शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

५९ पोलिसांच्या शौर्याला सलाम! चिरंजीव प्रसाद यांच्यासह तिघांचा राष्ट्रपती पदकाने गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 05:40 IST

दत्तात्रय शिंदे, संदीप दिवाण यांना पोलिस पदक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील ९०८ पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्रातील ५९ पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये राज्य राखीव पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांच्यासह तिघांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलिस पदक’ तर, मीरा-भाईंदर, वसई-विरारचे अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे, ‘एसीबी’चे उपमहानिरीक्षक संदीप दिवाण यांच्यासह ३९ जणांना ‘गुणवत्तापूर्ण सेवा पदक’ व आयपीएस अधिकारी अनुज तारे यांच्यासह १७ पोलिसांना ‘शौर्य पदक’ जाहीर झाले आहे.

चिरंजीव प्रसाद यांच्यासह आयपीएस अधिकारी राजेंद्र डहाळे आणि सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात येणार आहे. २५ जुलै २०२२ रोजी दोन कुख्यात मंगळसूत्र चोर आणि शस्त्रास्त्र तस्करांना पकडण्यात दुर्मीळ शौर्य दाखविल्याबद्दल तेलंगणा पोलिस हेड कॉन्स्टेबल चडुवू यदाय्या यांना शौर्याचा सर्वोच्च पोलिस सन्मान असलेले एकमेव पीएमजी पदक जाहीर करण्यात आले आहे. दोन गुन्हेगारांनी पोलिसावर हल्ला केला होता आणि त्यांच्या संपूर्ण शरीरावर चाकूने अनेक वार केले; परंतु त्यांनी त्यांना आपल्या पकडीतून सोडले नाही. नंतर त्यांच्यावर १७ दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले.

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पदक (पीएसएम) अशोक बोवाजी ओलंबा (हवालदार) गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक (एमएसएम) नितीन भालचंद्र वयचल (प्राचार्य), शिवाजी पांडुरंग जाधव (जेलर ग्रुप-१), दीपक सूर्याजी सावंत (सुभेदार) आणि जनार्दन गोविंद वाघ (हवालदार) नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये गेल्या सप्टेंबरमध्ये दहशतवादविरोधी मोहिमेचे नेतृत्व करताना कारवाईत शहीद झालेले कर्नल मनप्रीत सिंग यांना मरणोत्तर कीर्तिचक्र हा दुसरा सर्वोच्च शांतताकालीन शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सुरक्षा दलातील इतर तीन जवान रायफलमॅन रवी कुमार (मरणोत्तर), मेजर मल्ल रामा गोपाल नायडू, जम्मू आणि काश्मीर पोलिस उपअधीक्षक हिमायून मुज्जम्मील भट (मरणोत्तर) यांनाही कीर्तिचक्र प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय रायफल्सचे सेकंड-इन-कमांड म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांना सेनापदक मिळाले होते. भट हेही याच मोहिमेत शहीद झाले होते. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना एकूण १०३ शौर्य पुरस्कार मंजूर केले. त्यात चार कीर्तिचक्राव्य- तिरिक्त १८ शौर्य चक्र (चार मरणोत्तर), एक बार टू सेनापदक, ६३ सेनापदके, ११ नवसेनापदके आणि सहा वायुसेना पदकांचा समावेश आहे.

रेल्वे कर्मचाऱ्यांना पदक

  • कर्नल सिंग हे लढाऊ होते आणि १९ राष्ट्रीय रायफल्सचे सेकंड-इन-कमांड म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांना सेनापदक मिळाले होते. भट हेही याच मोहिमेत शहीद झाले होते.
  • स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना एकूण १०३ शौर्य पुरस्कार मंजूर केले. त्यात चार कीर्तिचक्राव्य- तिरिक्त १८ शौर्य चक्र (चार मरणोत्तर), एक बार टू सेनापदक, ६३ सेनापदके, ११ नवसेनापदके आणि सहा वायुसेना पदकांचा समावेश आहे.
  • राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनापूर्वी १६ रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि रेल्वे संरक्षण विशेष दल (आरपीएसएफ) कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक आणि उत्कृष्ट सेवेसाठी पदक प्रदान केले. दक्षिण रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त जीएम ईश्वरा राव यांना विशिष्ट सेवेसाठी (पीएसएम) राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे उपनिरीक्षक संजय वसंत मोरे यांच्यासह १५ अधिकाऱ्यांना गुणवंत सेवेसाठी पोलिस पदक मिळाले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी यांचा सन्मान

पोलिस उपअधीक्षक शिवाजी फडतरे, विनीत चौधरी, महेश तराडे, पोलिस अधीक्षक संजय खांडे, सहायक पोलिस आयुक्त विजय हातिसकर, पोलिस निरीक्षक सदानंद राणे, राजेश भागवत, अशोक होनमाने, रामदास पालशेतकर, राजू सुर्वे, संजीव धुमाळ, सहायक उपनिरीक्षक सुनील हांडे, दत्तू खुळे, देवीदास वाघ, प्रकाश वाघमारे, संजय पाटील, मोनिका थॉमस, अनिल काळे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गायकवाड, गजानन तेंडुलकर, राजेंद्र पाटील, संजय राणे, गोविंद शेवाळे, मधुकर नैतम, प्रकाश देशमुख, शशिकांत तटकरे, ए. जे. शुक्ला, शिवाजी जुंदारे, प्रकाश देशमुख, मोहन निखारे, द्वारकादास भांगे, अमितकुमार पांडे, पोलिस अंमलदार बंडू ठाकरे, गणेश भामरे, अरुण खैरे, दीपक तैलू, राजेश पैडलवार आणि सहायक कमांडंट श्रीकृष्ण हिरपूरकर.

केंद्रीय, राज्य दलांसाठी १,०३७ पोलिस पदके

  • सरकारने बुधवारी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विविध केंद्रीय आणि राज्य दलातील १,०३७ पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा पदके जाहीर केली. २४१ जवानांना शौर्य पदकांनी सन्मानित केले जाईल.
  • केंद्रीय राखीव पोलिस दलाला सर्वाधिक ५२ शौर्य पदके, जम्मू-काश्मीर पोलिसांना ३१, उत्तर प्रदेशातील १७ पोलिस कर्मचारी, छत्तीसगडमधील १५ आणि मध्य प्रदेशातील डझनभर शौर्य पदके देण्यात आली आहेत.

चकमकीत दाखवले शौर्य

सन २०१७ मध्ये मौजा कापेवंचा-कवठाराम, सन २०१९ मध्ये मोरमेट्टा व सन २०२२ मध्ये कापेवंचा-नैनेर येथे झालेल्या पोलिस-माओवादी चकमकीत एकूण चार माओवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलिस दलास यश प्राप्त झाले होते. या चकमकीत केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन १७ जणांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक जाहीर झाले.

शौर्य पदकाचे मानकरी

नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आयपीएस अनुज तारे यांच्यासह पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक दीपक औटे, शहीद धनाजी होनमाने, राहुल देव्हडे, विजय सपकाळ आणि पोलिस अंमलदार नागेशकुमार मादरबोईना, शकील शेख, विश्वनाथ पेंदाम, विवेक नरोटे, मोरेश्वर पोटावी, कैलास कुळमेथे, कोतला कोरामी, कोरके वेलादी, महादेव वानखेडे, महेश मिच्चा, समय्या आसम यांचा समावेश आहे.   

महाराष्ट्रातील सहा जणांना ‘अग्निशमन सेवा पदक’

  • स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त, केंद्रीय गृहमंत्रालयाने अग्निशमन क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्यांना आणि नागरी संरक्षण सेवेत उल्लेखनीय कार्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहेत.
  • यामध्ये राज्यातीतील एकूण ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
  • कर्नल मनप्रीत सिंग यांच्यासह इतर तिघांना मरणोत्तर कीर्तिचक्र जाहीर.
  • १६ रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) आणि रेल्वे संरक्षण विशेष दल (आरपीएसएफ) कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक 

स्वातंत्र्याच्या उत्सवातील सर्व नागरिक हे आमचे कुटुंब: राष्ट्रपती

नवी दिल्ली: स्वातंत्र्याच्या उत्सवात सहभागी होणारे देशातील सर्व नागरिक हे आमचे कुटुंब आहे असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. त्या म्हणाल्या की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अनुसूचित जाती-जमाती व अन्य उपेक्षित समुदायांच्या कल्याणासाठी पावले उचलली आहेत. देशातील उपेक्षित समुदायांच्या कल्याणासाठी प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण योजना राबविली आहे. 

माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. भारतीय पोलिस सेवेतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल. ज्या उद्दिष्टासाठी या सेवेमध्ये आलो ते म्हणजे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे; तसेच पीडित व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे काम करण्यासाठी प्रेरणा मिळत राहते.- दत्तात्रय शिंदे, अपर पोलिस आयुक्त, मीरा-भाईंदर, वसई-विरार, पोलिस आयुक्तालय

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसIndependence Dayस्वातंत्र्य दिनPresidentराष्ट्राध्यक्ष