शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
3
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
4
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
6
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
7
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
8
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
9
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
10
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
11
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
12
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
13
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
14
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
15
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
16
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
17
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
18
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
19
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...

“विरोधी पक्षनेत्यांचा द्वेष करताय हे चुकीचे आहे, राज्यकर्त्यांनी...”; संजय राऊतांनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 12:25 IST

Sanjay Raut News: जी-२० शिखर परिषदेच्या डीनरसाठी मल्लिकार्जुन खरगे यांना निमंत्रित न करण्यावरून संजय राऊतांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.

Sanjay Raut News: देशात जी-२० शिखर परिषद सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. जी-२० परिषदेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांसाठी डीनरचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना निमंत्रण नसल्यावरून आता विरोधकांकडून टीका होत आहे. 

बेल्जियम दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी तेथून सरकारवर हल्लाबोल केला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना जी-२० डीनरसाठी आमंत्रित न केल्याबद्दल सरकारवर निशाणा साधत, ६० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विरोधी नेत्यांना सरकार महत्त्व देत नाही, याचा हा पुरावा आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खरगेंना निमंत्रण नसल्यावरून सरकारवर जोरदार टीका केली.

तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करत आहात हे चुकीचे आहे

राज्याचे मन छोटे असेल तर असे होते. तुम्ही देवेगौडा, मनमोहन सिंग यांना बोलवलं. ते प्रकृतीमुळे येऊ शकत नाही. मात्र देशाच्या विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आहेत. तुम्ही त्यांना बोलवत नाहीत. यावरून तुमच्या मनात भीती असल्याचे स्पष्ट होते. तुम्ही देशात जे काही करून ठेवता, त्याची पोलखोल होईल, विरोधीपक्षनेते ती करत असतात. राज्यकर्त्यांचे मन मोठे असावे लागते. तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांचा द्वेष करत आहात हे चुकीचे आहे, या तीव्र शब्दांत संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. 

...तर बैठकीचे स्वागत करू

पुतिन येथे आलेले नाहीत, हे लक्षात घ्या. शेवटी काय मिळणार आहे? आमचे लक्ष आहे. लडाखमध्ये शेजारी देशाने घेतलेली जमिनीकडे परत मिळणार असेल तर आम्ही बैठकीचे स्वागत करू. या बैठकीमुळे जर भारताची ताकद वाढलेली असेल तर त्याचंही स्वागत करू, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, या देशात सर्व राष्ट्रांचे प्रमुख आलेले आहेत. भारतावरील कर्ज माफ होणार आहे का? किती खर्च झाला आहे? तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा बैठका महत्त्वाच्या असतात. मोदींनी ते केलेले आहे. इंदिरा गांधी, नेहरू असताना अशा प्रकारच्या बैठका झाल्याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली.  

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेSanjay Rautसंजय राऊत