शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
5
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
6
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
7
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
8
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
9
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
11
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
12
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
13
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
14
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
15
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
16
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
17
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
18
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
19
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
20
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!

समृद्धी महामार्गाने साधली समृद्धी, १६ हजार ७०० शेतकऱ्यांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई

By यदू जोशी | Updated: April 6, 2018 04:39 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी आतापर्यंत १६ हजार ७०० शेतकºयांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के शेतकºयांना भूसंपादनानंतर केवळ पाच दिवसांत भरपाई देण्याचा विक्रम राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे.

मुंबई - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी आतापर्यंत १६ हजार ७०० शेतकºयांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के शेतकºयांना भूसंपादनानंतर केवळ पाच दिवसांत भरपाई देण्याचा विक्रम राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे. यातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकºयांनी शेतजमिनीची अन्यत्र खरेदी करून या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार असल्याचा आरोप खोटा ठरविला आहे.या महामार्गासाठी ज्यांनी जमीन दिली त्यांना मिळालेल्या रकमेतून समृद्धीचा नवा मार्ग कसा खुला झाला याची आकडेवारीच एमएसआरडीसीने नेमलेल्या एका एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची प्रचंड आर्थिक प्रगती होत असताना त्यासाठी जमीन गेलेले शेतकरी देशोधडीला लागतील, अशी टीका होत होती. तथापि, आतापर्यंत देण्यात आलेल्या मोबदल्याची रक्कम आणि त्या रकमेचा शेतकºयांनी केलेला विनियोग बघता प्रकल्पग्रस्तांचेही आर्थिक परिवर्तन होत असल्याचे दिसते.एकूण ६४०० शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. ३८ टक्के शेतकºयांनी जमीन खरेदीतच पैसा गुंतविला. ६ टक्के शेतकºयांनी कृषीपूरक व्यवसायात (ट्रॅक्टर, बैलगाडी खरेदी, शेतात विहिरी खोदणे, सूक्ष्म सिंचन, शेतीला कुंपण घालणे) गुंतवणूक केली. १० टक्के शेतकºयांनी कृषी व्यवसायाव्यतिरिक्त (डेअरी, पोल्ट्री फार्म, किराणा) यात गुंतवणूक केली. ४५ टक्के शेतकºयांनी फिक्स्ड् डिपॉझिट, म्युच्युअल फंड, प्रवासी वाहनांची खरेदी, घरबांधणी वा प्लॉट खरेदीत पैसा टाकत समृद्धी साधली. ७४ टक्के शेतकºयांनी काही पैसा मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठीची तरतूद म्हणून गुंतविला. ७१ टक्के शेतकºयांनी आपल्या कुटुंबाला आधार व्हावा यासाठीही गुंतवणूक केली. ५० टक्क्यांहून अधिक शेतकºयांचा पुन्हा शेतजमीन खरेदी करण्याकडे कल असल्याचे या सर्वेक्षणात आढळले.भूसंपादन आणि मोबदल्याबाबत समाधानी असल्याचे सांगत भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक होती, असे मत ९० टक्के शेतकºयांनी नोंदविले. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून हा समृद्धी महामार्ग जाणार असून त्या दहाही जिल्ह्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले.या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी ७५ टक्के संपादन आतापर्यंत पूर्ण झाले असून येत्या एक-दीड महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी ९० टक्के भूसंपादन झालेले असेल, असा विश्वास एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी