शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 19:28 IST

Sanjay Raut News: राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला १७५ ते १८० जागा मिळतील, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Sanjay Raut News: लोकसभेत भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला केवळ २४० जागांपर्यंत मजल मारता आली. एनडीएतील घटक पक्षांच्या पाठिंब्याने मोदी सरकार कायम राहिले असले तरी इंडिया आघाडी मोठी मुसंडी मारत भाजपाला चांगलाच धडा शिकवल्याचे बोलले जात आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानपदाबाबत मोठे विधान केले आहे. 

महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली असून, त्यांचा रोख उद्धव ठाकरेंकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या असून, महायुतीतील नेत्यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. यातच आता, राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे चेहरे केले असते, तर इंडिया आघाडीच्या आणखी २५ ते ३० जागा वाढल्या असत्या, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. 

कोणतेही सरकार बिनचेहऱ्याचे असू नये

राज्यात महाविकास आघाडीला पूर्ण बहुमत मिळणार आहे. आम्हाला १७५ ते १८० जागा मिळतील. केंद्रात राहुल गांधी हे पंतप्रधान पदाचे चेहरे ठरवले असते तर इंडिया आघाडीच्या आणखी २५ ते ३० जागा वाढल्या असत्या. कोणतेही सरकार बिनचेहऱ्याची असू नये. आपण कोणासाठी मतदान करतो हे जनतेला कळायला हवे. लोकांनी इंदिरा गांधींना, राजीव गांधींना मतदान केले. मोदींना मतदान केले, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षाला राज्यातील जनतेने झिडकारुन लावले आहे. ते स्वत:ला नाना फडणवीसांचे मोठे भाऊ समजत होते, पण तसे काही नाही. नाना फडणवीस हे साडेतीन शहाण्यांपैकी एक होते. त्या साडेतीन शहाण्यांमध्ये यांना स्थान नाही, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी