शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 19:28 IST

Sanjay Raut News: राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला १७५ ते १८० जागा मिळतील, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut News: लोकसभेत भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला केवळ २४० जागांपर्यंत मजल मारता आली. एनडीएतील घटक पक्षांच्या पाठिंब्याने मोदी सरकार कायम राहिले असले तरी इंडिया आघाडी मोठी मुसंडी मारत भाजपाला चांगलाच धडा शिकवल्याचे बोलले जात आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठे विधान केले आहे. 

महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली असून, त्यांचा रोख उद्धव ठाकरेंकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या असून, महायुतीतील नेत्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यातच आता, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे चेहरे केले असते, तर इंडिया आघाडीच्या आणखी २५ ते ३० जागा वाढल्या असत्या, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. 

कोणतेही सरकार बिनचेहऱ्याचे असू नये

राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला १७५ ते १८० जागा मिळतील. केंद्रात राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे चेहरे ठरवले असते तर इंडिया आघाडीच्या आणखी २५ ते ३० जागा वाढल्या असत्या. कोणतेही सरकार बिनचेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो हे जनतेला कळायला हवे. लोकांनी इंदिरा गांधींना, राजीव गांधींना मतदान केले. मोदींना मतदान केले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेने झिडकारुन लावले आहे. ते स्वत:ला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, पण तसे काही नाही. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. त्या साडेतीन शहाण्यांमध्ये यांना स्थान नाही, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी