शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

Sambhaji Brigade- Shivsena Alliance: दुहीचा शाप कायम घात करत आलाय, आपण त्यालाच गाडून टाकू; संभाजी ब्रिगेडच्या साथीनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 13:44 IST

महाराष्ट्राच्या राजकारणाला आज वेगळी कलाटणी देणारी युती झाली झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात शुक्रवारी मोठी घडामोड दिसून आली. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर आता संभाजी ब्रिगेडनं शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, ही युती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाही असं स्पष्टीकरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं.

“लढवय्या सहकाऱ्यांचे स्वागत आणि अभिनंदन. फक्त महाराष्ट्रात नाही, तर संपूर्ण देशात प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम सुरू आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात आमचा लढा सुरू आहे, हा फक्त शिवसेनेचा लढा नाही. हा लोकशाहीचा लढा आहे,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जो विचार करुन आपण सोबत आला आहात, तो विचार म्हणजे संविधान वाचवण्यासाठी सोबत आलो आहोत. आपण शिवप्रेमी आहोत, आपल रक्त एकच आहे. एकत्र येऊन आपल्याला नवीन इतिहास घडवायचा असल्याचेही ते म्हणाले.

“आजवरचा जो इतिहास आहे मग तो मराठी माणसांचा म्हणा, मराठ्यांचा म्हणा दुहीचा हा गाढत आलेला आहे. आपण एकत्र येऊन एक नवा इतिहास घडवू, दुहीच्या शापालाच गाडून टाकू. दुहीचा शाप आजवर आमचा घात करत आला. साक्षीपुरावे गोळा करण्याचे दिवस नाही, पण असं म्हटलं जातं की औरंगजेबानं सांगितलं होतं की मराठ्यांना जगाच्या पाठीवर काही तोड नाही. पण या भूमीत दुहीची बीजं खडकावर जरी फेकली तरी ती इतकी रुजतात किंवा फोफावतात की हा हा तमाम दौलत तबाह करून टाकतात. हे आपल्या शत्रूलाही कळलं होतं. आमची जी काही भूमिका रोखठोक आहे म्हणून एकत्र आलो आहोत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युतीमहाराष्ट्राच्या राजकारणाला आज वेगळी कलाटणी देणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज या युतीची घोषणा केली. संयुक्त मेळावे घेण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले आहे. गेल्या दोन अडीज वर्षांच्या काळात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना चांगले लोकहित पाहिले. चांगले निर्णय घेतले. आता लोकशाही धोक्यात आलेली आहे. छोटे पक्ष, संघटना जर वाचवायच्या असतील तर एकत्र यावे लागले, यावर आमचे एकमत झाले आहे, असं संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडMaharashtraमहाराष्ट्र