शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
2
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
3
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
4
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
5
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
6
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
7
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
8
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
9
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
10
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
11
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
12
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
13
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
14
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
15
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
16
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
17
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
18
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
19
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 06:09 IST

महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण, २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडले, वाढवण बंदरही जोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा ‘कॉरिडॉर’ आहे. या महामार्गाने महाराष्ट्राचे इंटिग्रेशन साधले आहे. यातून २४ जिल्हे जेएनपीटीला जोडले जाणार आहेत. तसेच लवकरच वाढवण बंदराशीही त्याची जोडणी दिली जाणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, नितीन पवार, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

अंतिम टप्प्याची काय आहेत खास वैशिष्ट्ये ?

५ जुळे बोगदे, ११ किलोमीटर लांबीचे. इगतपुरी येथील ८ किमी लांबीचा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा. १०० टक्के आगविरोधी यंत्रणा. बोगद्यातील तापमान ६० अंशांवर गेल्यास स्वयंचलित पाण्याची फवारणी सुरू होईल. तापमान ३० अंशांपर्यंत खाली आल्यावर यंत्रणा बंद होईल, इगतपुरी, फूडघर आणि आमणे हे तीन प्रमुख इंटरचेंज, अपघात झाल्यास बचावासाठी जोडबोगदे.

राज्यात कुठून कुठेही फक्त ६-७ तासांत जाता येणार : शिंदे

राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सहा ते सात तासांत पोहोचता यावे, यासाठी ॲक्सेस कंट्रोल महामार्गाचे जाळे तयार करीत आहोत. याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग मराठवाड्यासाठी गेमचेंजर होईल. त्यातून शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गामुळे मुंबईहून शिर्डीला ३ तासांत पोहोचता येणार असून, सर्वाधिक फायदा नाशिकला होणार असल्याचे सांगितले.

‘शक्तिपीठ’चे काम लवकरच सुरू होणार

पुढच्या टप्प्यात शक्तिपीठ महामार्गाचे काम हाती घ्यायचे आहे. हा महामार्ग मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलणारा ठरेल. त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले. समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले तेव्हा अनेकांना हा प्रकल्प होऊ शकत नाही, असे वाटले होते. मात्र, रेकॉर्ड ब्रेक वेळेत भूसंपादन केले. आमच्या काळात हा महामार्ग सुरू झाला याचा आनंद आहे. २०१४ मध्ये जे स्वप्न पाहिले होते, त्याची आज पूर्तता होत आहे याचा आनंद आहे, असेही त्यांनी नमूद केले.

पर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. तर पुढील चार वर्षे दर वर्षाला २५ कोटी झाडे लावली जाणार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. जुन्या नागपूर-मुंबई मार्गावरून नागपूरहून मुंबईकडे येण्यास १७ ते १८ तास लागतात. समृद्धीने हाच प्रवास आता आठ तासांत होईल.

  • ६१,००० - कोटी एकूण खर्च
  • ७०१ किमी - एकूण लांबी
  • ८ तास - प्रवासाचा कालावधी
  • १०० - विशिष्ट संरचना वन्यजीवांसाठी
  • १८० - ओव्हरपास आणि
  • २२४ - अंडरपास पादचाऱ्यांसाठी
  • ५९ - ओव्हरपास आणि
  • २२९ - अंडरपास वाहनांसाठी
  • २५ - इंटरचेंजमुळे इतर ठिकाणी जाता येणार
  • ८ - ओव्हरपास
  • ९२ - अंडरपास निर्मिती देशात प्रथमच
  • ३२ - मुख्य पूल
  • ३१७ - लहान पूल

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार