शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला झुलवत ठेवले- हेमंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:09 IST

२९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील आक्रोश मोर्चावर आपण ठाम असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

मुंबई : सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये जातीचे दाखले मिळू नयेत म्हणून झुलवत ठेवल्याचा आरोप याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील आक्रोश मोर्चावरही आपण ठाम असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.ते म्हणाले, धनगर आरक्षणाच्या नावाखाली प्रत्येक पक्षाने आपली वोटबँक भरून सत्तेचा उपभोग घेतला. धनगर समाजाला कुठलाही पक्ष नको असून, एसटीमध्ये जातीचे दाखले हवे आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात धनगर बांधव रस्त्यावर उतरून राग व्यक्त करत आहे. तरीही भाजपा सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने टिसचा अहवाल मागवून घेतला नाही, म्हणूनच धनगर समाजाला २९ आॅगस्ट रोजी आझाद मैदानावर ‘भाजपा सरकार चले जाव’ असा आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे. या मोर्चात एक ते दीड लाख धनगर समाज उपस्थित राहण्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.मोर्चादरम्यान चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. काही भाजपाची नेते मंडळी धनगर आंदोलनात फूट पाडण्यासाठी वेगळ्या मोर्चाची चूल मांडून शक्तिप्रदर्शन करीत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. या वेळी जनहित संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा सायली शिंदे, विक्रम भोसले, राजेश पालवे, समाधान बचिरे हे समन्वयक उपस्थित होते.२७ आॅगस्टला बैठक मुंबई : धनगर आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध संघटनांची बैठक २७ आॅगस्टला सह्याद्री अतिथीगृहावर बोलविली आहे.सध्या धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाच्या सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठीचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) देण्यात आले आहे.टीसीएसचे अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ दिवसांत हा अहवाल सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :reservationआरक्षण