मदत केली हे तुम्हीच सांगत होता. ही तुमची विधाने आहेत. तुम्हाला विसरण्याचा आजार झालाय का? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

मुंबई – या राज्यात आणि देशात कृषी क्रांतीचे मोठं योगदान शरद पवारांनी दिले आहे. शरद पवार १० वर्ष कृषी मंत्री होते. मोदी सरकारच्या काळात किती कृषी मंत्री बदलले? तुम्ही कृषी मंत्र्यांना विधानसभेच्या निवडणुकीत उभे केले. याच शरद पवारांना मोदी सरकारनं सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे ते विसरले का? कृषी आणि सामाजिक क्षेत्रात पवारांचे योगदान मोठे आहे म्हणून हा पुरस्कार दिलाय. साहित्य, कृषी, सामाजिक न्याय, शिक्षण या सर्वच क्षेत्रात स्वत:च्या बळावर कार्य केले आहे. तुमच्या सरकारने किती संस्था उभारल्या आणि चालू केल्या असा सवाल करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले की, पीएम केअर फंड बनवणे हे सामाजिक कार्य नाही. परंतु शरद पवारांच्या ट्रस्टकडून आजही हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणांसाठी मदत मिळते. भूकंप, पूरात निराधार झालेल्या मुलांना नवजीवदान दिले जाते. तुम्ही काय केले? कालपर्यंत तुम्ही त्यांना गुरु मानत होता, पवार कृषी मंत्री असताना त्यांनी गुजरातसाठी मदत केली हे तुम्हीच सांगत होता. ही तुमची विधाने आहेत. तुम्हाला विसरण्याचा आजार झालाय का? जर असं असेल तर उपचार घ्या, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. हे तुम्हाला शोभत नाही असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत तुम्ही इथं येऊन महाराष्ट्रातील नेत्यांची बदनामी करता. जे राजकीय नेते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात त्यांच्यावर तुम्ही चिखलफेक करता. हे योग्य नाही. एकनाथ शिंदे-अजित पवारांसमोर टीका करतात. या लोकांना तुम्ही असं बनवलं, त्यांच्यापेक्षा गुलाम चांगले आहे. अजित पवारांनी व्यासपीठावरून जायला हवं होतं. आज ते शरद पवारांवर बोलले, उद्या बाळासाहेब ठाकरेंवर बोलतील. मोदींच्या मनात कुणाबद्दलही आदराची भावना नाही. अटलबिहारी वाजपेयी असो वा लालकृष्ण अडवाणी कुणाचाही आदर नाही अशी टीकाही राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केली.

दरम्यान, महाराष्ट्रात मराठा समाजाचे इतके मोठे आंदोलन होतंय, मोदींच्या सभेला शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध केला तरीही तुम्ही आंदोलनवर बोलत नाही. तुम्ही शरद पवारांवर बोलता आणखी दुसऱ्या विषयावर बोललात. तुम्ही भ्रष्टाचारावर बोलला, सर्वात मोठे भ्रष्टाचारी तुमच्या मंचावर होते, तुम्ही शिर्डीच्या साईबाबांसमोर खोटे बोलला. अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यातच भाजपामध्ये विरोध होता. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदावरून जावं लागेल. दिल्लीतून तसा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच बदल होतील असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार