शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

'लोकांसमोर एक अन् घरात दुसऱ्या भूमिकेचा 'दिखावा' मला पटत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 10:55 IST

आपल्या राजकीय सामर्थ्याच्या बळावर जिल्ह्यातून बीडमधून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जागा राखली.

बीड - सलग दहा वर्षे लोकप्रतिनिधी राहिलेले जयदत्त क्षीरसागर यांची हॅटट्रिक पुतण्याने बाजी मारत रोखली. गुरुवारी अत्यंत चुरशीच्या सामन्यात संदीप क्षीरसागरने विजयश्री खेचून आणली. धनशक्तीपुढे जनशक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया संदीप यांनी दिली. तसेच, निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर झालेल्या पैसेवाटपामुळे माझं मताधिक्य कमी झालं, अन्यथा 20 हजारांच्या फरकाने मी जिंकलो असतो, असा विश्वासही संदीप यांनी बोलून दाखवला. आता, विजयानंतर संयमीपणे जनतेची कामे करण्याचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यापुढे आव्हान आहे. 

आपल्या राजकीय सामर्थ्याच्या बळावर जिल्ह्यातून बीडमधूनजयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची जागा राखली. परंतु, पक्षांतर्गत विरोध आणि झालेल्या कोंडीमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवबंधन बांधले. राजकीय अपरिहार्यता म्हणून क्षीरसागरांनी पक्ष बदलला तरी त्यांची भूमिका जनतेला पचनी पडली नसल्याचे या निकालावरुन दिसते. शहरी भाग नेहमीच जयदत्त क्षीरसागर यांच्या बाजुने राहिला, पण त्या भागातूनही यंदा जादा मताधिक्य मिळविता आले नाही. परिणामी दहा हजाराच्या फरकाने संदीप क्षीरसागर यांनी आघाडी घेतली.

संदीप यांनी आपल्या विजयाचे श्रेय कार्यकर्ते आणि तालुक्यातील जनतेला दिले आहे. नात्यांमधील भावनांपेक्षा लोकांच्या कामांना प्राधान्य हाच माझा निवडणूक लढविण्याचा उद्देश होता. घरातील वादांपेक्षा लोकांच्या अडचणी अग्रस्थानी ठेऊन आम्ही लढलो. माझ्या विजयात माझे कार्यकर्ते आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा मोलाचा वाटा असल्याच संदीप यांनी सांगितलं. काकांबद्दल बोलताना, निवडणूक आल्यावरच काका मतदारसंघात येतात. मला वाटत नाही, यापुढे ते बीड मतदारसंघात येतील, असे वाटत नाही. लोकांची फसवणूक, कामांना येणारा अडथळा आणि विकासकामांना बसणारी खीळ यातूनच आमचं नेतृत्व पुढं आल्याचंही संदीप यांनी म्हटलं. 

लोकांसमोर एक भूमिका दाखवायची आणि घरी दुसरी भूमिका हे मला पटत नाही. त्यामुळे मी निवडणूक काळातही काकांना भेटलो नाही. तसेच, निकालानंतरही माझी आणि त्यांची भेट झाली नाही. पण, मी सुडाचं राजकारण कधीही करत नाही. निवडणूक संपली, प्रचार संपला आता राजकारणही संपलं. आता, जनतेच्या आणि विकासाच्या कामाला सुरुवात करायचीय, असे म्हणत संदीप क्षीरसागर यांनी काकांबद्दल आपलं मत स्पष्ट केलं. 

टॅग्स :Beedबीडbeed-acबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019