शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

Maharashtra Politics: “भाजपात पंकजा मुंडेंना संपवण्याचे कारस्थान सुरू, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागतच करू”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 21:49 IST

Maharashtra News: पंकजा मुंडेंचे भाजपने संपवलेले अस्तित्व हे जगजाहीर असून, जी व्यक्ती लोकांच्या मनात आहे, तिला पक्षात घ्यायला हरकत नसावी, असे राष्ट्रवादीच्या नेत्याने म्हटले आहे.

Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भाजप नेत्या आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा यापूर्वीही अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. मात्र, आता थेट पंतप्रधान मोदींचे नाव घेऊन केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. यातच आता भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना संपवण्याचे कारस्थान सुरू असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावे, अशी खुली ऑफर देण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मात्र, मला कोणी संपवू शकत नाही. पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला, तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसे करु शकणार नाहीत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पंकजा मुंडेंना खुली ऑफर दिली आहे. 

भाजपात पंकजा मुंडेंना संपवण्याचे कारस्थान सुरू

पंकजाताईंची भाजपने केलेली कोंडी, त्यांचे संपवलेले अस्तित्व हे जगजाहीर आहे. कोणी कोणी त्यांच्या मागे त्यांच्याच पक्षातल्या ज्यांना त्या आधी जवळचे म्हणत होत्या त्या लोकांनी कशा पद्धतीने काय केले ते आम्ही सांगायची गरज नाही. आम्ही व्यक्ती म्हणून आणि विचार योग्य म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत. प्रत्येक जण राजकीय जीवनात पक्ष म्हणून निमंत्रण देतच असतो. भाजपने सुद्धा शिंदे गट सत्तेसाठी आपल्यात घेतलाच आहे. त्यामुळे राजकारणामध्ये पक्ष म्हणून निमंत्रण देण्यात चूक नाही. त्या अनुषंगाने पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीने याआधीच पक्षात येण्याचे निमंत्रण दिलेले आहे. जी व्यक्ती लोकांच्या मनात आहे अशा व्यक्तीला पक्षात घ्यायला हरकत नसावी. पंकजा मुंडे या राष्ट्रवादीत आल्या तर त्यांच स्वागतच आहे, अशी खुली ऑफर रुपाली पाटील यांनी दिली. 

दरम्यान, भाजप वंशवादाचा विषय विरोधकांसाठी वापरतो. त्यांच्या पक्षांमध्ये सुद्धा वारसदारांनी आलेली अनेक नेते आहेत. आणि पंकजाताईंचे जे वक्तव्य त्याच्यावरून असे दिसत आहे की, जी लोक कामाने दमदार आहेत, जी लोकांच्या मनात आहेत, म्हणजेच मोदी साहेबांनी कितीही कितीही छल कपट किंवा कितीही यंत्रणा वापरल्या तरी लोकांच्या मनातून अशा व्यक्ती कमी होत नाहीत. त्यामुळे पंकजाताई म्हणाल्या असतील की, लोकांच्या मनातील स्थान हे माझं अस्तित्व आहे ते कोणीही संपू शकत नाही आणि ते बरोबरच आहे. जर काम करणारी व्यक्ती असेल जरी ती वारसा हक्काने आली असेल आणि तिच्या लोकांच्या मनात जर त्यांचं घर असेल तर त्यांना खुद्द मोदी सुद्धा संपवू शकत नाहीत, असे रुपाली पाटील यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस