शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

समृद्धी महामार्गाने साधली समृद्धी, १६ हजार ७०० शेतकऱ्यांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई

By यदू जोशी | Updated: April 6, 2018 04:39 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी आतापर्यंत १६ हजार ७०० शेतकºयांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के शेतकºयांना भूसंपादनानंतर केवळ पाच दिवसांत भरपाई देण्याचा विक्रम राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे.

मुंबई - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी आतापर्यंत १६ हजार ७०० शेतकºयांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के शेतकºयांना भूसंपादनानंतर केवळ पाच दिवसांत भरपाई देण्याचा विक्रम राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे. यातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकºयांनी शेतजमिनीची अन्यत्र खरेदी करून या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार असल्याचा आरोप खोटा ठरविला आहे.या महामार्गासाठी ज्यांनी जमीन दिली त्यांना मिळालेल्या रकमेतून समृद्धीचा नवा मार्ग कसा खुला झाला याची आकडेवारीच एमएसआरडीसीने नेमलेल्या एका एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची प्रचंड आर्थिक प्रगती होत असताना त्यासाठी जमीन गेलेले शेतकरी देशोधडीला लागतील, अशी टीका होत होती. तथापि, आतापर्यंत देण्यात आलेल्या मोबदल्याची रक्कम आणि त्या रकमेचा शेतकºयांनी केलेला विनियोग बघता प्रकल्पग्रस्तांचेही आर्थिक परिवर्तन होत असल्याचे दिसते.एकूण ६४०० शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. ३८ टक्के शेतकºयांनी जमीन खरेदीतच पैसा गुंतविला. ६ टक्के शेतकºयांनी कृषीपूरक व्यवसायात (ट्रॅक्टर, बैलगाडी खरेदी, शेतात विहिरी खोदणे, सूक्ष्म सिंचन, शेतीला कुंपण घालणे) गुंतवणूक केली. १० टक्के शेतकºयांनी कृषी व्यवसायाव्यतिरिक्त (डेअरी, पोल्ट्री फार्म, किराणा) यात गुंतवणूक केली. ४५ टक्के शेतकºयांनी फिक्स्ड् डिपॉझिट, म्युच्युअल फंड, प्रवासी वाहनांची खरेदी, घरबांधणी वा प्लॉट खरेदीत पैसा टाकत समृद्धी साधली. ७४ टक्के शेतकºयांनी काही पैसा मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठीची तरतूद म्हणून गुंतविला. ७१ टक्के शेतकºयांनी आपल्या कुटुंबाला आधार व्हावा यासाठीही गुंतवणूक केली. ५० टक्क्यांहून अधिक शेतकºयांचा पुन्हा शेतजमीन खरेदी करण्याकडे कल असल्याचे या सर्वेक्षणात आढळले.भूसंपादन आणि मोबदल्याबाबत समाधानी असल्याचे सांगत भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक होती, असे मत ९० टक्के शेतकºयांनी नोंदविले. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून हा समृद्धी महामार्ग जाणार असून त्या दहाही जिल्ह्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले.या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी ७५ टक्के संपादन आतापर्यंत पूर्ण झाले असून येत्या एक-दीड महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी ९० टक्के भूसंपादन झालेले असेल, असा विश्वास एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी