शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: परराज्यातल्या मजुरांसाठी केंद्रानं विशेष ट्रेन सोडाव्यात- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:40 IST

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्रालयाकडे मागणी

मुंबई: कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याचा विचार केंद्रानं करावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ३० एप्रिल आणि १५ मे रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती केंद्रानं व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विशेष ट्रेन सोडण्याबद्दल विचार करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. केंद्रानं विशेष रेल्वे सोडल्यास अडकून पडलेल्या मजुरांना आणि कामगारांना त्यांच्या घरी परतता येईल. याबद्दलच्या मार्गदर्शन सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयानं एप्रिलच्या अखेरपर्यंत द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विटरच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. परराज्यातून मुंबईत आलेल्या मजुरांनी घरी परतण्यासाठी गेल्याच आठवड्यात वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं. परराज्यातील अडकलेल्या कामगारांची निवारा केंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: ६ लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांच्या जेवणाची आणि इतर व्यवस्था केली गेली आहे. त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. मात्र तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पवित्र्यात येतात. जर ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन यासंदर्भात विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी