शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

‘सागर’ वादळाचा मुंबईसह महाराष्ट्राला धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 01:17 IST

उष्णतेच्या लाटेचा मात्र कहर : मान्सूनपूर्व पावसाचा धिंगाणा

मुंबई : अरबी समुद्रात उठलेले ‘सागर’ नावाचे वादळ सोमालियाचा समुद्र पार करत, पश्चिम-दक्षिणेला सरकले आहे. परिणामी, मुंबईसह महाराष्ट्र आणि देशाला या वादळाचा धोका नाही, असे भारतीय हवामान शास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे राज्यात विशेषत: विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, उर्वरित राज्यात मान्सूनपूर्व पावसाने धिंगाणा घातला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंदी महासागरात उठलेले ‘सागर’ वादळ उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेला सरकले. देशाच्या पश्चिम किनाऱ्यापासून हे वादळ दूर असल्याने त्याचा देशाला धोका नाही.हे वादळ पुढे सरकत आता ते सोमालियाकडे सरसावले. वादळाचा परिणाम म्हणून यमन, सोमालिया आणि सौदी अरेबियाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला. वादळाच्या दिशेत बदल होत असतानाच, राज्यात वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत.मागील २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या नोंद झाली आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट आहे.कोकण, गोव्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.२० ते २३ संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.२० ते २१ दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.२२ ते २३ मे दरम्यान विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट राहील.रविवारसह सोमवारी मुंबईमधील आकाश निरभ्र राहील.कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५, २६ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.राज्यात २०१ जणांना उष्माघाताचा त्रासमुंबई : आठ दिवसांपूर्वी राज्यातील उष्माघातावर उपचार घेणाºयांची संख्या १४९ असताना आरोग्यभवनाकडून नवी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार राज्याच्या विविध रुग्णालयात २०१ जण उष्माघातावर उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र अमरावती येथे उष्माघाताने एकाचा बळी गेला आहे.गेल्या वर्षी उष्माघाताने १३ जणांचा बळी गेला होता. उष्माघातावर उपचार घेणाºयांमध्ये नागपूरची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या १२९ इतकी आहे, अशी माहिती राज्य आरोग्य संचालनालयाकडून मिळाली. दरम्यान, मराठवाडा, विदर्भात उष्माघाताचा प्रभाव सर्वाधिक आहे. नागपूर महापालिका क्षेत्राखालोखाल यवतमाळ क्षेत्रात २८, नागपूर जिल्हा २१, बुलढाणा क्षेत्रात १४ असे रुग्ण उष्माघातामुळे रुग्णालयात दाखल आहेत.

टॅग्स :TemperatureतापमानMaharashtraमहाराष्ट्र