शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

“शिवसेना-NCPतील फूट जनतेच्या हितासाठी झाली का? आमच्या आयुष्याचा खेळ केला”: संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 17:18 IST

Sambhaji Raje Chhatrapati News: शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी ब्रूद्रुक असे झाले. या सगळ्यांनी फक्त जनतेचा छळ केला, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

Sambhaji Raje Chhatrapati News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी जागावाटपावर खल करताना दिसत असून, दुसरीकडे या दोन्हींना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडण्यात आली आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांनी ही आघाडी केली असून, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील झालेली फूट ही जनतेच्या हितासाठी केली का, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला. 

तिसऱ्या आघाडीच्या परिवर्तन महाशक्ती मेळाव्यात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य करताना महायुती आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. गड किल्ल्यांना ७५ वर्षांत किती पैसे दिले सांगा, माझे  चलेंज आहे. ३५० गड कोट किल्ल्यांचे काय केले? नुसते शिवाजी महाराजांचे नाव घेता , रायगड अध्यक्ष झालो म्हणून काही करू शकलो, असे संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले. तसेच ७५ वर्षात फक्त १ कोटी खर्च. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले होते. १२ डिसेंबर रोजी सांगितले की, योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र तेव्हा कुणी काही बोलले नाही. विरोधक गप्प बसले होते, असे संभाजीराजे म्हणाले.

लोकांच्या प्रश्नासाठी नाही तर स्वार्थासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले 

भाजपा विद्वान असल्याच्या नादात पक्षांचे विभाजन करत होती. काँग्रेसच काही वेगळेच सुरू होते. एनसीपी कुणाची , शिवसेना कुणाची  सगळा गोंधळ होता. गाव छोटी मोठी असतात त्याला खुर्द आणि बुद्रुक  म्हणतात. तसे एनसीपी, शिवसेनेचे झाले आहे. शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी ब्रूद्रुक असे झाले. हे का जनतेच्या हितासाठी झाले का? हे लोकांच्या प्रश्नासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी हे असे झाले. या सगळ्यांनी फक्त जनतेचा छळ केला. तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळ केला, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

दरम्यान, आम्ही जात धर्माच्या नावाने एकत्र आलो नाही, धर्मनिरपेक्षता घेऊन आम्ही मैदानात आलो. महाराष्ट्र घडवण्यासाठी हे परिवर्तन गरजेचे आहे म्हणून आम्ही मैदानात उतरलो. महाराष्ट्राचा सातबारा आपल्या बापाचा आहे असे सगळे सुरु आहे, मात्र हा सातबारा कष्ट करी जनतेचा आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPoliticsराजकारण