शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

“आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील”; संजय राऊतांचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 12:44 IST

Sanjay Raut News: केंद्रात एनडीएचे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून इंडिया आघाडीचे सरकार येण्यात मजा आहे, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षेप्रमाणे यश मिळवता आले नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. ४०० पारचा नारा दिला असला तरी प्रत्यक्षात भाजपाचे २४० खासदार निवडून आले. राज्यात दोन आकडी संख्याही भाजपाला गाठता आली नाही. यातच पराभवाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी इच्छा व्यक्त केली. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका करताना, आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील, असे भाकित केले आहे. 

राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला तगडे आव्हान देत जास्त जागा मिळवल्या. यानंतर आता संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेऊन महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला. राजकीय विरोधकांवर सूडाच्या कारवाया करण्यात ते आघाडीवर होते. अशा प्रकारची व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात असावी असे आम्हाला वाटत नाही. लोकांचा जेवढा राग मोदी-शाहांवर नाही, तेवढा राग महाराष्ट्रात फडणवीसांवर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली. देवेंद्र फडणवीस हे पेशवाईतल्या आनंदीबाईंप्रमाणे वागत आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली. 

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील

काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत त्यात शिवसेनेचेही योगदान आहे. आम्ही त्याबाबत वेळ आली चर्चा करु. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभेला याहून मोठे यश मिळेल. आमच्या जागा चोरण्याचा, विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. अमोल कीर्तिकरांच्या जागेसाठी जो प्रयत्न झाला, ते अनेक ठिकाणी झाले. विधानसभा निवडणुकीत ते होणार नाही. आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. 

दरम्यान, एनडीएची दारे चंद्राबाबू नायडूंसाठी बंद आहेत हे अमित शाह यांनी जाहीर केले होते. २०१९ मध्ये चंद्राबाबू म्हणाले होते की, नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. आता त्याच चंद्राबाबूंना यांनी बरोबर घेतले आहे. त्यामुळे हे सरकार आले तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून येण्यात मजा आहे ते आत्ता बनवण्यात नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी