शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

'त्या' कागदाला किंमत शून्य; उद्धव ठाकरेंच्या पत्राला संजय राऊत असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 11:49 IST

प्रकल्प आणि जागेबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनीच केंद्राला पत्र लिहून बारसू येथील जागा सुचवली होती असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बारसूला लोक विरोध करायला पुढे आलेत त्यामुळे आमच्या दृष्टीने त्या पत्राला किंमत शून्य आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. 

आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज

खासदार संजय राऊत म्हणाले की, बारसू प्रकल्पावर पुरेसी चर्चा झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिकाही स्पष्ट केली आहे. नाणार आणि बारसू दोन्ही जागेबाबत भूमिका स्पष्ट सांगितली आहे. लोकांचा नाणारला विरोध होता, लोक नाणारला रस्त्यावर उतरले होते. केंद्राला पर्यायी जागा बारसू होऊ शकते. जिथे माळरान आहे. ते ठाकरेंनी सुचवले होते. पण तिथे लोकांचा विरोध असेल तर उद्धव ठाकरे त्याला पाठिंबा देणार नाही. मुख्यमंत्री म्हणून पर्यायी जागा सुचवली होती. त्यावेळी विरोध नव्हता. आता लोक विरोध करायला पुढे आलेत. त्यामुळे त्या पत्राला किंमत शून्य आहे. तो शासकीय कागद आहे. शिवसेना लोकभावनेच्या बाजूने आहे. महिला, वृद्ध, तरूण, मुले मरायला तयार आहेत. लाठ्याकाठ्या खायला तयार आहे. त्यामुळे शासकीय कागद फडकावत उद्योगमंत्री सामंत यांनी शहाणपणा करू नये. जागेवर जाऊन लोकांशी बोलावे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही सर्व विषय लोकांवर सोडला, कोकणात हा पहिला प्रकल्प आहे का? रायगड जिल्ह्यात अनेक केमिकल प्रकल्प उभे आहेत. कुणी विरोध केलेत का? चिपळूणला मोठी एमआयडीसी आहे. कुणी विरोध केला का? युती काळात एनर्जी प्रकल्पाला त्यावेळी विरोध झाला होता. नाणारला विरोध झाला. बाकी कोणत्या प्रकल्पाला विरोध झाला असेल तर त्यांनी सांगावे. केंद्रीय मंत्री कोकणातले आहे. त्यांनी सिंधुदुर्गात कोणते प्रकल्प आणले? फक्त विषारी प्रकल्प आणले असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

मुख्यमंत्री आहेत कुठे?मुख्यमंत्री रजेवर आहेत अशा वृत्तपत्रात बातम्या आहेत. केवळ सामनात नाही तर इतरही आहेत. मुख्यमंत्री रजेवर असल्याचं अधिकृतपणे सीएम कार्यालयातून सांगण्यात येते. इथं कोकणात लोक छातीवर गोळ्या झेलतायेत, मरतायेत. मुख्यमंत्री आहेत कुठे? असा सवाल संजय राऊतांनी करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

राज ठाकरे पोपट रत्नागिरीत ६ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेबाबत संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया देत ते भाजपाचे पोपट आहेत. पोपट येतात, उडून जातात. पोपट पोपटच असतो, त्यांना सभा घ्यायची ती घेऊ द्या. महाडला उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यासाठी सभेला सर्वांनी हजर राहावे असं सांगत राऊतांनी राज ठाकरेंच्या सभेवर खोचक टीका केली आहे. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे