शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला झुलवत ठेवले- हेमंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:09 IST

२९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील आक्रोश मोर्चावर आपण ठाम असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

मुंबई : सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये जातीचे दाखले मिळू नयेत म्हणून झुलवत ठेवल्याचा आरोप याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील आक्रोश मोर्चावरही आपण ठाम असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.ते म्हणाले, धनगर आरक्षणाच्या नावाखाली प्रत्येक पक्षाने आपली वोटबँक भरून सत्तेचा उपभोग घेतला. धनगर समाजाला कुठलाही पक्ष नको असून, एसटीमध्ये जातीचे दाखले हवे आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात धनगर बांधव रस्त्यावर उतरून राग व्यक्त करत आहे. तरीही भाजपा सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने टिसचा अहवाल मागवून घेतला नाही, म्हणूनच धनगर समाजाला २९ आॅगस्ट रोजी आझाद मैदानावर ‘भाजपा सरकार चले जाव’ असा आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे. या मोर्चात एक ते दीड लाख धनगर समाज उपस्थित राहण्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.मोर्चादरम्यान चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. काही भाजपाची नेते मंडळी धनगर आंदोलनात फूट पाडण्यासाठी वेगळ्या मोर्चाची चूल मांडून शक्तिप्रदर्शन करीत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. या वेळी जनहित संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा सायली शिंदे, विक्रम भोसले, राजेश पालवे, समाधान बचिरे हे समन्वयक उपस्थित होते.२७ आॅगस्टला बैठक मुंबई : धनगर आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध संघटनांची बैठक २७ आॅगस्टला सह्याद्री अतिथीगृहावर बोलविली आहे.सध्या धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाच्या सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठीचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) देण्यात आले आहे.टीसीएसचे अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ दिवसांत हा अहवाल सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :reservationआरक्षण