शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळात कांद्यावरून ‘रड’कंदन; प्रतिक्विंटल २०० ते ३०० रुपयांच्या अनुदानाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 06:15 IST

समिती देणार आठ दिवसांत अहवाल. कांदा उत्पादकांना गरजेनुसार मदत देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांवर एक रुपया किलोने कांदा विकण्याची पाळी आली असताना या दुर्दशेचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी उमटले. शेतकऱ्यांना सरकारने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. सरकारने क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये अनुदान देण्याची तयारी केली असून एक समितीदेखील नेमली आहे.  

कांदा उत्पादकांना गरजेनुसार मदत देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिले. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी तसेच केंद्र सरकारच्या कृषी योजनेतून हस्तक्षेप करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातूनही तोडगा न निघाल्यास २०१८च्या धर्तीवर शेतकऱ्यांना विशेष मदत दिली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली; मात्र समाधान न झालेल्या विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी, गदारोळ केला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब केले; त्यानंतर ते दिवसभरासाठी स्थगित केले. तत्पूर्वी,  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याकडे लक्ष वेधले.

अनुदान मिळण्याची शक्यतादेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कांद्याला क्विंटलमागे १०० रुपये अनुदान देण्यात आले होते. यावेळी २०० ते ३०० रुपये अनुदान दिले जाण्याची शक्यता आहे. दर घसरणीवर उपाय योजण्यासाठी राज्य सरकारने माजी पणन संचालक डॉ. सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. ही समिती आठ दिवसात अहवाल देणार आहे. 

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ, नाना पटोले, ॲड.राहुल आहेर, ॲड.यशोमती ठाकूर यांनी हा मुद्दा लावून धरला. राज्यातील  कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून यावर चर्चा करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, नाफेडला अतिरिक्त कांदा खरेदी करण्याची विनंती केली होती, त्याप्रमाणे खरेदी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत २.३८ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी झाला असून जिथे खरेदी केंद्र बंद असेल तिथे सुरु केले जाईल. 

अंगणवाडी सेविकांना १५०० रुपयांची वाढ, संप मागेराज्यातील अंगणवाडी सेविकांना मानधनात १५०० रुपये वाढ तसेच अंगणवाडी सेविकांसाठी पेन्शन योजना तयार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. विधानभवनात अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले आहे. त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा अंगणवाडी कर्मचारी संघाने केली.

गर्भवती मातांची तपासणी, बालकांचे लसीकरण, कुपोषण निर्मूलन आदी कार्यक्रमांवरही संपाचा प्रतिकूल परिणाम होत होता. ही बाब लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलवले होते. या बैठकीत मानधन वाढीसह पेन्शन योजना आणि इतर मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. 

मानधन वाढ आणि पेन्शन योजनेबाबत दिलेल्या आश्वासनांचा विचार करून आम्ही संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. - एम. ए. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

टॅग्स :onionकांदाvidhan sabhaविधानसभाBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन