शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरून प्रचंड गदारोळ, कामकाज गुंडाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 07:01 IST

मराठा, धनगर, मुस्लीम व लिंगायत समाजास आरक्षण आणि दुष्काळ या मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी घोषणाबाजी करून गोंधळ घातला.

मुंबई : मराठा, धनगर, मुस्लीम व लिंगायत समाजास आरक्षण आणि दुष्काळ या मुद्द्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंगळवारी घोषणाबाजी करून गोंधळ घातला. यात विधानसभेचे कामकाज चारदा तर विधान परिषदेचे दोनदा तहकूब करून नंतर ते दिवसभरासाठी गुंडाळण्यात आले. या गोंधळात काही सदस्यांनी राजदंड पळविला.मराठा आरक्षणाबाबत आयोगाचा अहवाल सभागृहात सादर करण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत मतभिन्नता असल्याचे दिसले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरक्षणाचा अहवाल मांडण्याची मागणी केली, तर अजित पवार यांनी कायदेशीर वा घटनात्मक पेच निर्माण होणार असेल, तर अहवाल पटलावर ठेवू नये असे मत मांडले. अहवाल लोकांसमोर यावा, असे मत त्यांनी नंतर पत्रकारांकडे व्यक्त केले.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या भूमिकेचे समर्थन केले. अहवाल सभागृहात मांडल्यास त्याला कोर्टात आव्हान दिले जाईल, ही पवारांची भीती रास्त असल्याचे ते म्हणाले. नारायण राणे समितीचा अहवाल सभागृहात न मांडताच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते, असेही ते म्हणाले.अहवाल सभागृहात मांडावा की नाही यावर चर्चा होऊ शकते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली व सध्याच्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे स्पष्ट केले.धनगर समाजाला हे सरकार पहिल्याच दिवशी आरक्षण देणार होते त्याचे काय झाले, असा सवाल विखे, पवार यांनी केला. धनगरांचा समावेश अनुसूचित जमातीत करण्यासाठी राज्याने केंद्रीय आयोगाला शिफारस करावी, अशी मागणी गणपतराव देशमुख यांनी केली. विरोधकांच्या तोफेपासून वाचण्याची हीच संधी साधत मंत्री चंद्रकांत पाटील तशी शिफारस लवकरच करणार असल्याचे सांगितले.मुस्लीम आरक्षणाचा मुद्दाविरोधी आमदारांनी बाहेर दुष्काळ व मराठा आरक्षणावरून धरणे धरले होते. विधानसभेतही मुस्लीम आरक्षणासाठी सदस्यांनी राजदंड उचलला. मुस्लिमांतील अनेक जातींना ओबीसींमध्ये आरक्षण आहे. ते मजबूत होण्यासाठी प्रयत्न करू, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्र