शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 09:58 IST

संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे भव्य आयोजन, कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये सामाजिक एकता हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपला देश प्राचीन काळापासून विविधतापूर्ण आहे, परंतु समाज, राष्ट्र आणि संस्कृती म्हणून आपण एक आहोत असं त्यांनी म्हटलं.

योगेश पांडे नागपूर  - भारतात मोठ्या काळापासून विविधता असूनदेखील समाजात एकता आहे. मात्र काही लोक जाणुनबुजून एकतेवर प्रहार करण्याचे प्रयत्न होतात. विशेषतः श्रद्धास्थाने, महापुरुष व प्रार्थनास्थळांसंबंधात अनादराच्या घटना घडतात. तसेच लहानसहान बाबींवरून किंवा संशयावरून कायदा हातात घेणे, गुंडगिरी, हिंसाचार करणे अशा गोष्टी होतात. परंतु ही पद्धत अयोग्य आहे. अशा घटना पूर्वकल्पित कल्पनेने किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाला चिथावणी देण्यासाठी घडवल्या जातात. त्यांच्या जाळ्यात अडकले जाणे तात्काळ आणि दीर्घकालीन ध्येयासाठी हानिकारक आहे. हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे, या शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी राजकीय पक्षांसोबत समाजात भेद उत्पन्न करणाऱ्या तत्वांचे कान टोचले. नागपुरातील रेशीमबाग मैदानात संघाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रांतिक संघचालक दीपक तामशेट्टीवार, सह-संघचालक श्रीधरजी गाडगे आणि महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या शेजारील देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अशांतता आहे. श्रीलंका, बांगलादेश पाठोपाठ नेपाळमध्ये सत्तांतरास कारणीभूत ठरलेल्या जनतेचा हिंसक उद्रेक चिंताजनक आहे.अशा अशांतता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती भारतात तसेच जागतिक स्तरावर सक्रिय आहेत. परंतु हिंसक उद्रेकांमध्ये इच्छित बदल घडवून आणण्याची शक्ती नसते. केवळ लोकशाही मार्गांनीच समाज आमूलाग्र बदल साध्य करू शकतो. हिंसक घटनांमुळे जागतिक वर्चस्ववादी शक्तींना गैरफायदा घेण्याची संधी मिळते. आपले शेजारी देश सांस्कृतिकदृष्ट्या भारताशी जोडलेले आहेत. एक प्रकारे, ते आपले कुटुंबीयच आहेत. आपल्या शेजारी देशांमध्ये आपल्या स्वतःच्या हितांचे रक्षण करण्यापेक्षा शांतता, स्थिरता, प्रगती भारताच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये सामाजिक एकता हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपला देश प्राचीन काळापासून विविधतापूर्ण आहे, परंतु समाज, राष्ट्र आणि संस्कृती म्हणून आपण एक आहोत. आपल्या राष्ट्रीय एकतेची भावना सर्वसमावेशक आहे. आपण आपल्या एकतेचा पाया कधीही विसरू नये. जगाच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय देणारी एक नवीन निर्मिती आवश्यक आहे. आपल्या समग्र आणि एकात्मिक दृष्टिकोनावर आधारित अशा निर्मितीसाठी केवळ भारतच एक अनुकरणीय आदर्श देऊ शकतो. या दृष्टिकोनासह, आपण विकासाचा मार्ग आखला पाहिजे आणि जगासमोर एक गौरवशाली उदाहरण सादर केले पाहिजे, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये दिसली समाजाची एकताकाश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर, भारतातील नागरिक दुःख आणि संतापाने भरले होते. सरकारने योग्य प्रत्युत्तर दिले. या काळात, देशाने नेतृत्वाची ताकद, आपल्या सैन्याचे शौर्य आणि समाजाची उल्लेखनीय एकता पाहिली असे सरसंघचालक म्हणाले.

ट्रम्प टॅरिफबाबत स्वदेशी आणि स्वावलंबनाशिवाय पर्याय नाही अमेरिकेने स्वतःच्या हिताच्या आधारावर आयात शुल्क धोरण लागू केले आहे. यामुळे आपल्यालाही काही गोष्टींवर पुनर्विचार करावा लागेल. जग परस्परावलंबनावर चालते, परंतु आपण त्याला सक्ती न बनवता स्वावलंबी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. परमपूज्य सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की स्वदेशी आणि स्वावलंबनातूनच स्वावलंबन मिळवता येते आणि त्याला पर्याय नाही, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले.

महात्मा गांधींबाबत संघमंचावर गौरवोद्गारयावेळी सरसंघचालकांनी महात्मा गांधी यांच्याबाबत गौरवोद्गार काढले. महात्मा गांधी आपल्या स्वातंत्र्याच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक आहेत.स्वातंत्र्योत्तर 'स्व' आधारित भारताची संकल्पना दृढ करणाऱ्या तत्वज्ञानींमध्ये त्यांचे आदराचे स्थान आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Violence isn't the answer; democracy is key: RSS Chief slams parties.

Web Summary : RSS Chief Mohan Bhagwat emphasized unity and democracy, cautioning against divisive forces. He highlighted India's strength in diversity, advocating for peaceful progress and self-reliance amidst global challenges. Social unity, not violence, is the path.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतRamnath Kovindरामनाथ कोविंद