शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला झुलवत ठेवले- हेमंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 05:09 IST

२९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील आक्रोश मोर्चावर आपण ठाम असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.

मुंबई : सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये जातीचे दाखले मिळू नयेत म्हणून झुलवत ठेवल्याचा आरोप याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २९ आॅगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या भाजपा सरकारविरोधातील आक्रोश मोर्चावरही आपण ठाम असल्याचे पाटील यांनी या वेळी सांगितले.ते म्हणाले, धनगर आरक्षणाच्या नावाखाली प्रत्येक पक्षाने आपली वोटबँक भरून सत्तेचा उपभोग घेतला. धनगर समाजाला कुठलाही पक्ष नको असून, एसटीमध्ये जातीचे दाखले हवे आहेत. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात धनगर बांधव रस्त्यावर उतरून राग व्यक्त करत आहे. तरीही भाजपा सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने टिसचा अहवाल मागवून घेतला नाही, म्हणूनच धनगर समाजाला २९ आॅगस्ट रोजी आझाद मैदानावर ‘भाजपा सरकार चले जाव’ असा आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे. या मोर्चात एक ते दीड लाख धनगर समाज उपस्थित राहण्याचा दावाही पाटील यांनी केला आहे.मोर्चादरम्यान चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. काही भाजपाची नेते मंडळी धनगर आंदोलनात फूट पाडण्यासाठी वेगळ्या मोर्चाची चूल मांडून शक्तिप्रदर्शन करीत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. या वेळी जनहित संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षा सायली शिंदे, विक्रम भोसले, राजेश पालवे, समाधान बचिरे हे समन्वयक उपस्थित होते.२७ आॅगस्टला बैठक मुंबई : धनगर आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध संघटनांची बैठक २७ आॅगस्टला सह्याद्री अतिथीगृहावर बोलविली आहे.सध्या धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाच्या सामाजिक, आर्थिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठीचे काम टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (टीसीएस) देण्यात आले आहे.टीसीएसचे अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या १५ दिवसांत हा अहवाल सरकारला सादर होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :reservationआरक्षण