शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

CoronaVirus: परराज्यातल्या मजुरांसाठी केंद्रानं विशेष ट्रेन सोडाव्यात- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:40 IST

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्रालयाकडे मागणी

मुंबई: कोरोनाला प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याचा विचार केंद्रानं करावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ३० एप्रिल आणि १५ मे रोजी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती केंद्रानं व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विशेष ट्रेन सोडण्याबद्दल विचार करण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. केंद्रानं विशेष रेल्वे सोडल्यास अडकून पडलेल्या मजुरांना आणि कामगारांना त्यांच्या घरी परतता येईल. याबद्दलच्या मार्गदर्शन सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्रालयानं एप्रिलच्या अखेरपर्यंत द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं ट्विटरच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. परराज्यातून मुंबईत आलेल्या मजुरांनी घरी परतण्यासाठी गेल्याच आठवड्यात वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं. परराज्यातील अडकलेल्या कामगारांची निवारा केंद्राच्या माध्यमातून उत्तम व्यवस्था केली जात आहे. साधारणत: ६ लाख स्थलांतरित कामगार आणि मजुरांच्या जेवणाची आणि इतर व्यवस्था केली गेली आहे. त्यांची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे. मात्र तरी ते लोक त्यांच्या घरी जाऊ इच्छितात. काही वेळा ते आंदोलनाच्या पवित्र्यात येतात. जर ३० एप्रिल नंतर १५ मे पर्यंत विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा अंदाज केंद्र सरकार व्यक्त करत असेल तर आता हातात असलेला कालावधी लक्षात घेऊन यासंदर्भात विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी