शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

"संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा चावलाय"; सीमाप्रश्नावरून शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 18:12 IST

"संजय राऊत यांनी आज कर्नाटक प्रश्नावर जे मत मांडले आहे, मला वाटते, की त्यांना पुन्हा पिसाळलेला कुत्रा चावला आहे."

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारने जतमध्ये सोडलेल्या पाण्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकारने, कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्यायला पाहिजे. या महाराष्ट्रावर असे आक्रमण आणि अतिक्रमण गेल्या 50-55 वर्षांत झाले नव्हते. बाजूच्या राज्याचा मुख्यमंत्री तुम्हाला सरळ डिवचतोय, आव्हान देतोय या महाराष्ट्राला. ते जे पाणी सोडले आहे ना, चुल्लू भर पाणी में डूब जाओ म्हणतोना आपण, जा त्या पाण्यात जलसमाधी घ्या," असे राऊतांनी म्हटले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जहरी शब्दांत टीका केली आहे.शिरसाट म्हणाले, "संजय राऊत यांनी आज कर्नाटक प्रश्नावर जे मत मांडले आहे, मला वाटते, की त्यांना पुन्हा पिसाळलेला कुत्रा चावला आहे. दर वेळेला नवीन वाद करायचे, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा यांनी तोंड का उघडले नाही? अडीच वर्ष झोपा काढत होते का हे लोक? त्यावेळी त्यांना हे सुचले नाही. ज्या गोष्टी आपल्या करायच्या नसताता, करता येत नाहीत, त्या दुसऱ्यावर कशा थोपवायच्या हा प्रयत्न त्यांनी केला आहे. संजय राऊत कडून अपेक्षा काय करता?," असा सवालही त्यांनी केला.

शिरसाट म्हणाले, ते आम्हाला म्हणतात, आमच्या कपाळावर गद्दार कोरल्या जाणार आहे? अरे तुमच्या पेक्षा जास्त शिवसेने आम्ही पाहिली आहे. तुम्ही आम्हाला काय शिवसेना शिकवता? शिवसेनेत काय चालतं आणि काय केलंय आम्ही, हे आमच्या जीवाला विचारा. आम्ही तेथे ३८ वर्ष काढली आहेत आणि यांच्यासारखे पगारदार नौकर आमच्यासंदर्भात बोलत असतील ना, तर त्यांनी त्यांच्या नौकऱ्या कराव्यात. हे सांगावे की, सामनाचे संपादक पद मी सोडले आहे. मला भुंकायसाठी ठेवले आहे आणि तुम्ही भुंकत राहा. तुमच्या भुंकण्याने महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही मजबुतीने काम करत आहोत. म्हणून आमच्या नादी आता लागू नका."

आणखी काय म्हणाले होते राऊत? - नाशिकमध्ये पत्रकारांसोबत बोलताना राऊत यांनी म्हटले होते, की जर तुम्हाला स्वाभिमान असेल. ज्या स्वाभिमानाच्या मुद्द्यावर तुम्ही शिवसेना सोडली म्हणता मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? कर्नाटकचा मुख्यमंत्री रोज तुमच्या तोंडावर, सरकारवर थुंकतोय. 3 महिन्यापूर्वी क्रांती केली म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता क्रांती करावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू आहे. तुमच्या क्रांतीची वांती झाली का? असेही त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदे