शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

“नोव्हेंबरनंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री, मग सगळे प्रश्न सुटतील”; संजय राऊतांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 23:33 IST

Sanjay Raut News: राज्य सरकार शिक्षकांच्या प्रश्नावर कोणी भूमिका घेताना दिसले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेलेले अनेक प्रश्न सुटले, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी, विधान परिषदेच्या निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून किशोर दराडे उमेदवार असून, महाविकास आघाडीने संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मेळावा घेतला. नोव्हेंबरनंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री असेल. त्यामुळे त्यानंतर सगळे प्रश्न सुटतील, असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले आहे. 

या निवडणुकीत चिन्ह नाही. त्यामुळे उमेदवाराचे नाव लक्षात ठेवा. आमचा मुंबईतील अनुभव वाईट आहे. मुंबईत मते जास्त बाद होतात याची कारणे शोधावे लागेल. लोका सांगे ब्रम्हज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण. इथे बोगस शिक्षक, बोगस शिक्षकेत्तर कर्मचारी नोंदविले गेले आहेत. त्यामुळे, बोगस मदतदार शोधून काढावेत, त्यांच्यावर खटले दाखल करावे, त्यांची नोदणी करणाऱ्यांवरही खटले दाखल करावे. आम्ही राजकारणातील लोक आहोत आम्ही हेराफेरी करतो, मतदार आणतो, बसवतो. शिक्षक विभागाची निवडणूक सोपी नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपेक्षा मोठी यात्रा आहे 

उमेदवार संदीप गुळवे मतदारसंघ पिंजून काढत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपेक्षा मोठी यात्रा आहे. मुख्यमंत्री कशासाठी आले होते. शिक्षणाचा आणि त्यांचा संबंध पाहिजे. आतापर्यंत शिक्षणाचा व्यापार झाला नव्हता. बाजार झाला नव्हता. गेल्या काही दिवसात शिक्षकाच्या हातात भिकचे कटोरे देण्याचे काम या राज्य सरकारने केले. त्यांनी शिक्षकांच्या मताचा भाव लावला. असा मुख्यमंत्री या राज्याला लाभला आहे. देशाचे पंतप्रधान अनेक बाता करतात. आमदारांना विकत घेण्यासाठी मते विकत घेण्यासाठी पैसे आहे. सरकार पाडण्यासाठी ५० कोटी आले. मते विकत घेण्यस्थी खोके आले. परंतु, शिक्षकांच्या प्रश्नावर कोणी भूमिका घेताना हे दिसले नाहीत. शिक्षण क्षेत्र आणि शाळा यांच्या संबंध नसलेले राज्यकर्ते लाभले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

नोव्हेंबरनंतर या राज्यात आपला मुख्यमंत्री होणार आहे

पैश्याची ताकद सत्ता टिकवण्यासाठी आहे. शिक्षकांच्या स्वाभिमानाचा लिलाव करू शकत नाही. आश्रम शाळा आणि आदिवासींचे प्रश्न आधी का सोडवले नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेलेले अनेक प्रश्न सोडवले. अंगणवडी सेवकांचे प्रश्न सुटले. ४० हजार पेक्षा जास्त मते गुळवे यांना मिळतील.  विधी मंडळात शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आम्हीही आग्रही असू. नोव्हेंबरनंतर या राज्यात आपला मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे सगळे प्रश्न सुटतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पाच जिल्ह्यात प्रचारासाठी फिरलो. तुमच्या आशिर्वादाने मी विधानपरिषदेत जाईन. जुनी पेन्शन, शिक्षक भरती, मेडिकल बील, टप्पा अनुदान, अनुदानित शाळा करणे, विनाअनुदानित शाळांचे प्रश्न सोडवेन. मला दिलेल्या संधीचे सोने करेन. मला नाव सांगावे लागत आहे त्याचे कारण म्हणजे समोरच्या उमेदवाराने डमी उमेदवार दिला आहे, असे नाशिक शिक्षक मतदारसंघ महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी