शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

...अन्यथा भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : रुपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 15:35 IST

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून घेणारे नरेंद्र मोदी यांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

मुंबई : महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. तर राजकीय मंडळी देखील पंतप्रधान मोदी आणि पुस्तक लिहिणाऱ्यांवर टीका करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सुद्धा याच मुद्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

या आधी "नगरचे उपनगराध्यक्ष श्रीपाद छिंदमकडून छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी, पाठ्यपुस्तकात जिजाऊ माँसाहेबांचा केलेला अपमान आणि आता 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकाचे प्रकाशन यावरून भाजपची छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्याची वृत्ती दिसून येते. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करून घेणारे नरेंद्र मोदी यांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली पाहिजे" अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

तर छञपती शिवाजी महाराजांची तुलना कोणीही कुणाशीच करूच शकत नाही इतके ते महान आहेत. मोदींना कदाचित महाराजांनी सूरतवर गाजविलेल्या पराक्रमाची सल अजून बोचत असावी, म्हणून तसा प्रयत्न करून महाराष्ट्राचा अपमान करण्याची संधी ते शोधत असतात असा आरोप सुद्धा यावेळी रुपाली चाकणर यांनी केला आहे.

तसेच या प्रकरणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध तर आहेच परंतु त्यांनी त्वरित याबाबत जनतेची माफीदेखील मागितली पाहिजे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला पदाधिकारी भाजपाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

 

`