शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

“बेळगाव वादग्रस्त इलाका, ना कर्नाटकचा, ना महाराष्ट्राचा, मुख्यमंत्र्यांनी...”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 12:41 IST

Sanjay Raut News: राज्यात विविध घडामोडी सुरू असताना संजय राऊत यांनी बेळगावच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली.

Sanjay Raut News: आगामी लोकसभा निवडणुका, महाविकास आघाडीचे जागावाटप, आमदार अपात्रता प्रकरण यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बेळगावच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे तो ना कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा आहे, अशी स्थिती असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितले की, मुंबई महानगरपालिकेने कोरोना काळात उत्तम काम केले. या संपूर्ण काळामध्ये शिवसेनेचे किंवा इतर सामाजिक संस्थांच्या लोकांनी कोविड सेंटर चालवली त्या काळामध्ये गोरगरिबांना स्थलांतर कामगारांसाठी खिचडी वाटप झाले तरीही अनेक खोटे प्रकरण खोटे साक्षी पुरावे उभे करून हे प्रकरणे निर्माण करून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच १३८ लोकांना खिचडी वाटप काम देण्यात आले. मात्र यात किती लोकांच्या चौकशी झाल्या, किती लोकांवर ते गुन्हे झाले, हेही समोर आणावे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

बेळगाव वादग्रस्त इलाका, ना कर्नाटकचा, ना महाराष्ट्राचा

बेळगाव हा वादग्रस्त इलाका आहे तो ना कर्नाटकचा आहे ना महाराष्ट्राचा आहे अशी ती स्थिती आहे, असे संजय राऊत म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण आहे. राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहे, ते दावा करत आहे की, बेळगावच्या जेलमध्ये होतो बोलत होते. बेळगाव तुरुंगात असेल तर अजूनही तसा पुरावा आला नाही. जर ते जेलमध्ये होते. लाठी काठी खाल्ली असेल, तर त्यांनी या प्रश्नावर तोंड उघडायला पाहिजे होते, या शब्दांत संजय राऊत यांनी निशाणा साधला.

दरम्यान, किमान ३८ अशा कंपन्या आहेत त्यांनी खिचडीचे वाटप केले नाही. मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपये उकळले. पण हे सगळे करणारे त्यांचे मोरके हे शिंदे गटात, भाजपामध्ये आहेत. भाजपाशी संबंधित संस्था आणि एनजीओ आहेत, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला.

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेbelgaum-pcबेळगावbelgaonबेळगाव