शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून १०० कोटींचा निधी द्या; बीडकरांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 11:36 IST

तसेच किर्तनकार भरतभाऊ रामदासी यांनी सांगितले की, साईबाबा अवलिया संत होते, फकीर होते

बीड - श्री साईबाबा जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद पेटला असताना यामध्ये आता बीडकरांनीही उडी घेतली आहे. साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते. याठिकाणी साईबाबांनी नोकरी केली, त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली आहे. 

याबाबत एबीपी माझाशी बोलताना बीडचे साईभक्त पाटणकर यांनी सांगितले की, साईबाबा बीडमध्ये असल्याचं साईचरित्रात उल्लेख आहे. मौखिक परंपरेनुसार आमचे वडील जनार्दन महाराज पाटणकर यांनी सांगितलं होतं की, साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानाता कामाला होते. ४ ते ५ वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. इंग्रजांनी त्यांचे काम बघून त्यांना एक पगडी भेट म्हणून दिली होती. एवढा असामान्य माणूस अशाप्रकारे लाज न बाळगता काम करतो हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. 

साईंचा जन्म पाथरीच्या भुसारी कुटुंबातील; उंबरखेडमध्ये झाले आध्यात्मिक शिक्षण 

साईबाबांची जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही?

शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद

तसेच किर्तनकार भरतभाऊ रामदासी यांनी सांगितले की, साईबाबा अवलिया संत होते, फकीर होते, असे संत एकाजागी कधी थांबत नाही, त्यांचा जन्म पाथरीत झाला, अवलिया गुरुसोबत ते फिरत फिरत बीडमध्ये आले होते. दासगणू महाराजांच्या ग्रंथात याचा उल्लेख आहे. साईबाबा हे त्यांचे गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांना सेलू येथे भेटले, याठिकाणी त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेऊन तिथून ते शिर्डीला गेले, मी ब्राम्हणकुळात जन्माला आलो, माझा जन्म पाथरीत झाला असं साईबाबांनी म्हाळसापतींना सांगितलं होतं याचा उल्लेख आहे. शिर्डीत आर्थिक स्त्रोत खूप झाला. पाथरी उपेक्षित राहिली. पाथरीत जन्म झाला ही वस्तूस्थिती आहे असं त्यांनी सांगितले. 

साईबाबा जन्मस्थळ वादावर पडदा; पाथरीला देणार तीर्थक्षेत्राचा निधी

साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं? 

दरम्यान, शिर्डीत मोठं अर्थकारण आहे. मराठवाड्यात अनेक संत जन्मला आले. साईचरणी नतमस्तक होण्याची भावना साईभक्तांची असते. त्यामुळे शिर्डीला पायी दिंडी काढण्यापेक्षा बीड ते पाथरी दिंडी काढण्याचा विचार करणार आहोत. पाथरीला १०० कोटी दिले तसेच आम्हालाही १०० कोटी रुपये द्यावेत कारण साईबाबा यांची कर्मभूमी बीड आहे अशी मागणी साईभक्तांनी केली आहे.  

टॅग्स :saibabaसाईबाबाshirdiशिर्डीBeedबीड