शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू, उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन, जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 02:42 IST

साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सुफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे.

शिर्डी : साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सुफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाला साजेसा मानवसेवा व एकात्मतेचा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यांचा हा संदेश जगात पोहोचवावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी येथे केले.साईबाबा संस्थान आयोजित जागतिक साई मंदिर विश्वस्तांच्या परिषदेचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले़ पोस्टाच्या ‘माय स्टॅम्प’चे व संस्थान व्यवस्थापनाच्या वर्षपूर्ती अंकाचे प्रकाशन करण्यात आले़ भाषणाची सुरुवात मराठीत करणाºया उपराष्ट्रपतींनी हिंदी, इंग्रजी, तेलगू व संस्कृत भाषेतून उपस्थितांशी हृदयस्पर्शी संवाद साधला़ वंचित आणि गरजूंची सेवा हीच खरी साई भक्ती व असाहाय्य लोकांविषयी केवळ सहानुभूती न दाखविता त्यांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी प्रार्थना आहे.पूजाविधीत न गुंतता सद्बुद्धी, सदाचार आणि सेवाभावनेने मन:शांती मिळते, असे ते म्हणाले़ साईबाबांचा संदेश प्रेम, वात्सल्य आणि माणसाला एकमेकांच्या हृदयाशी जोडण्याचा आहे. भेदभाव विसरून माणसावर प्रेम केल्यास श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम जीवनात होतो. परिषदेच्या माध्यमातून चांगल्या अनुभवाचे आणि कल्पनांचे आदान-प्रदान करीत भारतीयता आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा नायडू यांनी व्यक्त केली.उपराष्ट्रपतींनी काढली ‘लोकमत’ची आठवणउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी शिर्डीत कार्यक्रमापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला़ त्या वेळी त्यांनी ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीच्या शुभारंभ कार्यक्रमाला उपस्थित होतो, असे आवर्जून सांगितले. दिल्लीतील या गौरवपूर्ण कार्यक्रमातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला़मार्चमध्ये नाइट लॅण्डिंगमार्चमध्ये शिर्डी विमानतळावर नाइट लॅण्डिंग सुविधा सुरू होईल, अशी माहिती जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांनी दिली़ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शिर्डी हे वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारे ठिकाण असल्याचे सांगितले.देश-विदेशातील भाविकांचा मेळाविश्वस्तांच्या परिषदेसाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. प्रतिनिधींच्या संख्येत मात्र घट झाली. गेल्या वर्षी देशातील अकराशे व विदेशातील ४४ मंदिरांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते़ यंदा ही संख्या अनुक्रमे ६५० व १९वर आली आहे़ देश-विदेशात सार्इंचा प्रचार-प्रसार करणाºया चंद्रा भानू सत्पथी गुरुजींनी दोन दिवसांपूर्वी हैदराबादेत परिषद आयोजित केल्याचे सांगण्यात येते़ त्यामुळे संख्येत घट झाल्याची शक्यता आहे़कॅनडा, हाँगकाँग, जपान, मलेशिया, नेदरलँड, श्रीलंका, लंडन व अमेरिकेतून १९ साई मंदिरांचे प्रतिनिधी आले आहेत़ सर्वाधिक ३१७ आंध्र प्रदेशातून, तर चंदीगड, हिमालच प्रदेश, केरळमधून प्रत्येकी एक मंदिर प्रतिनिधी आला आहे़ राज्यातील दीडशे साई मंदिरांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत़ देशभरात जवळपास आठ हजार तर विदेशात पाचशे साई मंदिरे आहेत़

टॅग्स :saibabaसाईबाबा