शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

Maharashtra Politics: “भाजपात पंकजा मुंडेंना संपवण्याचे कारस्थान सुरू, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागतच करू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 21:49 IST

Maharashtra News: पंकजा मुंडेंचे भाजपने संपवलेले अस्तित्व हे जगजाहीर असून, जी व्यक्ती लोकांच्या मनात आहे, तिला पक्षात घ्यायला हरकत नसावी, असे राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटले आहे.

Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भाजप नेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. मात्र, आता थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. यातच आता भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना संपवण्याचे कारस्थान सुरू असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे, अशी खुली ऑफर देण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मात्र, मला कोणी संपवू शकत नाही. पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला, तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसे करु शकणार नाहीत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पंकजा मुंडेंना खुली ऑफर दिली आहे. 

भाजपात पंकजा मुंडेंना संपवण्याचे कारस्थान सुरू

पंकजाताईंची भाजपने केलेली कोंडी, त्यांचे संपवलेले अस्तित्व हे जगजाहीर आहे. कोणी कोणी त्यांच्या मागे त्यांच्याच पक्षातल्या ज्यांना त्या आधी जवळचे म्हणत होत्या त्या लोकांनी कशा पद्धतीने काय केले ते आम्ही सांगायची गरज नाही. आम्ही व्यक्ती म्हणून आणि विचार योग्य म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत. प्रत्येक जण राजकीय जीवनात पक्ष म्हणून निमंत्रण देतच असतो. भाजपने सुद्धा शिंदे गट सत्तेसाठी आपल्यात घेतलाच आहे. त्यामुळे राजकारणामध्ये पक्ष म्हणून निमंत्रण देण्यात चूक नाही. त्या अनुषंगाने पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीने याआधीच पक्षात येण्याचे निमंत्रण दिलेले आहे. जी व्यक्ती लोकांच्या मनात आहे अशा व्यक्तीला पक्षात घ्यायला हरकत नसावी. पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत आल्या तर त्यांच स्वागतच आहे, अशी खुली ऑफर रुपाली पाटील यांनी दिली. 

दरम्यान, भाजप वंशवादाचा विषय विरोधकांसाठी वापरतो. त्यांच्या पक्षांमध्ये सुद्धा वारसदारांनी आलेली अनेक नेते आहेत. आणि पंकजाताईंचे जे वक्तव्य त्याच्यावरून असे दिसत आहे की, जी लोक कामाने दमदार आहेत, जी लोकांच्या मनात आहेत, म्हणजेच मोदी साहेबांनी कितीही कितीही छल कपट किंवा कितीही यंत्रणा वापरल्या तरी लोकांच्या मनातून अशा व्यक्ती कमी होत नाहीत. त्यामुळे पंकजाताई म्हणाल्या असतील की, लोकांच्या मनातील स्थान हे माझं अस्तित्व आहे ते कोणीही संपू शकत नाही आणि ते बरोबरच आहे. जर काम करणारी व्यक्ती असेल जरी ती वारसा हक्काने आली असेल आणि तिच्या लोकांच्या मनात जर त्यांचं घर असेल तर त्यांना खुद्द मोदी सुद्धा संपवू शकत नाहीत, असे रुपाली पाटील यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस