शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील”; संजय राऊतांचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 12:44 IST

Sanjay Raut News: केंद्रात एनडीएचे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून इंडिया आघाडीचे सरकार येण्यात मजा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. ४०० पारचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात भाजपाचे २४० खासदार निवडून आले. राज्यात दोन आकडी संख्याही भाजपाला गाठता आली नाही. यातच पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी इच्छा व्यक्त केली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका करताना, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील, असे भाकित केले आहे. 

राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला तगडे आव्हान देत जास्त जागा मिळवल्या. यानंतर आता संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला. राजकीय विरोधकांवर सूडाच्या कारवाया करण्यात ते आघाडीवर होते. अशा प्रकारची व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात असावी असे आम्हाला वाटत नाही. लोकांचा जेवढा राग मोदी-शाहांवर नाही, तेवढा राग महाराष्ट्रात फडणवीसांवर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. देवेंद्र फडणवीस हे पेशवाईतल्या आनंदीबाईंप्रमाणे वागत आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. 

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील

काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत त्यात शिवसेनेचेही योगदान आहे. आम्ही त्याबाबत वेळ आली चर्चा करु. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभेला याहून मोठे यश मिळेल. आमच्या जागा चोरण्याचा, विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. अमोल कीर्तिकरांच्या जागेसाठी जो प्रयत्न झाला, ते अनेक ठिकाणी झाले. विधानसभा निवडणुकीत ते होणार नाही. आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. 

दरम्यान, एनडीएची दारे चंद्राबाबू नायडूंसाठी बंद आहेत हे अमित शाह यांनी जाहीर केले होते. २०१९ मध्ये चंद्राबाबू म्हणाले होते की, नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. आता त्याच चंद्राबाबूंना यांनी बरोबर घेतले आहे. त्यामुळे हे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून येण्यात मजा आहे ते आत्ता बनवण्यात नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी