शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशी हत्या प्रकरणी मोठा खुलासा; हत्येनंतर सोनम इंदूरला पोहचली होती अन् त्याठिकाणी...
2
फारुक अब्दुल्ला यांचा ‘वंदे भारत’ने प्रवास, चिनाब नदीवरील पुल येताच झाले भावुक; म्हणाले...
3
पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ३३७३० रूपये विद्यावेतन मिळणार; कॅबिनेट बैठकीत ३ महत्त्वाचे निर्णय
4
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
5
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
6
सोनम रघुवंशीनेच राजाला दरीत ढकललं, आरोपींचा नवा धक्कादायक खुलासा!
7
सुख कळले! जिनिलिया देशमुखने साजरी केली वटपौर्णिमा, रितेशचं नाव घेत म्हणाली...
8
SIP मध्ये गुंतवणूक करुन १० लाख रुपये जमवायचेत? महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक, 'या' गोष्टींचीही घ्या काळजी
9
Raj Kushwaha : Video - सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाह तिला म्हणायचा 'दीदी'; कोणी केला धक्कादायक दावा?
10
चौथीच्या वर्गात झालं होतं भांडण; ५० वर्षांनी मित्रांनी घेतला बदला, समोरच्याचे २ दात तोडले
11
RCB च्या चाहत्यांना 'धक्का'? विराट कोहलीच्या 'या' संघाची होणार विक्री? मालक का करतायेत विकण्याचा विचार?
12
आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर
13
२ वर्षात ११४१% ची तेजी, आज कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट; संरक्षण क्षेत्रात काम करते कंपनी
14
धक्कादायक! हातपाय पिरगळले, मान मोडली, नाका-तोंडातून रक्त; सुटकेसमधल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ
15
“२ ते ३ महिन्यात निवडणुका लागतील, तेव्हा...”; शरद पवारांनी सांगितली भूमिका, केले मोठे आवाहन
16
राजाच्या विधवेशी लग्न...सोनम दीदीचा 'हा' प्लॅन चालला असता तर प्रियकर राज बनला असता 'हिरो'
17
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
18
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
19
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
20
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’

साईबाबा बीडमध्ये नोकरीला होते, कर्मभूमी म्हणून १०० कोटींचा निधी द्या; बीडकरांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 11:36 IST

तसेच किर्तनकार भरतभाऊ रामदासी यांनी सांगितले की, साईबाबा अवलिया संत होते, फकीर होते

बीड - श्री साईबाबा जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरी यांच्यात वाद पेटला असताना यामध्ये आता बीडकरांनीही उडी घेतली आहे. साईबाबा पाथरीहून शिर्डीसाठी जात असताना बीडमध्ये काही काळ वास्तव्यास होते. याठिकाणी साईबाबांनी नोकरी केली, त्यामुळे साईंची कर्मभूमी म्हणून बीडच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी १०० कोटींचा निधी द्यावा अशी मागणी बीडमधील साईभक्तांनी केली आहे. 

याबाबत एबीपी माझाशी बोलताना बीडचे साईभक्त पाटणकर यांनी सांगितले की, साईबाबा बीडमध्ये असल्याचं साईचरित्रात उल्लेख आहे. मौखिक परंपरेनुसार आमचे वडील जनार्दन महाराज पाटणकर यांनी सांगितलं होतं की, साईबाबा बीडमध्ये हातमागाच्या दुकानाता कामाला होते. ४ ते ५ वर्ष ते बीडमध्ये कामासाठी राहिले होते. इंग्रजांनी त्यांचे काम बघून त्यांना एक पगडी भेट म्हणून दिली होती. एवढा असामान्य माणूस अशाप्रकारे लाज न बाळगता काम करतो हे सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. 

साईंचा जन्म पाथरीच्या भुसारी कुटुंबातील; उंबरखेडमध्ये झाले आध्यात्मिक शिक्षण 

साईबाबांची जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही?

शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद

तसेच किर्तनकार भरतभाऊ रामदासी यांनी सांगितले की, साईबाबा अवलिया संत होते, फकीर होते, असे संत एकाजागी कधी थांबत नाही, त्यांचा जन्म पाथरीत झाला, अवलिया गुरुसोबत ते फिरत फिरत बीडमध्ये आले होते. दासगणू महाराजांच्या ग्रंथात याचा उल्लेख आहे. साईबाबा हे त्यांचे गुरु केशवराज बाबासाहेब महाराज यांना सेलू येथे भेटले, याठिकाणी त्यांनी आध्यात्मिक शिक्षण घेऊन तिथून ते शिर्डीला गेले, मी ब्राम्हणकुळात जन्माला आलो, माझा जन्म पाथरीत झाला असं साईबाबांनी म्हाळसापतींना सांगितलं होतं याचा उल्लेख आहे. शिर्डीत आर्थिक स्त्रोत खूप झाला. पाथरी उपेक्षित राहिली. पाथरीत जन्म झाला ही वस्तूस्थिती आहे असं त्यांनी सांगितले. 

साईबाबा जन्मस्थळ वादावर पडदा; पाथरीला देणार तीर्थक्षेत्राचा निधी

साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं? 

दरम्यान, शिर्डीत मोठं अर्थकारण आहे. मराठवाड्यात अनेक संत जन्मला आले. साईचरणी नतमस्तक होण्याची भावना साईभक्तांची असते. त्यामुळे शिर्डीला पायी दिंडी काढण्यापेक्षा बीड ते पाथरी दिंडी काढण्याचा विचार करणार आहोत. पाथरीला १०० कोटी दिले तसेच आम्हालाही १०० कोटी रुपये द्यावेत कारण साईबाबा यांची कर्मभूमी बीड आहे अशी मागणी साईभक्तांनी केली आहे.  

टॅग्स :saibabaसाईबाबाshirdiशिर्डीBeedबीड