शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
3
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
5
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
6
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
7
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
8
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
9
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
10
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
11
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
12
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
13
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
14
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
15
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
16
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
17
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
18
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
19
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
20
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

'त्या' कागदाला किंमत शून्य; उद्धव ठाकरेंच्या पत्राला संजय राऊत असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 11:49 IST

प्रकल्प आणि जागेबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत असं राऊतांनी म्हटलं.

मुंबई - रिफायनरी प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरेंनीच केंद्राला पत्र लिहून बारसू येथील जागा सुचवली होती असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बारसूला लोक विरोध करायला पुढे आलेत त्यामुळे आमच्या दृष्टीने त्या पत्राला किंमत शून्य आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. 

आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज

खासदार संजय राऊत म्हणाले की, बारसू प्रकल्पावर पुरेसी चर्चा झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिकाही स्पष्ट केली आहे. नाणार आणि बारसू दोन्ही जागेबाबत भूमिका स्पष्ट सांगितली आहे. लोकांचा नाणारला विरोध होता, लोक नाणारला रस्त्यावर उतरले होते. केंद्राला पर्यायी जागा बारसू होऊ शकते. जिथे माळरान आहे. ते ठाकरेंनी सुचवले होते. पण तिथे लोकांचा विरोध असेल तर उद्धव ठाकरे त्याला पाठिंबा देणार नाही. मुख्यमंत्री म्हणून पर्यायी जागा सुचवली होती. त्यावेळी विरोध नव्हता. आता लोक विरोध करायला पुढे आलेत. त्यामुळे त्या पत्राला किंमत शून्य आहे. तो शासकीय कागद आहे. शिवसेना लोकभावनेच्या बाजूने आहे. महिला, वृद्ध, तरूण, मुले मरायला तयार आहेत. लाठ्याकाठ्या खायला तयार आहे. त्यामुळे शासकीय कागद फडकावत उद्योगमंत्री सामंत यांनी शहाणपणा करू नये. जागेवर जाऊन लोकांशी बोलावे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आम्ही सर्व विषय लोकांवर सोडला, कोकणात हा पहिला प्रकल्प आहे का? रायगड जिल्ह्यात अनेक केमिकल प्रकल्प उभे आहेत. कुणी विरोध केलेत का? चिपळूणला मोठी एमआयडीसी आहे. कुणी विरोध केला का? युती काळात एनर्जी प्रकल्पाला त्यावेळी विरोध झाला होता. नाणारला विरोध झाला. बाकी कोणत्या प्रकल्पाला विरोध झाला असेल तर त्यांनी सांगावे. केंद्रीय मंत्री कोकणातले आहे. त्यांनी सिंधुदुर्गात कोणते प्रकल्प आणले? फक्त विषारी प्रकल्प आणले असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

मुख्यमंत्री आहेत कुठे?मुख्यमंत्री रजेवर आहेत अशा वृत्तपत्रात बातम्या आहेत. केवळ सामनात नाही तर इतरही आहेत. मुख्यमंत्री रजेवर असल्याचं अधिकृतपणे सीएम कार्यालयातून सांगण्यात येते. इथं कोकणात लोक छातीवर गोळ्या झेलतायेत, मरतायेत. मुख्यमंत्री आहेत कुठे? असा सवाल संजय राऊतांनी करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

राज ठाकरे पोपट रत्नागिरीत ६ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेबाबत संजय राऊतांनी खोचक प्रतिक्रिया देत ते भाजपाचे पोपट आहेत. पोपट येतात, उडून जातात. पोपट पोपटच असतो, त्यांना सभा घ्यायची ती घेऊ द्या. महाडला उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यासाठी सभेला सर्वांनी हजर राहावे असं सांगत राऊतांनी राज ठाकरेंच्या सभेवर खोचक टीका केली आहे. 

 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे