शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

“शिवसेना-NCPतील फूट जनतेच्या हितासाठी झाली का? आमच्या आयुष्याचा खेळ केला”: संभाजीराजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 17:18 IST

Sambhaji Raje Chhatrapati News: शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी ब्रूद्रुक असे झाले. या सगळ्यांनी फक्त जनतेचा छळ केला, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

Sambhaji Raje Chhatrapati News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी जागावाटपावर खल करताना दिसत असून, दुसरीकडे या दोन्हींना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी उघडण्यात आली आहे. राजू शेट्टी, बच्चू कडू आणि संभाजीराजे छत्रपती यांनी ही आघाडी केली असून, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. यातच आता शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील झालेली फूट ही जनतेच्या हितासाठी केली का, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला. 

तिसऱ्या आघाडीच्या परिवर्तन महाशक्ती मेळाव्यात बोलताना संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सद्य परिस्थितीवर भाष्य करताना महायुती आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. गड किल्ल्यांना ७५ वर्षांत किती पैसे दिले सांगा, माझे  चलेंज आहे. ३५० गड कोट किल्ल्यांचे काय केले? नुसते शिवाजी महाराजांचे नाव घेता , रायगड अध्यक्ष झालो म्हणून काही करू शकलो, असे संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले. तसेच ७५ वर्षात फक्त १ कोटी खर्च. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले होते. १२ डिसेंबर रोजी सांगितले की, योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र तेव्हा कुणी काही बोलले नाही. विरोधक गप्प बसले होते, असे संभाजीराजे म्हणाले.

लोकांच्या प्रश्नासाठी नाही तर स्वार्थासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले 

भाजपा विद्वान असल्याच्या नादात पक्षांचे विभाजन करत होती. काँग्रेसच काही वेगळेच सुरू होते. एनसीपी कुणाची , शिवसेना कुणाची  सगळा गोंधळ होता. गाव छोटी मोठी असतात त्याला खुर्द आणि बुद्रुक  म्हणतात. तसे एनसीपी, शिवसेनेचे झाले आहे. शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक, राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी ब्रूद्रुक असे झाले. हे का जनतेच्या हितासाठी झाले का? हे लोकांच्या प्रश्नासाठी खुर्द आणि बुद्रुक झाले नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी हे असे झाले. या सगळ्यांनी फक्त जनतेचा छळ केला. तुम्ही आमच्या आयुष्याचा खेळ केला, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

दरम्यान, आम्ही जात धर्माच्या नावाने एकत्र आलो नाही, धर्मनिरपेक्षता घेऊन आम्ही मैदानात आलो. महाराष्ट्र घडवण्यासाठी हे परिवर्तन गरजेचे आहे म्हणून आम्ही मैदानात उतरलो. महाराष्ट्राचा सातबारा आपल्या बापाचा आहे असे सगळे सुरु आहे, मात्र हा सातबारा कष्ट करी जनतेचा आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPoliticsराजकारण